Home Blog Page 3

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये उत्साहात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा – स्वयंसेवकांनी राबवली स्वच्छता मोहीम

इंदापूर – आज दिनांक २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करत असताना सामाजिक बांधिलकी व जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, या उद्देशाने चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, इंदापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) दिवस मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कक्षा मार्फत सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवत महाविद्यालय परिसरात व आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली.

कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना समाजसेवा, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. “स्वच्छते पासूनच समृद्ध आरोग्याचा आरंभ होतो. म्हणूनच प्रत्येक नागरिकाने आणि विशेषतः युवकांनी या मोहिमेत पुढाकार घेतला पाहिजे,” असे ते म्हणाले.

 

यानंतर NSS युनिट चे सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन महाविद्यालय परिसरात, प्रवेशद्वाराजवळ, उद्यान भागात तसेच आसपासच्या रस्त्यांवर झाडू मारून, कचरा गोळा करून स्वच्छतेचे कार्य हाती घेतले. या उपक्रमात स्वयंसेवकांनी “स्वच्छ भारत – स्वस्थ भारत” या संदेशा सह नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जन जागृतीही केली. परिसर स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व पटवून देणारे फलकही या वेळी लावण्यात आले.

या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, महाविद्यालयातील शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच संपूर्ण NSS विभागाचे स्वयंसेवक पूर्ण उत्साहाने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी सामूहिक श्रमदानातून समाजसेवेचा आदर्श ठेवत परिसरात स्वच्छता राखण्याचा संदेश दिला.

 

राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त राबवलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी, श्रमप्रतिष्ठा आणि एकात्मतेची भावना अधिक बळकट झाली. यामुळे परिसरात स्वच्छतेबाबत एक सकारात्मक संदेश पसरला असून, नागरिकांमध्येही जागरुकता निर्माण झाली आहे.

या स्तुत्य उपक्रमाचे चेतना फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. उदय देशपांडे, सचिव मा. श्री. विलास भोसले, खजिनदार मा. श्री. सोमनाथ माने, सदस्य मा. श्री. बाळू बोराटे व इतर मान्यवरांनी विशेष कौतुक करून सर्व विद्यार्थ्यांचे व आयोजकांचे अभिनंदन केले.

शासकी योजना पोचवण्यात अनुलोमचे कार्य उल्लेखनिय विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, 

अनुगामी लोकराज्य मह पुणे विभाग

पुणे, शासननामा न्यूज (दि २२ सप्टेंबर) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अनुलोम संस्थेच्या माध्यमातून शासकीय अधिकारी आणि अनुलोम मित्रांचा परिचय मेळावा पुण्यातील मॉडर्न कॉलेज च्या सभागृहात संपन्न झाला. पुणे विभागाच्या या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, प्रमुख पाहुणे म्हणून ऑपरेशन सिन्दुर चे कमांडिंग ऑफिसर विंग कमांडर आणि राष्ट्रपती पदक विजेते देवेंद्र अवताडे उपस्थित होते.

यावेळी बोलताना विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी “सरकारी प्रयत्नांना जनसहभागाची साथ” असे ब्रीद वाक्य असणाऱ्या अनुलोम च्या कामाबद्दल कौतुक केले. सरकारी योजना पोचवत असतानाच सामाजिक भावना जपत अनुलोम चे सर्व कार्यकर्ते निरपेक्ष भावनेने तळागाळापर्यंत पोचत आहेत. पुढील काळात स्वच्छता आणि आरोग्य या विषयावर मोठे काम उभे करण्यासाठी अनुलोम च्या सर्व अनुलोम मित्रांनी शासनाला मदत करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले.

भारतीय वायू सेनेमध्ये विंग कमांडर म्हणून कार्यरत असलेले आणि राष्ट्रपती यांच्या कडून गौरव करण्यात आलेले देवेंद्र औताडे यांनी राबवलेल्या ऑपरेशन सिन्दुर च्या यशाचे गमक उपस्थितांना सांगताना सर्व अनुलोम मित्र भारावून गेले होते.

