Home Blog Page 53

मतदानाच्या आणि आधीच्या दिवशी प्रसिद्ध करावयाच्या मुद्रित माध्यमातील जाहिराती प्रमाणीत करुन घेणे बंधनकारक

पुणे, दि. १२: मतदानाच्या आणि एक दिवस आधीच्या दिवशी मुद्रित माध्यमात (प्रिंट मीडिया) प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व-प्रमाणीत करुन घेणे बंधनकारक आहे. पूर्व- प्रमाणीत करुन घेतल्याशिवाय जाहिराती प्रसिद्ध करू नयेत असे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश असून त्यांचे तंतोतंत पालन व्हावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी म्हणजेच दि. २० नोव्हेंबर २०२४ आणि मतदानाच्या एक दिवस आधी (दि. १९ नोव्हेंबर) मुद्रित माध्यमातून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसू शकेल अशा जाहिराती प्रसिद्ध होऊ नयेत याबाबत दक्षता घेण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत.

कोणताही राजकीय पक्ष किंवा उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी या तारखेला प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती प्रमाणीत करुन घ्याव्यात. प्रमाणीकरणाचे अर्ज जाहिरात प्रसिद्धीच्या किमान २ दिवस अगोदर एमसीएमसी समितीकडे सादर करावेत, असेही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ. दिवसे यांनी कळविले आहे.

मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास अन्य १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी

पुणे, दि. १२: मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्र जवळ नसल्यास अन्य १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असल्याचेही ते म्हणाले.

पुणे जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत २० नोव्हेंबर रोजी २१ मतदारसंघात मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी ही माहिती दिली आहे. छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र आहे अशा मतदारांनी मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र सादर करावे.

छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र (जॉब कार्ड), बँक किंवा टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक, श्रम मंत्रालयाच्या योजनेंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), स्थायी खाते क्रमांक (पॅन कार्ड), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय) यांनी दिलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), छायाचित्र असलेली निवृत्तीवेतनविषयक कागदपत्रे, केंद्र अथवा राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले, छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र या १२ पुराव्यांचा समावेश आहे.

मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती चिठ्ठी आणि मतदार छायाचित्र ओळखपत्र असल्यास मतदार ओळखपत्र किंवा वरील १२ पैकी कोणताही एक पुरावा सोबत न्यावा.

*मतदान केंद्रात मोबाईलला बंदी*
मतदानाचे चित्रीकरण, छायांकन करुन गोपनीयता भंग करणे हा निवडणूकविषयक गुन्हा आहे. त्यादृष्टीने मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी आहे. मतदानावेळी मतदान केंद्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मतदानाची गोपनीयता भंग होऊ नये, यासाठी मतदारांनी मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाऊ नये. मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. दिवसे यांनी केले आहे.

मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास अन्य १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी

पुणे, दि. १२: मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्र जवळ नसल्यास अन्य १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असल्याचेही ते म्हणाले.

पुणे जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत २० नोव्हेंबर रोजी २१ मतदारसंघात मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी ही माहिती दिली आहे. छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र आहे अशा मतदारांनी मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र सादर करावे.

छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र (जॉब कार्ड), बँक किंवा टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक, श्रम मंत्रालयाच्या योजनेंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), स्थायी खाते क्रमांक (पॅन कार्ड), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय) यांनी दिलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), छायाचित्र असलेली निवृत्तीवेतनविषयक कागदपत्रे, केंद्र अथवा राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले, छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र या १२ पुराव्यांचा समावेश आहे.

मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती चिठ्ठी आणि मतदार छायाचित्र ओळखपत्र असल्यास मतदार ओळखपत्र किंवा वरील १२ पैकी कोणताही एक पुरावा सोबत न्यावा.

*मतदान केंद्रात मोबाईलला बंदी*
मतदानाचे चित्रीकरण, छायांकन करुन गोपनीयता भंग करणे हा निवडणूकविषयक गुन्हा आहे. त्यादृष्टीने मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी आहे. मतदानावेळी मतदान केंद्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मतदानाची गोपनीयता भंग होऊ नये, यासाठी मतदारांनी मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाऊ नये. मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. दिवसे यांनी केले आहे.

हिजबुल्लाहचा इस्रायलवर मोठा हल्ला; १६५ हून अधिक क्षेपणास्त्रे डागली; हायफामध्ये हाहाकार

जेरुसलेम:- हिजबुल्लाहने इस्रायलवर मोठा हल्ला केला आहे. हिजबुल्लाहने इस्रायलच्या उत्तरेकडील भागात एकापाठोपाठ एक १६५ हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यात एका मुलासह सात जण जखमी झाले. तसेच, काही इमारती जमीनदोस्त झाल्याची माहिती समोर येत आहे.*

 

