Home Blog Page 291

शिवशाही शेतकरी संघटना शेतकरी हिता साठि लढणार :-नितीन आरडे

*ऊसाला भाव नाही, दुधाला भाव नाही, शेतमालाला भाव नाही, भाजीपाल्याला भाव नाही, पण बाजारात मात्र साखरेचे, दुधाचे, तरकारी चे भाव गगनाला भिडले आहेत.*

*त्याचा फायदा मात्र शेतकऱ्यांना नाही. आजचा शेतकरी त्यामुळे तर कर्जबाजारी आहे. एका बाजूला ग्राहकांची लूट तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची लूट असली लुटारू व्यवस्था निर्माण करणारे राज्यकर्ते आणि व्यवस्था मोडण्याचे संकल्प केलेली “शिवशाही शेतकरी संघटना.”*

*सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी उभारलेल्या संस्था या शेतकऱ्यांच्या असण्याऐवजी सहकार आणि साखर सम्राटांच्या कधी झाल्या हे समजलेच नाही. तिथला सभासद शेतकरी म्हणजे मालक ना!*
*पण आजच्या काळात मालकच नोकरांना आणि विश्वस्तांना विनंती करतो. त्यांच्या हातापाया पडतो. माझा ऊस तोडून न्या, माझे दूध घ्या ही परिस्थिती कुणी आणली. इतकी दयनीय अवस्था शेतकऱ्यांची कोणी केली. शेतकऱ्यांना देशोधडीला कोणी लावले ? या सर्वांची उत्तरे शोधण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सन्मान प्राप्त करून देण्यासाठी आपण “शिवशाही शेतकरी संघटने”ची स्थापना केली आहे.*

*सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या चुलीपर्यंत नाती जोडून शेतकऱ्यांना भिकेला लावण्याचे उद्योग अनेक वर्षापासून सुरू आहेत. परंतु ऊस तोडणीचा हंगाम आला. की शेतकरी संघटना जाग्या होतात. तर कधीमधी दुधाच्या दराबाबत आवाज उठवतात. पण खरेच त्यांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळतो का ?*
*हा न्याय मिळवायचा असेल तर शिवशाही शेतकरी संघटनेत सामील व्हा.*

*संस्थापक अध्यक्ष*
*मा.नितीन (दादा )आरडे*
*शिवशाही शेतकरी संघटना*
*महाराष्ट्र राज्य*
*. मो.9665551000*

डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून तहसिल कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन

पुणे जिल्हा अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून तहसिल कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन

बारामती दि.26:- छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त तहसिल कार्यालय, बारामती येथे छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.
तहसिल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, निवासी नायब तहसिलदार धनंजय जाधव, संजय गांधी योजना नायब तहसिलदार महादेव भोसले, निवडणूक नायब तहसिलदार पी. डी. शिंदे, उपविभागीय कार्यालयातील नायब तहसिलदार भक्ती सरवदे तसेच तहसिल व उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतला बारामतीतील कोरोना

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतला बारामतीतील कोरोना
प्रार्दुभाव परिस्थितीसह उपाययोजनांचा व विकास कामांचा आढावा
* कोरोना रूग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी यंत्रणा प्रभावीपणे राबवा
* हॉट स्पॉट ठिकाणे कमी कशी होतील याकडे लक्ष द्या
* कोरोन तपासणी वाढवा
– जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