पहिल्या सत्रात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष पुणे जिल्हा प्रमुख डॉ. मानसिंग साबळे, पुणे मनपा चे मुख्य समाज विकास अधिकारी रामदास चव्हाण, पुणे जिल्ह्याचे कृषी अधीक्षक संजय काचोळे आणि जिल्हा उद्योग केंद्राचे पुणे जिल्हा व्यवस्थापक यशवंत गायकवाड या शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या खात्यातील सरकारी योजनांबद्दल सर्व अनुलोम मित्रांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे विभाग प्रमुख शिरीष भालेकर, सूत्रसंचालन उपविभाग जनसेवक सौरभ शिंगाडे, तसेच आभार प्रदर्शन विभाग संवादिनी सुनंदा ताई आदिक यांनी केले. यावेळी अनुलोमचे प्रांत प्रमुख स्वानंदजी ओक, चंद्रकांत पवार विजय मोरगुलवार, संध्या पुरोहित आणि पुणे जिल्ह्यातील सर्व जनसेवक उपस्थित होते.

सेट परीक्षेत अमोल बाळासाहेब बंडगर सरांचे यश

श्रीपूर (ता. माळशिरस): शिक्षण ही फक्त नोकरी मिळविण्याची साधनं नसून समाजाला दिशा देणारी, संस्कार रुजवणारी आणि व्यक्तिमत्त्व घडवणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत शिक्षक ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. श्रीपूर (ता. माळशिरस) येथील श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेले सहशिक्षक अमोल बाळासाहेब बंडगर यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी (SET) मध्ये यश संपादन करून विद्यार्थ्यांसाठी तसेच संपूर्ण शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.

बंडगर सरांनी जीवन विज्ञान या विषयामधून 15 जून 2025 रोजी पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र SET परीक्षेला बसले होते. 30 ऑगस्ट 2025 रोजी निकाल जाहीर झाला असता ते यशस्वी ठरले. यामुळे ते आता सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरले आहेत. SET परीक्षा ही UGC मान्यताप्राप्त आणि महाराष्ट्र तसेच गोवा राज्यांतील उच्चशिक्षण संस्थांमध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्तीसाठी आवश्यक असलेली अत्यंत प्रतिष्ठेची पात्रता मानली जाते.

सध्या बंडगर सर अकरावी-बारावी विज्ञान शाखेत सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना विषय समजावून देताना त्यांची पद्धत, संयम आणि विज्ञान विषयाची आवड विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करते. “शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकापुरते ज्ञान नसून जीवन जगण्याची कला आहे,” हे ते प्रत्यक्ष अध्यापनातून विद्यार्थ्यांना पटवून देतात.

काल निकाल जाहीर झाल्यानंतर अमोल बंडगर सरांना सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव झाला. माजी विद्यार्थी, सहकारी शिक्षक, मित्रपरिवार आणि शिक्षण क्षेत्राशी निगडित अनेकांनी त्यांचे कौतुक केले. त्यांच्या या यशामुळे श्रीपूरसह माळशिरस तालुक्याचा अभिमान वाढला आहे.

अमोल बंडगर यांचे यश हे केवळ वैयक्तिक नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि तरुण शिक्षकांना दिशा देणारे आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती चिकाटी असेल तर यश नक्की मिळते, हे त्यांनी सिद्ध केले आहे.