*👉🟥🟥👉इस्रायलची हवाई संरक्षण यंत्रणा आयर्न डोम देखील हा हल्ला रोखण्यात अपयशी ठरली आहे. यामध्ये अनेक वाहनांना आग लागली आहे. हायफावरील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला होता, ज्यामध्ये हिजबुल्लाहने सलग दोन हल्ल्यांमध्ये अंदाजे ९० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. पहिल्या हल्ल्यांदरम्यान ८० क्षेपणास्त्रे डागली. आयडीएफने सांगितले की, बहुतेकांना रोखण्यात आले, परंतु अनेक लक्ष्यित निवासी क्षेत्रे आहेत. टाईम्स ऑफ इस्रायलच्या अहवालानुसार, १० क्षेपणास्त्रांची दुसरी लाट एकतर रोखली गेली किंवा खुल्या भागात पडली. इस्रायली लष्कराने सांगितले की, आम्ही आमच्या नागरिकांचे हिजबुल्लाहच्या हल्ल्यांपासून संरक्षण करत राहू. दुसरीकडे, इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिदोन सार यांनी लेबनॉनसोबतच्या युद्धविराम चर्चेबाबत निश्चित प्रगती होत असल्याचे म्हटले आहे.*

 

*👉🔴🔴👉याचबरोबर, गॅलीलीवर जवळपास ५० क्षेपणास्त्रे डागली आहेत. त्यापैकी काही हवाई संरक्षण यंत्रणेने हाणून पाडली. कारमील परिसरात आणि आसपासच्या शहरांमध्ये अनेक क्षेपणास्त्रे पाडली, असे इस्रायली लष्कराने सांगितले. दरम्यान, हिजबुल्लाहने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. कारमील परिसरातील पॅराट्रूपर्स ब्रिगेडच्या प्रशिक्षण तळाला लक्ष्य करण्यात आल्याचा दावा हिजबुल्लाहने केला आहे. हिजबुल्लाहच्या या हल्ल्यानंतर काही वेळेने इस्रायली लष्कराने म्हटले की, लेबनॉनमधून प्रक्षेपित केलेल्या ड्रोनला मलाकियाच्या उत्तरेकडील किबुट्झवर हवाई संरक्षणाद्वारे रोखण्यात आले. लेबनॉनचा आणखी एक ड्रोन पश्चिम गॅलीलीमधील लिमन शहराजवळील मोकळ्या भागात क्रॅश झाला, ज्यामुळे झाडाला आग लागली. यामुळे शहरवासियांमध्ये खळबळ उडाली.*

सत्ता की लालची MVA गठबंधन की फिर से हार तय है:- अमित शहा

सत्ता की लालची MVA गठबंधन की फिर से हार तय है, क्योंकि महाराष्ट्र की जनता मोदी जी के नेतृत्व वाली महायुति के साथ है। घाटकोपर पूर्व विधानसभा में आयोजित जनसभा को संबोधित कर रहा हूँ।

निवडणुका निर्भय, भयमुक्त, निःपक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी समन्वयाने कामे करा- विशेष निवडणूक निरीक्षक राम मोहन मिश्रा

पुणे, दि.१२: मतदारसंघात आदर्श आचारसंहिता नियमांचे उल्लघंन होत असल्यास त्याबाबत कडक कारवाई करावी. निवडणुका निर्भय, भयमुक्त, निःपक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत, असे निर्देश विशेष निवडणूक निरीक्षक राम मोहन मिश्रा यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, निवडणूक निरीक्षक मानवेश सिंह सिद्धू, ललीत कुमार, भीम सिंह, पीगे लिगू, संजीव कुमार, के हिमावती, अरुंधती सरकार, गार्गी जैन, एम गौतमी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे, सामान्य प्रशासन उपायुक्त वर्षा लड्डा-उंटवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर, निवासी उपजिल्हाधिकारी तथा आचार संहिता कक्षाच्या समन्वयक ज्योती कदम, जिल्हा नियत्रंण कक्षाच्या समन्वय अधिकारी ज्योती कावरे प्रत्यक्ष उपस्थित होते.

श्री. मिश्रा म्हणाले, निवडणुकीच्या अनुषंगाने कारवाई करताना भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतत पालन होईल, याची दक्षता घेण्यात यावी. मतदान केंद्रांमधील नियोजन, पोलीस प्रशासनाची तयारी, वाहतूक नियोजन, मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेले नियोजन आदी बाबींचा आढावा घेतला. पुणे जिल्हा प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीबाबत समाधान व्यक्त करतानाच निवडणुकीची सर्व प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाला शुभेच्छा दिल्या.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने विभागातील जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला आहे. सी-व्हिजील ॲपवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर वेळेत कार्यवाही करण्यात येते. निवडणुकीत पैशाचा वापर, अंमली पदार्थ, मद्य, मौल्यवान धातू आदी बाबींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. भरारी पथक (एफएसटी), स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी), व्हिडीओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), व्हिडीओ पाहणी पथक (व्हिव्हिटी), आदर्श आचारसंहिता कक्ष (एमसीसी) पथकांद्वारे चांगले काम करण्यात येत आहे.