बारामती दि.26:- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी यंत्रणा प्रभावीपणे राबवा.बारामती ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. हॉट स्पॉट ठिकाणे कशी कमी करता येतील याकडे लक्ष द्या.कोरोना तपासणी वाढवा, हॉट स्पॉट असलेल्या गावात लग्न समारंभ व इतर कार्यक्रमाला परवानगी देऊ नये. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेवून आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज दिले.
बारामती येथील तहसिल कार्यालयात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील, तहसिलदार विजय पाटील, निवासी नायब तहसिलदार धनंजय जाधव, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, उपसंचालक वैद्यकीय विभाग पुणे डॉ. बिलोलीकर, जैव वैद्यकीय अभियंता, आरोग्य विभाग पुणे जुन्नरकर सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, एकात्मिक विकास समन्वय व पुनर्वलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेता सचिन सातव आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी देशमुख म्हणाले की, हॉट स्पॉट असलेल्या गावातील रूग्णसंख्या पंधरा दिवसांत कमी करण्यासाठी प्रयत्न करा. तसेच तालुक्यातील प्रत्येक रूग्णालयातील फायर ऑडिट वेळेत पूर्ण करा. शासकीय रूग्णालयातील प्रस्तावित असलेले ऑक्सिजन ओटीचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे. प्रत्येक रूग्णालयामध्ये सिलेंडरच्या माध्यमातून ऑक्सिजनचा पुरेसा साठा करून ठेवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर म्युकरमायकोसिसच्या रूग्णांवर वेळेत आणि योग्य ते उपचार तात्काळ होणे गरजेचे आहे.सर्व रुग्णालयात ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था सुनिश्चित करणे. म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी वापरण्यात येणा-या इंजेक्शनचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. गर्दी जर कमी होत नसेल तर बंधने लावणे आवश्यक आहे. सुरक्षित मातृत्व योजनेंतर्गत दर महिन्याच्या 9 तारखेला गरोदर महिलांची तपासणी करण्यात यावी , हाय अलर्ट गावांची संख्या मर्यादित ठेवणे आवश्यक आहे.

यावेळी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, लहान मुलांच्या पालकांचे लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे, गरोदर महिलांची यादी तयार करावी. त्याची जबाबदारी आशा वर्करवर सोपवावी. गरोदर महिलांची तपासणी वेळेत पूर्ण करून त्यांना रूग्णालयात योग्य वेळी दाखल करण्याचे नियोजन करण्यात यावे. कोरोना रूग्णांची संख्या कोठे वाढत आहे त्याचे वार्ड बाय वार्ड मॅपिंग करून योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. रूग्णालयातील उपकरणांचे योग्य व्यवस्थापन होणे देखील आवश्यक आहे. उपकरणांची इन्व्हेंटरी तयार करून नोंदी घ्या, त्याचा उपयोग कसा करावा याबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. जी गावे कायमस्वरूपी हॉट स्पॉट होत आहेत तेथे गावस्थरावरील समिती व यंत्रणा तयार करावी. जेणेकरून तेथे रूग्णांची संख्या कमी होईल. ज्या गावामध्ये समिती कार्यान्वित आहे तेथील रोजच्या परिस्थितीवर नजर ठेवून तपासणी करा. असेही ते यावेळी म्हणाले.
उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी तालुक्यामधील हॉट स्पॉट असलेल्या गावांची तसेच शहर व ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठीच्या उपाययोजना, संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी, ऑक्सिजन, म्युकरमायकोसिसच्या औषधांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत सादरीकरणाव्दारे माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
कोरोना आढावा बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी बारामतीमधील सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेवून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कामाची सद्यस्थिती जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी विकासकामांच्या सर्व प्रकारच्या मान्यता घेणे , निविदा सूचना काढणे, कामांचा आराखडा तयार करणे इत्यादी कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
या बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी क्रीडा संकुल, कन्हेरी येथील रोपवाटीका व शिवसृष्टी, कऱ्हा नदी सुधार प्रकल्प, रूई ग्रामीण रूग्णालय येथील मोड्युलर रूग्णालय, महिला रूग्णालय, शासकीय आयुर्वेदीक मेडीकल कॉलेजची मेडद येथील नियोजित जागा इत्यादी विकासकामांची पहाणी केली. पहाणी वेळी खासदार सुप्रिंया सुळे , टाटा हॉस्पिटल मुंबईचे डॉ. श्रीखंडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच या पाहणीनंतर श्रीरामनगर जामदार रोड येथील कोविडने मृत्यू झालेल्या ज्ञानदेव पांडुरंग ढोले यांच्या कुटूंबातील सदस्यांची जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी विचारपूस करून सांत्वन केले. ज्ञानेश्वर ढोले हे त्यांच्या घरातील कर्ते पुरूष होते. त्यांच्या घरातील हालाखीची परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना या कुटूंबास संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मदत व मंजूर घरकुलाचे प्रकरण तात्काळ मार्गी लावावे, अशा सूचना दिल्या.