श्रीपूर परिसरातील विद्यार्थी व पालकवर्ग त्यांच्या या यशाकडे अभिमानाने पाहत आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांनी आणखी उंच भरारी घ्यावी, अशी सर्वांचीच अपेक्षा आहे.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मार्फत करिअर मार्गदर्शनावर विशेष अतिथी व्याख्यान आयोजित

शनिवार दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी चेतना फाउंडेशन संचालित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी तर्फे आज कालठण नं.1 इंदापूर येथील जिजाऊ महाविद्यालय येथे करिअर मार्गदर्शनावर एक विशेष अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या शक्यता, तयारी आणि योग्य दिशा निवडण्यासाठी उत्तम मार्गदर्शन केले, तसेच प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्रे व त्यांचे महत्त्व समजून सांगितले. टेक्निकल एज्युकेशन घेण्यासाठी आवश्यक असलेल्या स्पर्धा परीक्षेच्या तयारी करण्याचे आवाहन केले.

 

या व्याख्यानात विद्यार्थ्यांनी मोठ्या स्वारस्याने भाग घेतला. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उत्साहाने प्रतिसाद दिला आणि त्यांच्या भविष्यासाठी प्रेरणा घेतली.जिजाऊ महाविद्यालयाच्या प्राचार्य जगताप मॅडम तसेच चेतना फार्मसी चे प्रा. चिंतामणी रणवरे आणि दत्ता कडवळे यांचे सहकार्य मिळाले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याच्या नियोजनात मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विजय भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळू बोराटे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

आंतरमहाविद्यालयीन जल्लोष युवक महोत्सवात इंदापूर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भरघोस यश

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17/09/2025 रोजी दादा पाटील महाविद्यालय कर्जत जि अहमदनगर या ठिकाणी आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवात कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारात सहभाग नोंदविला. यामध्ये प्रामुख्याने वादविवाद स्पर्धेत अक्षय यादव आणि सायली मखरे या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक-सुवर्णपदक मिळाले तसेच भारतीय वैयक्तिक गायन स्पर्धेत सरदार मुलाणी या विद्यार्थ्याला तृतीय क्रमांक-कांस्य पदक प्राप्त झाले तसेच ओंकार कदम या विद्यार्थ्याला तालवाद्य या प्रकारात द्वितीय क्रमांक-रौप्य पदक मिळाले या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन पाटील सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, कला विभाग प्रमुख डॉ. भरत भुजबळ, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर तसेच वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सदाशिव उंबरदंड यांनी अभिनंदन केले व पुढील विभागीय फेरीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. तानाजी कसबे व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रज्ञा लामतुरे, प्रा. प्रकाश करे प्रा. सचिन आरडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

चेतना इंटरनॅशनल स्कूल जुनियर कॉलेजमध्ये 14 सप्टेंबर हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

संपादकीय,

चेतना इंटरनॅशनल स्कूल जुनियर कॉलेज सरडेवाडी येथे 14 सप्टेंबर हिंदी दिवस आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे सचिन विलास भोसले ,

खजिनदार सोमनाथ भोसले संस्थेच्या सदस्य व चेतना इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल निकिता माने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

नर्सरी पासून ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी अत्यंत उत्सुकतेने व आनंदाने कार्यक्रमांमध्ये सहभागी होते. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहिले

युवराज शिंदे सर यांनी हिंदी दिवसाचे महत्त्व समजावून सांगून तसेच हिंदी दिवसाचे प्रस्तावना 1938 साली महात्मा गांधींनी केली होती परंतु 26 जानेवारी 1950 ला संविधान लागू झाल्यानंतर 14 सप्टेंबरला अधिकृत हिंदी दिवस म्हणून घोषित करण्यात आले.

तसेच रिटा घोष मॅडम यांनी हिंदी दिवसाबद्दल सांगताना म्हणाले की हिंदी दिवसाची सुरुवात देवनागरी मधून झाली

कार्यक्रमाचे आयोजन प्रांजली सुतार मॅडम यांनी केले व सर्व कार्यक्रम पूर्णपणे पार पाडण्यास सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर!

राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर!