श्री. फुलारी म्हणाले, आंतरराज्य सीमेवर असणारे कोल्हापूर, सोलापूर, सांगली या जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची नियमितपणे तपासणी केली जात आहे. यामध्ये पैसा, अंमली पदार्थ, मद्य, मौल्यवान धातू आदी बाबींच्या अनुषंगाने तपासणी केली जात आहे, यापुढे ही कारवाई अशीच सुरू राहील, असेही श्री. फुलारी म्हणाले.

डॉ. दिवसे म्हणाले, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी २० नोव्हेंबर २०२४ या मतदानाच्या दिवशी उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांनी अधिकारी, कामगार, कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणुका मुक्त आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यांनी मतदारांना कोणताही त्रास न होता मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी करण्याकरीता जिल्हा प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली.

बैठकीनंतर श्री. मिश्रा यांनी माध्यम कक्षाला भेट देऊन विविध माध्यमांमधील जाहिराती आणि पेड न्यूजबाबत कक्षातर्फे करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती घेतली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक योगेश बोराटे यांनी कक्षातील कामकाजाविषयी माहिती दिली.

भारताचे 51 वे सरन्यायाधीश बनले संजीव खन्ना

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी देशाचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ
डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना (Justice Sanjiv Khanna) यांनी आज (११ नोव्हेंबर) देशाचे ५१ वे सरन्यायाधीश (51st Chief Justice of India) म्हणून शपथ घेतली.

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी घेतला इंदापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राचा आढावा

पुणे, दि. १०: जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी शनिवारी (९ नोव्हेंबर) इंदापूर विधानसभा मतदारसंघातील नारायण रामदास हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि इंदापूर आर्टस्, सायन्स, कॉमर्स कॉलेज येथील मतदान केंद्रांना भेट देऊन सुविधेबाबत आढावा घेतला.

 

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कल्याण पांढरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जीवन बनसोडे, सुशील पवार, निवडणूक नायब तहसीलदार विजय घुगे, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे आदी उपस्थित होते.

 

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी सूचना दिल्या, सर्व मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी व्हीलचेअर, बसण्यासाठी बाकडे, खुर्चा, आवश्यक तेथे सावलीसाठी मंडपव्यवस्था करण्यात यावी. मागणी केलेल्या दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांना घरापासून मतदान केंद्रावर आणण्यासाठी आणि मतदानानंतर घरी सोडण्यासाठी वाहनाची व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.

 

त्यांनी तहसील कार्यालय येथील टपाली मतदान कक्ष, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व इटीपीबीएस मतदार कक्ष, शासकीय धान्य गोदाम कालठण रोड इंदापूर येथील ईव्हीएम स्ट्रॉंग रुमला भेट देऊन पाहणी केली व मतदान केंद्रावरील सुविधांबाबत सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी घेतला इंदापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राचा आढावा

पुणे, दि. १०: जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी शनिवारी (९ नोव्हेंबर) इंदापूर विधानसभा मतदारसंघातील नारायण रामदास हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि इंदापूर आर्टस्, सायन्स, कॉमर्स कॉलेज येथील मतदान केंद्रांना भेट देऊन सुविधेबाबत आढावा घेतला.

 

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कल्याण पांढरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जीवन बनसोडे, सुशील पवार, निवडणूक नायब तहसीलदार विजय घुगे, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे आदी उपस्थित होते.

 

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी सूचना दिल्या, सर्व मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी व्हीलचेअर, बसण्यासाठी बाकडे, खुर्चा, आवश्यक तेथे सावलीसाठी मंडपव्यवस्था करण्यात यावी. मागणी केलेल्या दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांना घरापासून मतदान केंद्रावर आणण्यासाठी आणि मतदानानंतर घरी सोडण्यासाठी वाहनाची व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.

 

त्यांनी तहसील कार्यालय येथील टपाली मतदान कक्ष, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व इटीपीबीएस मतदार कक्ष, शासकीय धान्य गोदाम कालठण रोड इंदापूर येथील ईव्हीएम स्ट्रॉंग रुमला भेट देऊन पाहणी केली व मतदान केंद्रावरील सुविधांबाबत सूचना दिल्या.

दौंड व इंदापूर विधानसभा मतदारसंघात ३३ लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त

पुणे, दि. ९ : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड विभागाअंतर्गत २ ऑक्टोबर २०२४ पासून दौंड आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघात विशेष मोहिम राबवून एकूण ३३ लाख ८९ हजार ८९१ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक विजय रोकडे यांनी दिली आहे.

मोहिमेदरम्यान केलेल्या कारवाईत एकूण ६१ गुन्हे नोंदविण्यात आले असून दरम्यान एकूण ५८ आरोर्पीना अटक करण्यात आली. अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या एकूण २ चारचाकी व ७ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मितीचा कारखाना दोन वेळा उद्धवस्त केला आहे.

या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक विजय रोकडे, दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरुक, मयूर गाडे, दिनेश ठाकूर, सहायक दुय्यम निरीक्षक सुवास पोळ, जवान अशोक पाटील, संकेत वाजे, प्रविण सूर्यवंशी, सौरभ देवकर, जवान-नि-वाहन चालक केशव वामने यांनी सहभागी होते.

error: Content is protected !!