सेवा हाच धर्म :- मा.आ.बच्चु कडु

सेवा हाच धर्म

 

तुम्ही दुखा:त असाल , संकटात असाल तर आमचा विचार करा जरा तुमच्या डोक्यात राजकारणाच भुत असेल तर इतरांचा विचार करा

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद ‘आमदार निलेश लंकेंचा मोठा गौरव’

आमदार निलेश लंकेंचा मोठा गौरव, ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद

नमोन्युजनेशन परीवार,

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही एका आमदाराचं नाव महाराष्ट्रात कौतुकानं घेतलं गेलं. या आमदाराचं कोविड सेंटर राज्यात चर्चेचा विषय ठरला. हजारो रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर हसू उलटविण्याचं काम कोरोनाच्या भीतीदायक, त्रासदायक काळात या माणसानं केलं. त्या, आमदार निलेश लंकेंना आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड (लंडन) ने निलेश लंकेंच्या कार्याचा गौरव करत त्यांचा सन्मान केला.
कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल आज मला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला हा सन्मान भेटला ही खुप मोठी गोष्ट आहे. हे सगळे शक्य झाले माझ्यावरती प्रेम करणाऱ्या मायबाप जनतेमुळे व सहकाऱ्यांमुळे, असे ट्विट निलेश लंके यांनी केलं आहे. लंकेच्या कामगिरीची महाराष्ट्राने, राष्ट्रवादीने आणि विदेशातील भारतीयांनीही दखल घेतली होती. त्यातूनच, लंडन येथील बुक ऑफ रेकॉर्ड्स या पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला आहे.

* 1100 बेडचं कोविड सेंटर उभारलं *

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मतदारसंघातील नागरिकांनी आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशातून आमदार निलेश लंके यांनी भाळवणी (ता. पारनेर) येथे अकराशे बेडचे कोविड सेंटर उभारलं. त्यातील शंभर बेडला ऑक्सिजनची सुविधा होती. प्रत्येक रूग्णांसाठी स्वतंत्र थर्मास, मास्क, स्टिमर, नॅपकिन, पाणी बॉटली, साबण आदी मूलभूत सुविधा दिल्या जात आहे. २४ तास पिण्यासाठी, आंघोळीसाठी, वापरण्यासाठी गरम पाणी. सकस जेवण. दूध, अंडी, सूप आदींचा समावेश यामध्ये आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार आयुर्वेदिक काढे दिले जात आहे.

* विदेशातून मिळाली मदत *

निलेश लंके यांनी केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वसमावेशक मदत घेऊन, वर्गणी आणि देणगीतून हे कोविड सेंटर उभारलं. तसेच लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरला परदेशातूनही आर्थिक मदत मिळाली. आतापर्यंत पॅरिस, दुबई, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, पोलंड आणि कॅनडा या देशातून आर्थिक मदत मिळाली. इतकेच नाही तर काही परदेशी नागरिकांनी देखील निलेश लंके प्रतिष्ठानच्या बँक खात्यात पैसे जमा केले आहेत. केवळ परदेशातून १ कोटी २० लाख रुपयांची आर्थिक मदत निलेश लंके यांना मिळाली आहे.

