Home Blog Page 12

कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याचा रु. 3350 प्रमाणे ऊस दर – हर्षवर्धन पाटील  शेतकरी हितास सर्वोच्च प्राधान्य 

कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याचा रु. 3350 प्रमाणे ऊस दर – हर्षवर्धन पाटील  शेतकरी हितास सर्वोच्च प्राधान्य

संपादकीय

महात्मा फुलेनगर (बिजवडी) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना व सहयोग बाबुराव बोत्रे-पाटील चेअरमन ओंकार शुगर अँड डिस्टिलरीने चालु सन 2025-26 च्या गळीत हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या उसाला प्रति टन रु. 3350 प्रमाणे उच्चांकी दर देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पहिला हप्ता रु. 3200/- प्रमाणे असून, उर्वरित रु. 150 प्रमाणे रक्कम शेतकऱ्यांना दिवाळीला अदा केली जाईल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना उत्कृष्टपणे चालू असून आज अखेर कारखान्याने 1,65,000 मे. टन ऊसाचे गाळप पूर्ण केले आहे. कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याच्या माध्यमातून व ओंकार शुगरचा सहयोगातून सहकार टिकविण्याचा हा महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. या सहयोगातून सहकारातील शेतकरी, कामगार टिकवण्याचे काम यशस्वीपणे केले जात आहे. ओंकार शुगर ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांचे माध्यमातून प्रति टन रु. 3350 प्रमाणे उच्चांकी दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपला सर्व ऊस हा कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना सहयोग ओंकार शुगर अँड डिस्टिलरीस देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.

 

कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखाना हा गेले 8-10 वर्षापासून आर्थिक अडचणीला सामोरे जात होता. तरीही शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन येणाऱ्या आर्थिक अडचणीवर मात करून प्रत्येक गळीत हंगाम यशस्वी व्हावेत, असे प्रयत्न अडचणीत काळातही ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार, अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने सुरू होते. मात्र बदलत्या परिस्थितीनुसार शेतकऱ्यांचे सर्वोच्च हित लक्षात घेऊन कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी कारखाना व ओंकार शुगरचा सहयोग हा (कोलाब्रेशन ) सहकारातील सेक्शन 20 नुसार सहकार टिकवण्यासाठीचा पहिलाच नावीन्यपूर्ण प्रयोग यशस्वी होत आहे.

 

सदरच्या संयुक्त तत्वाच्या निर्णयासाठी सभासदांचे सहकार्य लाभले आहे. श्रद्धेय शंकररावजी पाटील उर्फ भाऊंनी उभारलेल्या या संस्थेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे गेली 35 वर्षे संसार प्रपंच यशस्वीरित्या मार्गी लागले आहेत. त्यातून शेतकऱ्यांची सर्वांगीण प्रगती झाली आहे. त्यामुळे कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्यास गत वैभव प्राप्त करून देणेसाठी आपण सर्वांनी एकत्रित मिळून काम करू या, असे प्रतिपादनही याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी केले.

यावेळी कारखान्याचे संचालक मंडळ तसेच कार्यकारी संचालक विजय शिर्के उपस्थित होते.

__________________________

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सर्वोच्च न्यायालयाची संपूर्ण व्ही. आय. पी. व्यवस्थितेवरती केले बदल

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सर्वोच्च न्यायालयाची संपूर्ण व्ही. आय. पी. व्यवस्थेवरती केले बदल

 

आता कोणताही वरिष्ठ वकील ‘आधी माझे प्रकरण ऐका’ हा हेका दाखवू शकणार नाही.

तातडीची केस असेल? तर ते लेखी प्रक्रियेतून येईल. शॉर्टकट प्रवेश नाही.

 

कनिष्ठांना देखील स्पष्ट संदेश फक्त अतिशय विशिष्ट परिस्थितीत केसचा उल्लेख करा, अन्यथा नाही. आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे NJAC परत आणण्याचा आणि कॉलेजियम व्यवस्था काढून टाकण्याचा सर्वोच्च न्यायालय गंभीरपणे विचार करू शकते, असे संकेत सरन्यायाधिशांनी दिले.

 

हे बदल छोटे नाहीत, ते व्यवस्थेला हादरवून टाकणार आहेत. न्यायपालिकेतील ‘विशेषाधिकार संस्कृती’ चा अंत आहे.