 

1. ठाणे -सर्वसाधारण (महिला)

2. पालघर – अनुसुसूचित जमाती

3. रायगड- सर्वसाधारण

4. रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

5. सिंधुदुर्ग – सर्वसाधारण

6. नाशिक -सर्वसाधारण

7. धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

8. नंदूरबार-अनुसूचित जमाती

9. जळगांव – सर्वसाधारण

10. अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला)

11. पुणे -सर्वसाधारण

12. सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

13. सांगली – सर्वसाधारण (महिला)

14. सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग

15. कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)

16. छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण

17. जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

18. बीड – अनुसूचित जाती (महिला)

19. हिंगोली -अनुसूचित जाती

20. नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग

21. धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

22. लातूर – सर्वसाधारण (महिला)

23. अमरावती – सर्वसाधारण (महिला)

24. अकोला – अनुसूचित जमाती (महिला)

25. परभणी – अनुसूचित जाती

26. वाशिम अनुसूचित जमाती (महिला)

27. बुलढाणा -सर्वसाधारण

28. यवतमाळ सर्वसाधारण

29. नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग

30. वर्धा- अनुसूचित जाती

31. भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग

32. गोंदिया – सर्वसाधारण (महिला)

33. चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)

34. गडचिरोली -सर्वसाधारण (महिला)

आता प्रत्येक ग्रामपंचायतीत आपले सरकार सेवा केंद्र उपलब्ध ; जिल्ह्यात 1062 केंद्र सुरु

पुणे दि.११ सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा)ग्रामविकास विभागाने अधिसूचित केलेल्या सेवांचा विस्तार करत राज्य शासनाच्या विविध विभागांच्या एकूण 1062 सेवा आता थेट प्रत्येक ग्रामपंचायतीत कार्यरत होणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. यासाठी ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय दि. 28 जानेवारी 2025 रोजी जाहीर करण्यात आला असून, ग्रामपंचायत पातळीवरील आपले सरकार सेवा केंद्र हे अधिकृतरीत्या स्वीकृत करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील 1087 ग्रामपंचायतींसाठी युजर आयडी व पासवर्ड मिळविण्यासाठी जिल्हा परिषदे मार्फत महाआयटीला माहिती देण्यात आली होती. जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांच्या प्रयत्नातून आतापर्यंत 1014 ग्रामपंचायतींना युजर आयडी व पासवर्ड प्राप्त झाले आहेत. सदर आयडी व पासवर्ड मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. सुहास मापारी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत अधिकारी व केंद्रचालक यांची कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेमध्ये सेवा केंद्र सुरू करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले असून तालुका पातळीवर हँड्स-ऑन ट्रेनिंगचे आयोजन करण्यात येणार आहे. लवकरच ग्रामपंचायत पातळीवर सेवा केंद्र सुरू झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना विविध सेवांचा दिलासा एका ठिकाणी मिळणार असून ग्रामपंचायतींच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे.

नागरिकांना आता सरकारी सेवा अन् योजना व्हॉट्अपवर मिळणार डिजिटाइज पद्धतीने सेवा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्नमुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

मुंबई-मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा सेवा हमी कायदा केला होता, याची आपल्याला कल्पना आहे. आता आपले सरकारचे व्हर्जन जुने झाले असून आपण समग्र नावाच्या संस्थेशी करार केला आहे. त्यानुसार, नागरिकांना कोणत्या योजनांची निकड आहे, याचा अभ्यास केला आहे. आता आपण डिजिटाइज पद्धतीनं सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. लोकांकडून जी मागणी येते, त्यात सेवा आणि योजनांची मागणी येते. त्यामुळे, डिजिटाइज पद्धतीने सेवा देण्याचं काम सरकार सुरू करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच, नागरिकांना आता व्हॉट्सअपवर सेवा मिळणार आहेत, त्यामध्ये 200 सेवा आणि योजना 26 जानेवारीपर्यंत नागरिकांना डिजिटाइज पद्धतीने मिळण्यास सुरुवात होणार आहे, असेही मुख्यमंत्र्‍यांनी म्हटले.