* लोकमतनेही केलं सन्मानित *

मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित रूग्ण आढळत आहेत. जनतेची होणारी हेळसांड लक्षात घेऊन अत्याधुनिक, सुसज्ज असे ‘शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिर ’ या नावाने पुन्हा एकदा भाळवणी येथे कोविड सेंटर सुरू केले. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही निलेश लंके यांनी लोकांसाठी कोविड सेंटर उभारलं होतं. त्याची पोहोच पावती म्हणून ‘लोकमत’ने ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इअर’ या पुरस्कारने सन्मानित केले होते, असं निलेश लंके यांनी सांगितले.

* जयंत पाटलांनी भेट घेऊन केलं कौतुक *

आमदार निलेश लंके यांनी संकटाच्या काळात दुःख वाटून घेतले आहे. माणुसकीचं नातं कसं जपावं हे त्यांनी दाखवले. शरद पवार यांचा कार्यकर्ता म्हणून ते शोभतात. जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा शरद पवार सामान्यांसाठी धावून जातात त्याचप्रमाणे निलेश लंके काम करत आहेत,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कौतुक केले आहे. पाटील यांनी लंकेंच्या कोविड सेंटरला भेट देऊन त्यांच्यावर कौतुकाची थाप मारली होती.

*पुणे जिल्हयात अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये अधिकार प्रदान*

*पुणे जिल्हयात अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये अधिकार प्रदान*

पुणे, दि. 22:- पुणे ग्रामीण जिल्ह्यात विविध भागात कोरोना विषाणुचा प्रसार मोठया प्रमाणात होत आहे. त्याकरीता नागरीकांच्या संचार करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच अलीकडील काळात पुणे ग्रामीण जिल्ह्यात विविध मागण्याकरीता विविध पक्ष व संघटनाकडून दुध आंदोलने, इतर आंदोलने, रॅली, मोर्चे, निदर्शने इत्यादीचे आयोजन केले जात आहे. 23 जून 2021 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा आहे. वरील कारणास्तव पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती उदभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी कायदेशीर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व सर्व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना 20 जून 2021 रोजी 00.5 वाजता पासून 3 जुलै 2021 रोजी 24.00 वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे अधिकार प्रदान केले असल्याचे त्यांनी प्रसिदधी पत्रकान्वये कळविले आहे.
रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे त्यांनी वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी या विषयी निर्देश देणे, अशा कोणत्याही मिरवणुका या कोणत्याही मार्गाने कोणत्या वेळात काढव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करणे, सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी व उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याहुन किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे यासाठी योग्य ते आदेश देणे, सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये घाट किंवा घाटावर सर्व धक्क्यावर व धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरणेच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणेसाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे, व इतर वाद्ये वाजविणे व गाणी गाण्याचे ,शिंगे व इतर कर्कश वाद्ये वाजविणे विनियम करणे व त्यावर नियंत्रण ठेवणेसाठी योग्य ते आदेश देणे, कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून ध्वनीक्षेपकाचा (लाऊड स्पीकर) उपयोग करणेचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणेसाठी योग्य ते आदेश देणे, सक्षम प्राधिकाऱ्यानी या अधिनियमांनी कलम 33,35,37, ते 40,42,43 व 45 अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधिन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे हे अधिकार प्रदान केले असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

विरळा एखादा डॉ. ल.म.आसबे ( कामधेनु परिवार )

