Home Blog

महत्त्वाची सूचना मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या…

महत्त्वाची सूचना मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे. या अनुषंगाने पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद) कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशातील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा. दूतावास नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक सूचना जारी करत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने परदेशातील महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क असून केंद्र शासन व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आपत्कालीन संपर्क तपशील रामल्लाह (पॅलेस्टाईन) फोन : +970592916418 ईमेल : repoffice@mea.gov.in / cons.ramallah@mea.gov.in दोहा (कतार) फोन : 00974-55647502 ईमेल : cons.doha@mea.gov.in रियाध (सौदी अरेबिया) फोन : 00-966-11-4884697 WhatsApp : 00-966-542126748 टोल फ्री : 800 247 1234 ईमेल : cw.riyadh@mea.gov.in तेल अवीव (इस्रायल) फोन : +972-54-7520711 / +972-54-2428378 ईमेल : cons1.telaviv@mea.gov.in तेहरान (इराण) फोन : +989128109115 / +989128109109 / +989128109102 / +989932179359 अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात) टोल फ्री : 800-46342 WhatsApp : +971543090571 ईमेल : pbsk.dubai@mea.gov.in / ca.abudhabi@mea.gov.in कुवैत फोन : +96565501946 ईमेल : community.kuwait@mea.gov.in बाहरीन फोन : 00973-39418071 मस्कत टोल फ्री : 80071234 WhatsApp : +96898282270 ईमेल : cw.muscat@mea.gov.in / cons.muscat@mea.gov.in जॉर्डन फोन : 00962-770 422 276 बगदाद (इराक) फोन : +964 771 651 1185 / +964 770444 4899 वेबसाइट :eoibaghdad.gov.in ईमेल : cons.baghdad@mea.gov.in / cons1.baghdad@mea.gov.in / pol.baghdad@mea.gov.in

चेतना फाउंडेशनच्या “UDAAN – Wings of Culture” वार्षिक सांस्कृतिक स्नेहसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

चेतना फाउंडेशनच्या “UDAAN – Wings of Culture” वार्षिक सांस्कृतिक स्नेहसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

संपादकीय

सरडेवाडी (इंदापूर) : चेतना फाउंडेशन अंतर्गत चेतना इंटरनॅशनल स्कूल, ज्युनिअर कॉलेज तसेच चेतना कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “UDAAN – Wings of Culture” वार्षिक सांस्कृतिक स्नेहसंमेलन २०२६ अत्यंत उत्साहपूर्ण व दिमाखदार वातावरणात संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा व बौद्धिक गुणवत्तेचा संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागतगीताने वातावरण मंगलमय झाले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. विलास नाळे (पोलीस निरीक्षक, इंदापूर ग्रामीण) यांची विशेष उपस्थिती लाभली. संस्थेचे अध्यक्ष श्री. उदय देशपांडे, सचिव श्री. विलास भोसले, खजिनदार श्री. सोमनाथ माने, सदस्य श्री. बाळासाहेब बोराटे तसेच सर्व व्यवस्थापन पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत भाषण प्रा. प्रांजली सुतार यांनी केले. त्यांनी “UDAAN – Wings of Culture” या संकल्पनेद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा उद्देश स्पष्ट केला.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत क्रीडा, सांस्कृतिक व बौद्धिक क्षेत्रातही प्रगती करण्याचे महत्त्व सांगितले.

प्रमुख पाहुणे मा. श्री. विलास नाळे यांनी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे कौतुक करत शिस्त, आत्मविश्वास व सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे यश निश्चित मिळते, असा प्रेरणादायी संदेश दिला.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्य, समूह नृत्य, नाटिका, देशभक्तीपर सादरीकरणे व विविध सांस्कृतिक कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांमधील विजेत्यांचा तसेच राष्ट्रीय स्तरावरील क्विझ स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मान्यवरांनी विशेष कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. गीतांजली कांबळे व डॉ. निलेश सोनवणे यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. प्राजक्ता झगडे तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. पायल निकम यांनी आभार प्रदर्शन करून उपस्थित मान्यवर, व्यवस्थापन, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

या भव्य सांस्कृतिक सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा व बौद्धिक क्षमतेला व्यासपीठ मिळाले असून “UDAAN – Wings of Culture” या संकल्पनेला खऱ्या अर्थाने उंच भरारी मिळाल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.