 

सीजेआयने हे स्पष्ट केले कीः

कोणताही वकील, कितीही ज्येष्ठ असो, आता न्यायालयाची शिस्त मोडत ‘व्ही. आय. पी. ट्रीटमेंट घेऊ शकणार नाही. कोणतेही विशेषाधिकार नाहीत, कोणताही अनधिकृत शॉर्टकट नाही.

 

केवळ ज्या बाबी खरोखरच तातडीच्या आहेत त्या आता लेखी प्रक्रियेद्वारे सूचीबद्ध केल्या जातील.

जर खरोखरच असे झाले तर सरन्यायाधीश साहेबांचे नाव सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

संपादकीय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, इंदापूर यांच्या वतीने आज शनिवार दि. ६ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. इंदापूर शहरात सध्या जाणवणाऱ्या रक्ताच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबवण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून करण्यात आली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि शिकेत्तर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या शिबिरात एकूण ३५ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली.

रक्तदान शिबिराचे आयोजन मुक्ताई रक्तपेढी, इंदापूर आणि एचडीएफसी बँक, इंदापूर यांच्या सहकार्याने करण्यात आले. एचडीएफसी बँक त्यांच्या सीएसआर उपक्रम ‘परिवर्तन’ अंतर्गत देशभरात रक्तदान मोहिमा राबवते आणि एका दिवसात बहु-स्थळी रक्तदानासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा मान मिळवलेला आहे.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के म्हणाले की,
“रक्तदान हे सर्वोत्तम दान आहे. शहरातील रक्तटंचाईच्या पार्श्वभूमीवर आमच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. रक्तदान केल्याने शरीर शुद्धीकरण होते.”

प्रा. गीतांजली कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याची उत्कृष्ठ माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अनिकेत सुर्वे यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. दाजी हुलगे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सुयोजित समन्वय राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा. किरण सातपुते यांनी केले.

या नाविन्य पूर्ण उपक्रमाचे कौतुक चेतना फाऊंडेशनचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळू बोराटे, मुक्ताई रक्त पीढी चे अविनाश ननवरे यांनी करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी भविष्यातही असे सामाजिक उपक्रम सातत्याने राबवावे असे आवाहन केले.

हिंदू धर्मातील गुरुदेव या शब्दाने प्रचलित असे श्री दत्तगुरु महाराज यांची जयंती

इंदापूर तालुका प्रतिनिधी:-रोहन घोगरे

हिंदू धर्मातील गुरुदेव या शब्दाने प्रचलित असे श्री दत्तगुरु महाराज यांची जयंती. आज या दिवसाचे महत्व म्हणजे त्रिदेवांचे एकत्रित स्वरूपात ज्यांनी अवतार कार्य केले आणि गुरुतत्व काय असत हे जगाला सांगितले. शिवाला पुजणारा शैव संप्रदाय, विष्णूला पूजणारा वैष्णव संप्रदाय, शक्तीला पुजणारा शाक्त संप्रदाय त्याचप्रमाणे गुरु तत्वाला म्हणजे दत्त महाराजांची पूजा करणार दत्त संप्रदाय अस्तित्वात आला. हिंदू धर्मात नवनाथ ज्यांनी घडवले वाढवले शिकवले आणि त्रिलोकामध्ये नावारूपास आणले ते म्हणजे दत्त महाराज. नवनाथांचे गुरु दत्त महाराज होत.

आजच्या दिनी विविध ठिकाणी, विविध प्रकारे ,विविध सोहळे आणि उपक्रम राबवत दत्त जयंती साजरी केली जाते. याचप्रमाणे काटी या गावात दत्त जयंती निमित्ताने सोलनकर वस्तीवर जे मंदिर नाविन्याने बांधून पूर्ण झाले होते आणि मागच्या वर्षी याच मुहूर्तावर दत्त महाराज, नवनाथ महाराज, स्वामी समर्थ आणि शिवपिंड या सर्व मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा करत *अण्णा महाराज सोलनकर* यांनी जनकल्याणचा वसा हाती घेतला. तो त्यांनी अविरत सुरू ठेवत या वर्षीदेखील दत्त जयंती चा उत्सव उत्कृष्ट प्रकारे पार पाडला. हे करत असताना मागील वर्षभरापासून दर गुरुवारी, पौर्णिमा, अमावास्या तसेच साधुसंतांचा प्रगटदिना ला दत्त महाराजांची आरती महाप्रसाद तसेच लोकोपयोगी उपक्रम करत एक आदर्श निर्माण केला आहे.