*विरळा एखादा*
प्रवाहाच्या विरोधात उभे रहाला ताकद लागते आणि त्याच्या विरोधात प्रवास करायला त्यापेक्षाही जास्त ताकद लागते. अशी प्रवाहाच्या विरोधात उभी राहणारी माणसे आणि प्रवाहाच्या विरोधात प्रवास करणारी माणसे समाज लक्षात ठेवतो आणि इतिहासात त्याची नोंद होते. प्रवाहाबरोबर वाहणारी माणसे, काळाच्या प्रवाहाबरोबर त्यांचे अस्तित्व वाहून जाते आणि नेस्तनाबूत होते.
भगवंताने आपल्याला माणूस म्हणून जन्माला घालताना, सर्व काही देऊन, परिपूर्ण अवस्था दिलेली आहे. त्याच्या देण्यामध्ये कोणताही भेदभाव नाही, मग *आपण जन्माला येऊन सार्थ काय केले ?* हा प्रश्न प्रत्येकाने सतत स्वतःला विचारला पाहिजे.
*जन्मा आलो त्याचे l आजी फळ झाले साचे ll*
*तुम्ही सांभाळले संती l भय निरसली खंती ll*
आपण जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनाचे फळ ठरवले पाहिजे, ध्येय निश्चित केले पाहिजे आणि त्यानुसारच आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण कारणी लावला पाहिजे. असे सूत्रबद्ध जीवन ज्या व्यक्तीचे असते, त्याचे अस्तित्व निर्माण होत असते.
समाजधारणा ही नेहमी सुखासीन असते. फारसे कष्ट न करता, जे चालले आहे, ते ठीक आहे, अशा अवस्थेतच माणसे जगत असतात आणि शेवटी मरत असतात. प्रबोधनकार ठाकरे म्हणतात,
*जन्मा आला हेला आणि कसातरी जगून मेला l*
जीवन अमूल्य आहे, आपल्याला त्याची किंमत वेळेवर कळाली, तर आपल्या जगण्याचेही सोने होते. आज देश आर्थिक दृष्ट्या रसातळाला चाललेला आहे, बेकारी वाढत आहे, भ्रष्टाचार वाढत आहे, गुन्हेगारी, व्याभिचारी वृत्ती यांचा तर महापूर आलेला आहे, निसर्ग कोपला आहे, रोगराई वाढलेली आहे, या प्रवाहात येईल ते सहन करत बहुतांशी समाज जगत आहे. *या प्रवाहाच्या विरोधात खंबीरपणाने ताठ उभे राहणे आणि परिस्थितीशी दोन हात करणे, हा खरा पुरुषार्थ आहे.*
मी स्वतःसाठी जगत जगत, माझ्या राष्ट्राचा आणि समाजाचा विचार करणे गरजेचे आहे. आपल्या जीवनातील काही भाग हा राष्ट्रासाठी आणि समाजासाठी राखीव ठेवून, दान केला पाहिजे. हा प्रवाहाच्या विरोधातील प्रवास आहे. माझेच भागत नाही आणि मी दुसऱ्याला काय देऊ शकतो ? ही विचारसरणी प्रवाहाबरोबर वाहत जाणारी आहे.
आपला कोणालातरी आधार वाटणे, यासाठी आपण खंबीरपणाने ताठ उभे असलो पाहिजे. आज आपल्याला ही संधी प्रत्येक क्षेत्रात उपलब्ध आहे. *आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा हा सर्वात अनुकूल काळ आहे.* प्रतिकूल काळातच आपल्या शौर्याची गरज असते आणि प्रतिकूल काळच आपल्या शौर्यासाठी आणि कर्तुत्वसाठी सर्वात अनुकूल असतो.
यावनी सत्तेच्या वरवंट्याखाली भरलेला समाज, शिवरायांच्या जन्माच्या वेळची प्रतिकूलता होती. माँसाहेब जिजाऊंनी आणि राजे शहाजींनी प्रवाहाच्या विरोधात खंबीरपणे उभे राहण्याचे धाडस दाखवले आणि शिवरायांना प्रवाहाच्या विरोधात पोहायला लावून त्यांना अजरामर केले.
*चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा l आवश्यक तो सेवक येर वावगी खटपट ll*
आपली गणना नेहमी अशा *विरळा एखादा,* यामध्ये व्हावी, यासाठी अखंड प्रयत्न करावा.
डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.
मो.नं.9822292713.