श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा.

 

बावडा दि. 27 भाषा हे व्यक्त होण्याचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. मराठी भाषा ही समृद्ध व संपन्न भाषा आहे. अनेक भाषेतील शब्द मराठी भाषेमध्ये सहज सामावले आहेत आणि म्हणून मराठी भाषा संवर्धन करणे हे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन प्राध्यापक सिद्धार्थ चितारे यांनी केले. बावडा (ता. इंदापूर) येथील श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयामध्ये शुक्रवार (दि.27) रोजी आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. मराठी ही अभिजात भाषा असून ती आपली मातृभाषा असल्याने मातृभाषेतून ज्या सहजतेचा अविष्कार होतो तो इतर भाषेतून दिसून येत नाही. असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागाच्या प्राध्यापिका सौ. अर्चना हरिहर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लहु वावरे उपस्थित होते. एक मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हापासून मराठीला राज्य भाषेचा दर्जा मिळाला आहे. आजचा हा दिवस मराठी भाषेची समृद्धी, तिची प्राचीनता आणि सांस्कृतिक वारसा तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी साजरा केला जातो.असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणात केले. याप्रसंगी कार्तिकी गायकवाड, प्रियंका खंडागळे, इम्रान काझी या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिका उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ.पूजा पाटील यांनी केले, तर प्रा. सौ. शितल शेटे यांनी आभार मानले. संस्थेचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन पाटील सचिव किरणराव पाटील आणि सर्व संचालक मंडळ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

न्यू लीफ इंग्लिश मीडियम स्कूल सरडेवाडी या ठिकाणी राष्ट्रीय विज्ञान दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला

न्यू लीप इंग्लिश मीडियम स्कूल सरडेवाडी या ठिकाणी आज दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक सहभागी झाली होते

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी तसेच विज्ञान काय आहे हे शिकण्यासाठी छोटे छोटे प्रयोग विद्यार्थ्यांनी केले त्यामध्ये पाण्याची घनता ट्रॅफिक सिग्नल व हवेचा दाब असे छोटे छोटे प्रयोग लहान मुलांनी अगदी व्यवस्थित केले होते त्यांची मांडणी योग्य प्रकारे करून हवेचा दाब कसा निर्माण होतो हवा कशी प्रसरण पावते ज्वलनासाठी ऑक्सिजनची का गरज आहे आदि प्रयोग करून विद्यार्थ्यांनी त्याची सर्व व्यवस्थित मांडणी पालक आणि शिक्षकांसमोर केली

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्ष सौ पद्मजा ताई पाटील सचिव श्री पी डी पाटील साहेब प्राचार्य कैलास खबाले सौ रणनवरे मॅडम सौ राऊत मॅडम पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता

 

कोलंबिया निवडणुकीसाठी आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून सोलापूरचे जिल्हाधिकारी आशीर्वाद कुमार यांची निवड  

कोलंबिया निवडणुकीसाठी आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून सोलापूरचे जिल्हाधिकारी आशीर्वाद कुमार यांची निवड

 

सोलापूरचे जिल्हाधिकारी कोलंबियात आंतरराष्ट्रीय निरीक्षक

सोलापूर, दिनांक 27:- सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. कुमार आशीर्वाद यांची प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जबाबदारीसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोकलिंगम सेथुरामन यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय शिष्टमंडळ 6 ते 10 मार्च 2026 दरम्यान कोलंबिया प्रजासत्ताकात अधिकृत दौऱ्यावर जाणार आहे.

या शिष्टमंडळाला कोलंबियाच्या Consejo Nacional Electoral चे प्रमुख यांच्याकडून 8 मार्च रोजी होणाऱ्या काँग्रेस निवडणुकीसाठी आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. भारताच्या निवडणूक आयोगाच्या Global Engagement for Electoral Excellence (GEEE) या उपक्रमांतर्गत ही नियुक्ती झाली असून, महाराष्ट्र राज्याला कोलंबियाशी विशेष संवाद व अनुभवविनिमयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

शिष्टमंडळातील सदस्यांमध्ये श्री. आशीर्वाद कुमार यांच्यासह श्री. मनोहर रामचंद्र पारकर (संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी), श्री. प्रीयेश महाजन (निवडणूक नोंदणी अधिकारी, रामटेक), श्री. सागर शिर्के (बूथ लेव्हल अधिकारी, नाशिक) यांचा समावेश आहे.