या वर्षी या सोहळ्याच्या निमित्ताने दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होत त्यामध्ये प्रामुख्याने दत्त महाराजांचे भजन नामजप आणि होम हवन त्यानंतर ह भ प काजळताई लोदाडे यांचे कीर्तन झाले. मग सायंकाळी ६ वाजता दत्तजन्म उत्सव व महाआरती पार पडली. त्यानंतर महाप्रसादाने तृप्त होऊन अनेक पंगती उठल्या. २०२४ पासून दत्तकृपा आशीर्वादाने जन्मलेल्या नवजात बालकांना पाळणा आणि वस्त्रदान केले गेले.

अशाप्रकारे दत्त जयंती च्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजन नियोजन करणारे सोलनकर महाराज आणि सेवकवर्ग यांना स्वतः भेटून महाराजांचा आशीर्वाद घेत पुढील काळात आणखी भव्य दिव्य आणि समाजपयोगी उपक्रम या प्रांगणात व्हावेत ही इच्छा व्यक्त केली.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महावितरण आणि एशियन इंफ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (AIIB) यांच्यामध्ये ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ अंतर्गत सौर कृषी पंप लावण्यासाठी ऋण सहाय्य पुरवण्यासंदर्भात करार करण्यात आला.

🔸CM Devendra Fadnavis witnessed agreement signing between Mahavitaran and the Asian Infrastructure Investment Bank (AIIB) to provide loan assistance for installing solar agriculture pumps under the ‘Magel Tyala Saur Krushi Pump Yojana’.

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महावितरण आणि एशियन इंफ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (AIIB) यांच्यामध्ये ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ अंतर्गत सौर कृषी पंप लावण्यासाठी ऋण सहाय्य पुरवण्यासंदर्भात करार करण्यात आला.

रूस के राष्ट्रपति व्लादिमीर पुतिन ने भारत को लेकर बड़ा बयान दिया है।

रूस के राष्ट्रपति व्लादिमीर पुतिन ने भारत को लेकर बड़ा बयान दिया है।

उन्होंने स्पष्ट कहा कि भारत के लिए सभी शिपमेंट बिना रुकावट जारी रहेंगे, और दोनों देशों का व्यापार अब रूबल–रुपया सिस्टम में मजबूत हो रहा है।

पुतिन ने यह भी कहा कि रूस केवल तेल और गैस की बात करने भारत नहीं आया, बल्कि वह ‘मेक इन इंडिया’ में साझेदारी बढ़ाने और हर सेक्टर में रिश्ते मजबूत करने के लिए प्रतिबद्ध है।

सबसे बड़ा ऐलान—

 

भारत और रूस मिलकर देश का सबसे बड़ा न्यूक्लियर पावर प्लांट बना रहे हैं, जो आने वाले वर्षों में ऊर्जा क्षेत्र में ऐतिहासिक बदलाव लाएगा।

 

#Putin #IndiaRussia #BreakingNews #modiputin #panchjanya

 

(Modi Putin, Putin India statement, India Russia relations, Ruble Rupee trade, Russia shipment to India, Putin Make in India support)

बावडा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची अग्नीवीर मध्ये निवड

बावडा प्रतिनिधी
येथील श्रीमत रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयाचा द्वितीय वर्ष वाणिज्य विभागात शिकत असणारा विद्यार्थी सिद्धार्थ राजकुमार कांबळे याची भारतीय सशस्त्र दलातील आग्निवीर यामध्ये निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लहू वावरे यांनी सिद्धार्थ आणि त्याचे वडील राजकुमार कांबळे या दोघांचा सत्कार केला. सिद्धार्थ रेडणी येथील सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा असून कठोर परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर त्याने यश मिळवल्याबद्दल महाविद्यालयाकडून त्याचे कौतुक करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालय सर्व प्राध्यापक उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री हर्षवर्धनजी पाटीलसाहेब, ज्येष्ठ संचालक उदयसिंह पाटील साहेब उपाध्यक्ष मनोज भाऊ पाटील साहेब सचिव किरण काका पाटील व सर्व संचालक मंडळाने सिद्धार्थचे निवडी बद्दल कौतुक करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कै. रावसाहेब कृष्णा खबाले यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त ह. भ. प. कांचनताई लकडे, श्रीगोंदा यांचे फुलांचे कीर्तन

कै. रावसाहेब कृष्णा खबाले यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त ह. भ. प. कांचनताई लकडे, श्रीगोंदा यांचे फुलांचे कीर्तन

संपादकीय

खबाले वस्ती, महादेवनगर शहा ता. इंदापूर येथील आदरणीय व समाजकार्यात अग्रेसर असलेले कै. रावसाहेब कृष्णा खबाले यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त ह. भ. प. कांचनताई लकडे, श्रीगोंदा यांचे फुलांचे कीर्तन पार पडणार आहे. . बुधवार दि. ०३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडणार आहे.