महाराष्ट्राची प्रसिध्द गायिका “राधा खुडे चा सत्कार “

महाराष्ट्राची प्रसिध्द गायिका “राधा खुडे चा सत्कार ” :- शहाजीराजे भोसले संपादक :- शिव कल्याण न्युज

इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील राधा खुडे हिने आपल्या आवाजाने संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करून सुर नवा ध्यास नवा या रियलिटी शो मधुन तृतीय क्रमांक मिळविला . वालचंदनगर येथे तिच्या घरी जावून शिव-कल्याण संस्था समुहाचे संस्थापक अध्यक्ष शहाजीराजे भोसले, प्रशांत खंडागळे, कळंब सोसायटीचे माजी चेअरमन संजय खरात, गणेश चव्हाण ( सर ) , बी.जी.जाधव ( सर ) यांनी तिचा सत्कार केला व गायन या क्षेत्रात करियर साठी शुभेच्छा दिल्या.

🇮🇳 *भारत | पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले जगातील सर्वोत्कृष्ट नेते!*

🇮🇳 *भारत | पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले जगातील सर्वोत्कृष्ट नेते!*

🔸 *देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगभरातील लोकप्रियता कायम असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरातील सर्वाधिक ‘ग्लोबल अप्रूवल लिडर’ ठरले आहेत. जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे “Global Leader Approval” म्हणून लोकप्रिय आहे.*

_अमेरिकेतील डेटा इंटेलिजेंस फर्म ‘मॉर्निंग कंसल्ट’ द्वारे केलेल्या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “Global Leader Approval” म्हणून स्विकारलं आहे. जागतिक नेत्यांच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्वेक्षणात सर्वात पुढे आहेत._

_पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच ग्लोबल अप्रूवल रेटिंग ६६ टक्के इतके आहे. कोरोना काळातही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका, ब्रिटन, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह १३ देशांतील नेत्यांपेक्षा अव्वल ठरले आहेत._

*या सर्वेक्षणात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोदींची लोकप्रियता जास्त असल्याचं दिसत आहे. इतर नेत्यांच्या तुलनेत मोदी यांचं काम चांगलं आहे. या रेटिंगमध्ये मोदींच्या पाठोपाठ इटलीचे पंतप्रधान मारियो ड्रॅग हे ६५ टक्के इतक्या रेटिंग्सने दुसऱ्या क्रमांकावर आहेत, तर तिसऱ्या क्रमांकावर मेक्सिकोचे राष्ट्रपती लोपेज ओब्रेडोर असून त्यांची रेटिंग ६३ टक्के इतकी आहे.

एक समाज श्रेष्ठ समाज संस्था अध्यक्ष योगेन्द्र कुमार साहू कोषाध्यक्ष बलराम हालदार के नेतृत्व में संस्था के माध्यम से किया पेड का रोपण