या दौऱ्यात भारतीय निवडणूक व्यवस्थेचा अनुभव जागतिक स्तरावर पोहोचविणे, तसेच कोलंबियातील निवडणूक प्रक्रियेचे निरीक्षण करून सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करणे हे उद्दिष्ट आहे.

सोलापूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची या आंतरराष्ट्रीय निरीक्षण मोहिमेसाठी निवड झाली असून, यामुळे भारतीय निवडणूक व्यवस्थेतील पारदर्शकता व विश्वासार्हतेला जागतिक मान्यता मिळत आहे.

जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

२७ फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा होतो. मराठी साहित्यात मानाचे स्थान असणारे वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा हा जन्मदिवस.मराठी भाषादिन मोठया उत्साहाने महाराष्ट्रात साजरा होतो. ज्ञानेश्वरांनी उभारलेल्या भक्कम पायावरच मराठीची परंपरा उभी आहे. संत तुकाराम महाराजांनी तर मराठीला वैभवाच्या शिखरावर बसवलं वि.स.खांडेकर, पू .ल.देशपांडे, आचार्य अत्रे, कुसुमाग्रज अशी अनेक थोर रत्नांची खाण मराठी भाषेत आढळते.

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.📖📖📚📚 💐💐

श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयात मूल्यशिक्षण कार्यशाळा संपन्न

 

बावडा दि. 26 फेब्रुवारी येथील श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय पर्यावरण संवर्धन मूल्य शिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी चार सत्रात ही कार्यशाळा संपन्न झाली.

पहिल्या सत्रात कार्यशाळेचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे संचालक मा. श्री उदयसिंह पाटीलसाहेब यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. या सत्रात प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर लहू वावरे यांनी केले. आपलं प्रस्ताविकात त्यांनी मानवी विकासात बरोबरच पर्यावरणाचा समतोल सुद्धा साधने आवश्यक असल्याचे प्रतिपादन करून पर्यावरण संवर्धनासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पर्यावरण मूल्यशिक्षण कार्यशाळा आयोजित केली असल्याचे सांगितले. कार्यशाळेचे उद्घाटक माननीय उदयसिंह पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये विकासाबरोबर पर्यावरण समतोल साधने अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन करून अशी कार्यशाळा महाविद्यालयात आयोजित केल्याबद्दल सदर उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. प्राध्यापिका सौ. दीप्ती पाटील यांनी पहिल्या सत्रातील आभार प्रदर्शन केले. दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुसऱ्या सत्रात कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर येथील डॉक्टर संदीप शिंदे यांनी पर्यावरण आणि शाश्वत विकास या विषयावर आपले विचार व्यक्त केले. शाश्वत विकासाच्या नावाखाली आपण पर्यावरणाचा इतका नाश केलेला आहे की आपण पुढच्या पिढीला काही देऊ शकू की नाही अशी शंका निर्माण झाली आहे. हरितक्रांतीच्या नावाखाली संस्कृत बियाणे रासायनिक खते कीटकनाशके यांच्या अतिरेकी वापरामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. असे प्रतिपादन डॉ. संदीप शिंदे यांनी केले. दुसऱ्या सत्राचे प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक सिद्धार्थ चितारे यांनी केले. तर आभार प्रदर्शन यांनी केले.

कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रात कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाचे डॉ. मोहम्मद मुलानी यांनी पर्यावरण आणि मानव या विषयावर मार्गदर्शन केले. मानवाच्या विकासाच्या हव्यासापोटी पर्यावरणातील जैवविविधता नष्ट होत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. या सत्राचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक प्रवीण घोगरे यांनी केले तर आभार यांनी मानले.

