Home इंदापूर तालुका श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयात मूल्यशिक्षण कार्यशाळा संपन्न

श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयात मूल्यशिक्षण कार्यशाळा संपन्न

0
श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयात मूल्यशिक्षण कार्यशाळा संपन्न

 

बावडा दि. 26 फेब्रुवारी येथील श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय पर्यावरण संवर्धन मूल्य शिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी चार सत्रात ही कार्यशाळा संपन्न झाली.

पहिल्या सत्रात कार्यशाळेचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे संचालक मा. श्री उदयसिंह पाटीलसाहेब यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. या सत्रात प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर लहू वावरे यांनी केले. आपलं प्रस्ताविकात त्यांनी मानवी विकासात बरोबरच पर्यावरणाचा समतोल सुद्धा साधने आवश्यक असल्याचे प्रतिपादन करून पर्यावरण संवर्धनासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पर्यावरण मूल्यशिक्षण कार्यशाळा आयोजित केली असल्याचे सांगितले. कार्यशाळेचे उद्घाटक माननीय उदयसिंह पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये विकासाबरोबर पर्यावरण समतोल साधने अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन करून अशी कार्यशाळा महाविद्यालयात आयोजित केल्याबद्दल सदर उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. प्राध्यापिका सौ. दीप्ती पाटील यांनी पहिल्या सत्रातील आभार प्रदर्शन केले. दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुसऱ्या सत्रात कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर येथील डॉक्टर संदीप शिंदे यांनी पर्यावरण आणि शाश्वत विकास या विषयावर आपले विचार व्यक्त केले. शाश्वत विकासाच्या नावाखाली आपण पर्यावरणाचा इतका नाश केलेला आहे की आपण पुढच्या पिढीला काही देऊ शकू की नाही अशी शंका निर्माण झाली आहे. हरितक्रांतीच्या नावाखाली संस्कृत बियाणे रासायनिक खते कीटकनाशके यांच्या अतिरेकी वापरामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. असे प्रतिपादन डॉ. संदीप शिंदे यांनी केले. दुसऱ्या सत्राचे प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक सिद्धार्थ चितारे यांनी केले. तर आभार प्रदर्शन यांनी केले.

कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रात कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाचे डॉ. मोहम्मद मुलानी यांनी पर्यावरण आणि मानव या विषयावर मार्गदर्शन केले. मानवाच्या विकासाच्या हव्यासापोटी पर्यावरणातील जैवविविधता नष्ट होत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. या सत्राचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक प्रवीण घोगरे यांनी केले तर आभार यांनी मानले.

कार्यशाळेच्या चौथ्या सत्राचे प्रस्ताविक धामण नावाच्या प्राध्यापक ताजी लोंढे यांनी केले. आणि विज्ञान महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभाग प्राध्यापक उत्तम माने यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात येऊन समारोप समारंभाने कार्य शाळेची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक असो पूजा पाटील यांनी केले. या कार्यशाळेसाठी एक चमचा मधला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय इंदापूर, विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय इंदापूर, कला महाविद्यालय, भिगवण विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब, छत्रपती महाविद्यालय भवानीनगर आणि जिजामाता महाविद्यालय सराटी या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!