एक समाज श्रेष्ठ समाज संस्था अध्यक्ष योगेन्द्र कुमार साहू कोषाध्यक्ष बलराम हालदार के नेतृत्व में संस्था के माध्यम से संस्था मार्गदर्शिका प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी जी की धर्मपत्नी जशोदा बेन मोदी जी के 70 वें जन्मदिन शुभ अवसर पर उनकी लंबी आयु के लिए भगवान से प्रार्थना कर संस्था पदाधिकारियों ने हल्द्वानी राजपुरा राजकीय इण्टर कॉलेज में फलदार पुष्पदार छायादार पौधारोपण कर जशोदा बेन मोदी जी का 70 वाँ जन्मदिन मनाया
इस दौरान एक समाज श्रेष्ठ समाज संस्था अध्यक्ष योगेन्द्र कुमार साहू उपाध्यक्ष लोकेश कुमार साहू मीडिया प्रभारी मुकेश सरकार ने संयुक्त रूप से कहा की इस संसार में हर मनुष्य का अपना अपना व्यक्तित्व है वही मनुष्य की पहचान है कोटि कोटि मनु्ष्यों की भीड़ में भी वह अपने निराले व्यक्तित्व के कारण पहचाना जाता है यही विशेषता एक समाज श्रेष्ठ समाज संस्था मार्गदर्शिका प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी जी की धर्म पत्नी जशोदाबेन मोदी जी की है क्योंकि भारत के प्रधानमंत्री की पत्नी होने के बावजूद भी जशोदा बेन मोदी जी ने भारतहित कार्य के लिये अपने त्याग तपस्या दृढ़ संकल्प के साथ सामाजिक साधारण जीवन जी रही है जिससे जशोदा बेन मोदी जी ने अपने इस सादगी भरे व्यक्तित्व के कारण भारत सहित पूरे विश्व को अपने तरफ आकर्षित किया है और हम सभी भारतवासी जशोदा बेन मोदी जी के दिल से बहुत आभारी है की उन्होंने अपने पति नरेन्द्र मोदी जी को भारत को विश्व गुरु बनाने के लिए भारत माता को समर्पित कर दिया जो भारत के प्रधानमंत्री के रूप में नरेन्द्र मोदी जी भारत देश को विश्व गुरु बनाने के लिए रात दिन जाग जाग कर दिलों जान से भारतहित में कार्य कर रहे है यह हम सभी भारतीयों के लिए बहुत गर्व की बात है इससे यह बात भी साबित होती है की जिस व्यक्ति ने राष्ट्र और समाज के प्रति सेवा करने का अपना लक्ष्य निर्धारित करके आगे बढ़ता है वही व्यक्ति इतिहास रचता है आज उन्हीं लोगों के परिणाम स्वरूप उनकी वर्तमान पीढ़ियां निरंतर प्रगति की ओर बढ़ रही है वह युवक श्रेष्ठ होता है जो आगे बढ़ने और भारतहित के लिए सब कुछ कर गुजरने का खुली आंखों से सपने देखता है क्योंकि सुख समृद्धि और शांति से परिपूर्ण जीवन के लिए सच्चरित्र तथा सदाचारी होना ही पहली शर्त है जो उत्कृष्ट विचारों के बिना संभव नहीं है हमें यह दुर्लभ मानव जीवन किसी भी कीमत पर निरर्थक और उद्देश्यहीन नहीं जाने देना चाहिए लोकमंगल की कामना ही हमारे जीवन का उद्देश्य होना चाहिए केवल अपने सुख की चाह हमें मानव होने के अर्थ से पृथक करती है मानव होने के नाते जब तक हम सभी दूसरे के दु:ख दर्द में साथ नहीं निभाएंगे तब तक इस जीवन की सार्थकता सिद्ध नहीं होगी वैसे तो हमारा परिवार भी समाज की ही एक इकाई है परन्तु इतने तक ही सीमित रहने से सामाजिकता का उद्देश्य कभी पूरा नहीं हो सकता हमारे जीवन का अर्थ तभी पूरा हो सकेगा जब हम समाज को ही परिवार माने तभी मानवता में ही सज्जानता निहित है जो सदाचार का पहला लक्षण है और मनुष्य की यही एक शाश्वत पूंजी है इसलिए एक समाज श्रेष्ठ समाज संस्था प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी जी और उनकी धर्मपत्नी जशोदा बेन मोदी जी के भारतहित में निष्ठा पूर्ण त्याग तपस्या दृढ़ संकल्प से मार्गदर्शन लेकर प्रेरित होकर हमेशा समाजहित एवं भारतहित में हमेशा कार्य करती रही है और आगे भी भारतहित में करती रहेगी
इस दौरान वृक्षारोपण करने में संस्था उपाध्यक्ष लोकेश कुमार साहू कोषाध्यक्ष बलराम हालदार मीडिया प्रभारी मुकेश सरकार रितिक साहू मनीष साहू सौरभ दयाल दीपक प्रजापति सूरज मिस्त्री सुशील राय मुकेश कुमार आदि लोग उपस्थित रहे

error: Content is protected !!