राज्यात सेवा आणि सुविधांसंदर्भातील डिजिटाइज पद्धतीचा पहिला टप्पा 26 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. तर, 200 सेवा आणि योजना 26 जानेवारीपर्यंत आणि संपूर्ण सेवा 1 मे पर्यंत पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्र्‍यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सरकारकडील रेकॉर्ड वरुनच आपण माहिती भरणार आहोत. त्यामुळे, आपले सरकारचं हे दुसरं व्हर्जन येत आहे. त्यामध्ये, 4 टप्पे असतील, त्यामुळे नागरिकांना केलेला अर्ज सध्या कुठे आहे? हेही पाहाता येणार आहे. लोकांना डिजिटल सेवा मिळणं आणि प्रेडेक्टिबल होणार, व्हॉट्सॲपवर देखील सेवा उपलब्ध करुन देणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे, शासन दरबारी मारावे लागणारे खेटे कमी होतील, असेच दिसून येत आहे.

महाराष्ट्रातील गुंतवणुकीत आपण जी आघाडी घेतली आहे, ती पुन्हा एकदा 1 लाख 500 हजार कोटींवर गेली असून याचे करार झाले आहेत. त्यामुळे, आज याचा आनंद वाटतो आहे, ज्यातून 47 हजार जणांना रोजगार मिळेल. डेटा सैंटरची उभारणी रायगडमध्ये होईल, नाशिकमध्ये नंदूरबारमध्ये 2100 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे, ज्यातून 600 लोकांना रोजगार मिळेल. विदर्भात रिलायन्स फूड पार्क आणि शीतपेय पार्क तयार करणार आहोत. तिथे 1500 कोटींची गुंतवणूक करणार आहोत. अदानींची देखील 70 हजार कोटींची गुंतवणूक असणार आहे, असे म्हणत राज्यातील उद्योजकीय गुंतवणुकीवर मुख्यमंत्र्‍यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

सी. पी. राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती

सी. पी. राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती

 

*नवी दिल्ली:-उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना इंडिया आघाडीचे उमेदवार न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली, तर रेड्डी यांना केवळ 300 मते मिळाली आहेत. निवडणुकीत क्रॉस वोटिंगमुळे विरोधकांच्या दाव्यांना मोठा धक्का बसला. राधाकृष्णन शुक्रवार 12 सप्टेंबर रोजी भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत.*

 

*👉🅾️🅾️👉आमच्या उमेदवाराला ३१५ मते मिळतील, असे दावा इंडिया आघाडीकडून केला गेला होता. परंतु प्रत्यक्षात ३०० मतेच मिळाल्याने इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला. ईव्हीएममधून मतचोरी होत असल्याचा मुद्दा पुढे करून विरोधी पक्षाकडून मतपत्रिकेचा आग्रह होत असताना मतपत्रिकेवरच झालेल्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे १५ खासदार फुटल्याने इंडिया आघाडीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बी सुदर्शन रेड्डी १०० टक्के जिंकतील, असा दावा इंडिया आघाडीकडून होत होता. सत्ताधाऱ्यांमधील काही पक्ष संतुष्ट नसल्याचे सांगून आम्ही या निवडणुकीत इतिहास घडवू, असेही इंडिया आघाडीकडून सांगितले जात होते.*

 

*👉🔴🔴👉परंतु इंडिया आघाडीचेच १५ खासदार फुटल्याने बिहार विधानसभा निवडणुकीआधी विरोधी पक्षाला सर्वांत मोठा झटका बसला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याचे कारण देऊन आपला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मी यांच्याकडे पाठवला. त्यांच्या राजीनाम्यामुळे घटनेनुसार उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक घेणे कायद्याने अनिवार्य होती. एनडीकडून सी. पी. राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली. ९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदासाठी मतदान झाले. आज सायंकाळी साडे सात वाजता जाहीर झालेल्या निकालानुसार सी. पी. राधाकृष्णन यांना विजयी म्हणून घोषित करण्यात आले आहे.*

error: Content is protected !!