कार्यशाळेच्या चौथ्या सत्राचे प्रस्ताविक धामण नावाच्या प्राध्यापक ताजी लोंढे यांनी केले. आणि विज्ञान महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभाग प्राध्यापक उत्तम माने यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात येऊन समारोप समारंभाने कार्य शाळेची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक असो पूजा पाटील यांनी केले. या कार्यशाळेसाठी एक चमचा मधला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय इंदापूर, विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय इंदापूर, कला महाविद्यालय, भिगवण विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब, छत्रपती महाविद्यालय भवानीनगर आणि जिजामाता महाविद्यालय सराटी या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

न्यू लीफ इंग्लिश मीडियम स्कूल सरडेवाडीया ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी

न्यू लिफ इंग्लिश मीडियम स्कूल सरडेवाडी या ठिकाणी आज दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होतात

या कार्यक्रमा वेळी विद्यार्थ्यांसाठी शिवगर्जना राजमुद्रा भाषण पोवाडे आदींचे आयोजन करण्यात आले होते प्रत्येक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला त्यांना मार्गदर्शन सौ रननवरे मॅडम सौ राऊत मॅडम यांनी तयारी करून घेतली होती

या कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा सौ पद्मजाताई पाटील सचिव पी डी पाटील साहेब प्राचार्य कैलास खबाले सर उपस्थित होते .सुरुवातीला राजांच्या प्रतिमेचे पूजन झाले त्यानंतर पोवाडे व भाषण झाले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रननवरे मॅडम यांनी केले आभार सौ राऊत मॅडम यांनी केले व खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे स्पर्धा परीक्षा GPAT मार्गदर्शन सत्र प्रेरणादायी वातावरणात संपन्न

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे स्पर्धा परीक्षा GPAT मार्गदर्शन सत्र प्रेरणादायी वातावरणात संपन्न

संपादकीय

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, सरडेवाडी, इंदापूर येथे आज बुधवार दि. 11 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1.00 वाजता विद्यार्थ्यांसाठी GPAT परीक्षेच्या तयारीसाठी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पुणे येथील ‘अकॅडमी ऑफ फार्मास्युटिकल एक्सलन्स’चे संस्थापक श्री. मोहन राव अड्डी हे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

या सत्रात श्री. अड्डी यांनी GPAT परीक्षेची रचना, अभ्यासक्रमाचे सखोल विश्लेषण, महत्त्वाचे विषय, गुणांकन पद्धती, तसेच स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या रणनीती याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून विद्यार्थ्यांना कोणत्या विषयांवर अधिक भर द्यावा, कोणत्या चुका टाळाव्यात आणि वेळेचा योग्य वापर कसा करावा याचे मार्गदर्शन केले.

तसेच, नियमित अभ्यास, पुनरावलोकन (Revision), मॉक टेस्ट्स, नोट्स तयार करणे, आत्ममूल्यांकन आणि मानसिक तयारी यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. अपयशाला न घाबरता सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते, असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला.

विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले आणि वैयक्तिक अभ्यासयोजनेचे महत्त्व स्पष्ट केले. या सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

 

या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री उदय देशपांडे , सचिव श्री. विलास भोसले, खजिनदार श्री. सोमनाथ माने सर , सदस्य श्री.बाळासाहेब बोराटे , तसेच प्राचार्य डॉ.गणेश म्हस्के सर यांची प्रमुख उपस्थिती होती.व्यवस्थापन मंडळ, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

 

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. ऋतुजा धायगुडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी केले .

कर्तव्य पथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा गौरव

कर्तव्य पथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा गौरव

नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनी सादर झालेल्या महाराष्ट्राच्या ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या चित्ररथाने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून, याचे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केले. सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने मिळालेला हा बहुमान आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री यांना प्रदान करण्यात आला.

या चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राची अष्टविनायक परंपरा आणि गणेशोत्सवातील सार्वजनिक सहभागाचे दर्शन घडवण्यात आले होते. तसेच या उत्सवामुळे मूर्तीकाम, सजावट आणि वाद्य निर्मिती क्षेत्रात लाखो हातांना मिळणाऱ्या रोजगाराचे प्रभावी सादरीकरण यात करण्यात आले होते. मुख्यमंत्री यांनी चित्ररथाच्या या यशाचे आणि चमूचे भरभरून कौतुक केले.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!