 

कै. रावसाहेब खबाले हे आदर्श व्यक्तिमत्व, समाजशील वृत्ती, तसेच सर्वांना जोडून घेणारा स्वभाव यामुळे परिसरात विशेष ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले होते. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी या पुण्यस्मरण कार्यक्रमात पुष्पवृष्टी, कीर्तन आणि अन्नदान यांसारखे तीन प्रमुख उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

 

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे श्रीगोंदा येथील झी टॉकीज

 

फेम ह.भ.प. कांचनताई लकडे यांचे भक्तिमय फुलांचे कीर्तन. सकाळी १० ते १२ या दरम्यान होणारे हे कीर्तन के. रावसाहेबांच्या कार्याची, विचारांची आणि समाजातील योगदानाची भावपूर्ण आठवण करून देणारे ठरणार आहे.

 

अन्नदानाचा कार्यक्रमानंतर श्रद्धांजली म्हणून उपक्रमही राबविण्यात येणार असून स्थानिक नागरिक, मान्यवर पाहुणे आणि सामाजिक बांधव

 

यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. खवाले वस्ती, महादेवनगर येथे होणाऱ्या या सर्व कार्यक्रमांना समस्त खवाले परिवार योनी सर्वांना सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

 

कै. रावसाहेब कृष्णा खवाले यांच्या प्रेरणादायी कार्याची स्मृती जपण्याचा हा उपक्रम निश्चितच समाजाबद्दलची त्यांची निष्ठा आणि लोकांवरील प्रेम अधोरेखित करणारा ठरेल.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये रक्तपेढ्यां साठी नियामक आवश्यकता वर व्याख्यान

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये रक्तपेढ्यां साठी नियामक आवश्यकता वर व्याख्यान

संपादकीय

रुग्णांच्या रक्त व्यवस्थापनमध्ये फार्मासिस्टची प्रमुख भूमिका या पार्श्वभूमीवर चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे बुधवार ०३ डिसेंबर रोजी रक्तपेढ्यांसाठी नियामक आवश्यकता या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून श्री. अविनाश ननवरे , संस्थापक, मुक्ताई रक्तपेढी, इंदापूर हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भारतातील रक्त पेढ्यांसाठीच्या नियामक आवश्यकतांची चर्चा केली आहे. त्यात १९४० च्या ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स कायद्याअंतर्गत मानवी रक्ताची व्याख्या “औषध” म्हणून केली आहे आणि म्हणूनच रक्तपेढ्या या कायद्यानुसार आणि त्याच्या नियमांनुसार नियंत्रित केल्या जातात. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया द्वारे रक्त पेढ्यांसाठी परवाना प्रक्रिया, अनिवार्य रक्त चाचणी आवश्यकता आणि रक्त आणि रक्त उत्पादनांशी संबंधित व्याख्या यासारख्या प्रमुख मुद्द्यांचा समावेश आहे. या दस्तऐवजात भारतातील रक्त संक्रमण सेवांच्या संरचनेचा आणि रक्तपेढ्यांसाठी नियमन केलेल्या काही प्रमुख क्षेत्रांचा आढावा देखील देण्यात आला आहे, जसे की रक्त दात्यांची निवड आणि गुणवत्ता नियंत्रण.

 

या वेळी चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के म्हणाले कि, आरोग्यसेवेच्या नवीन युगाच्या पार्श्वभूमीवर फार्मसी आणि रक्त संक्रमण औषधांचा वापर वेगाने विकसित होत आहे, ज्यामध्ये गुणवत्ता सुधारण्याची आणि कमी खर्चात चांगले परिणाम मिळण्याची आवश्यकता आहे. आरोग्यसेवा संघांचे सक्रिय सदस्य म्हणून त्यांची नवीन भूमिका पार पाडण्यासाठी आरोग्यसेवा व्यावसायिकांना सहकार्य करण्यासाठी रुग्ण रक्त व्यवस्थापन (PBM) च्या तत्त्वांची आणि फार्मसी आणि रक्तपेढीकडून दिल्या जाणाऱ्या संबंधित उपचारांची चांगली समज असणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. अनावश्यक रक्त संक्रमण, खर्च आणि कमी होत चाललेल्या पुरवठ्याच्या हानीच्या पुराव्यांवरून “जीवन रक्षक” उपचार म्हणून अ‍ॅलोजेनिक रक्त संक्रमणाबद्दलचा पारंपारिक दृष्टिकोन उध्वस्त झाला आहे.

 

या नावीन्यपूर्ण व स्तुत्य उपक्रमासाठी चेतना फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळू बोराटे आदींनी शुभेच्छा देऊन कौतुक केले. प्रास्ताविक प्रा.अनिकेत सुर्वे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. दाजी हुलगे यांनी केले. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सकारात्मक प्रतिसाद दिला.

नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीकरिता पुणे जिल्हा प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीकरिता पुणे जिल्हा प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे दि. 1 : राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 कार्यक्रमाअंतर्गत 2 डिसेंबर रोजी मतदान पार होणार आहे; निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भीडपणे, सुरळीत पार पाडण्याकरिता जिल्हा सज्ज आहे, सर्व नागरिकांनी व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसहिंतेचे पालन करून शांततेत पूर्ण प्रक्रिया पार पाडावे, लोकशाहीचा हा पवित्र उत्सवात सहभागी होऊन पात्र मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

नगरपरिषद,नगरपंचायती सार्वत्रिक निवडणूक 2025 कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा व 3 नगरपंचायत, अध्यक्ष पदाकरिता 76 उमेदवार आणि सदस्य पदाकरिता 955 उमेदवार यांचा समावेश आहे. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 असून आयोगाच्या निर्देशानुसार मतदानापुर्वी मॉक पोल घेतला जाणार आहे. नगरपरिषद व नगरपंचायतीच्या प्रचार समाप्तीनंतर आणि मतदानाच्या दिवशी म्हणजे 2 डिसेंबर 2025 रोजी मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे किंवा समाज माध्यमांमध्ये कुठल्याच प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध अथवा प्रसारित करता येणार नाहीत.

पुणे जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा व 3 नगरपंचायती मिळून एकूण 524 मतदान केंद्रे आहेत जिथे एकूण 4 लाख 51 हजार 25 मतदार ( यामध्ये पुरुष 2 लाख 27 हजार 142 तर महिला 2 लाख 23 हजार 407 व इतर 23) मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संघात 26 नोव्हेंबर 2025 च्या अधिसूचनेद्‌वारे शासनाने 2 डिसेंबर 2025 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असून ही सार्वजनिक सुट्टी मतदार संघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदारसंघाच्या बाहेर असतील त्यांना सुद्धा लागू आहे. नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रातील केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालय निम्न शासकीय कार्यालय, सार्वजनिक उपक्रम बँका इ. ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.

जिल्ह्यात एकूण 13 ठिकाणी पिंक मतदान केंद्रे, जिथे मतदान केंद्रावरील सर्व अधिकारी कर्मचारी या महिला आहेत, व 15 ठिकाणी आदर्श मतदान केंद्रे उभारण्यात आलेली आहेत. सर्व मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, आदी अधिकारी, कर्मचारी मिळून एकूण 3 हजार 21 कार्यरत असणार आहेत. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी पर्याप्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच १६०८ बीयू व ८२३ सीयू प्रक्रियेसाठी तयार करण्यात आले आहेत व सर्व कर्मचारी वर्ग (पोलींग पार्टी) सर्व साहित्यासहित आपआपल्या मतदान केंद्रावर पोहोचले असून 2 डिसेंबर 2025 रोजीच्या मतदान प्रक्रियेसाठी सुसज्ज आहेत.

मतदानाच्या पूर्वतयारीचा आढावा घेऊन लोकशाहीचा हा पवित्र उत्सव साजरा करताना सर्व मतदान अधिकारी यांनी मा. राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार जबाबदारीने आपले कर्तव्ये बजाविण्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी संबंधिताना सूचना दिल्या आहेत.

error: Content is protected !!