Home Blog Page 147

दहशतवाद मोडून काढण्यासाठी अमेरिका आणि भारताला संयुक्त पावलं उचलावी लागतील पंतप्रधान नरेंद्र मोदी

“दहशतवाद हा माणुसकीचा शत्रू आहे. हा दहशतवाद मोडून काढण्यासाठी योग्य पद्धतीने लढावं लागेल. आपल्या देशांची एकजूट या दहशतवादाचा सामना करु शकते. मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतरही दहशतवादाचा धोका आहेच. त्याचा बिमोड करण्यासाठी संयुक्त प्रयत्नांची आवश्यकता आहे.असे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी अमेरिकेच्या संसदेला संबोधित करताना स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. आपल्या भाषणात त्यांनी AI चा नवा अर्थही सांगितला. AI म्हणजे अमेरिका – इंडिया असं नरेंद्र मोदी म्हणाले.*

*👉🅾️🅾️👉आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशिया आणि युक्रेन युद्धाचाही उल्लेख केला. ते म्हणाले “ही वेळ युद्धाची नाही. युक्रेनमध्ये सुरु असलेला रक्तपात थांबणं आवश्यक आहे. युद्धामुळे लोकांना प्रचंड त्रास होतो. मात्र चर्चा केल्याने अनेक गोष्टींमधून मार्ग निघू शकतो. रशिया आणि युक्रेन यांच्या फेब्रुवारी २०२२ पासून युद्ध सुरु आहे. भारतातर्फे दोन्ही देशांना शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे.”*

*👉🟥🟥👉“भारतात विविधेत एकता आहे. आज जगाला भारताविषयी माहिती हवी आहे, भारतात काय सुरु आहे? याची जिज्ञासा जगभरात अनेकांना असते. मी या सदनातही ती जिज्ञासा पाहू शकतो. भारताचा विकास, तिथली लोकशाही आणि विविधेत असलेली एकता या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला समजून घ्याव्याश्या वाटत आहेत. भारत एखादी गोष्ट कशी करतो? कोणत्या गोष्टीला कसं तोंड देतो? याकडे जगाचं लक्ष असतं.”*

*👉🅾️🅾️👉“आधी भारत हा जगातली दहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश होता. मात्र आता भारत जगातली पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. २०२५ पर्यंत भारत जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश होईल याबाबत माझ्या मनात शंका नाही. भारतात विकासाला प्रचंड मोठी गती मिळाली आहे.” असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.*

उत्पन्नाचा दाखला पाच वर्षांनी द्यावा लागणार; संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेसाठी अट शिथिल

मुंबई :-संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला द्यावा लागत असे, यापुढे मात्र राज्य सरकारने लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला मिळविण्यास अडचणी येत असल्याने दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर न करता ५ वर्षातून एकदा उत्पन्नाचा दाखला सादर करण्यास अनुमती दिली आहे.तशा प्रकारचा आदेश जारी करण्यात आला आहे.*

*👉🅾️🅾️👉जवळपास ४१ लाखजण या योजनेचे लाभार्थी आहेत. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून शासनाकडून १८ ते ६४ वयोगटातील निराधार व्यक्ती, दिव्यांग, अनाथ मुले, घटस्फोटित स्त्रिया, दुर्लक्षित स्त्रिया, वेश्या व्यवसायातून मुक्त महिला, तसेच तृतीयपंथीयांना शासनाकडून आर्थिक साहाय्य पुरविले जाते. याशिवाय, श्रावणबाळ योजनेअंतर्गत राज्यातील ६५ व त्यापेक्षा अधिक वयाच्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या स्त्रियांना व पुरुषांना केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य पुरविले जाते.*

पी.एम. किसानमध्ये १०८ बांगलादेशी नागरिकांचा समावेश,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रकार

img 20230623 wa0013
सिंधुदुर्ग :-पी. एम. किसान योजनेअंतर्गत ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करत असताना डिगस (ता. कुडाळ) येथे १०८ बांगलादेशी नागरिकांनी पी. एम. किसान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केल्याचे निदर्शनास आल्यामुळे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यानी दिलेल्या निर्देशानुसार या प्रकरणाची चौकशी, तपासणी करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे.*

*👉🅾️🅾️👉या समितीत अध्यक्ष उपविभागीय अधिकारी कुडाळ, सदस्य उपविभागीय पोलिस अधिकारी, सावंतवाडी, सदस्य जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सिंधुदुर्ग, सदस्य तहसिलदार कुडाळ जि. सिंधुदुर्ग, सदस्य गटविकास अधिकारी, कुडाळ जि. सिंधुदुर्ग, सदस्य सचिव तालुका कृषी अधिकारी, कुडाळ जि.सिंधुदुर्ग. तसेच समितीस दोन दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हास्तरावरुन देण्यात आलेल्या आहेत.*

*👉🟥🟥👉कारवाईकडे जिल्हावासीयांचे लक्ष*

*दरम्यान, डिगस येथे १०८ बांगलादेशी नागरिकांनी पीएम किसान योजनेसाठी ऑनलाइन अर्ज दाखल केल्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेउन ही समिती गठीत केली आहे. आता समितीच्या अहवालानंतर काय पुढे येणार आणि कोणावर कारवाई होणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.*

पालघर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस उपअधीक्षक पदी दयानंद गावडे यांची नियुक्ती तर एसीबी नवनाथ जगताप यांची मुंबई येथे बदली.

मुंबई – लाच लुचपत प्रतिबंधक विभाग (अँटी करप्शन ब्युरो ) पालघर पोलीस उपअधीक्षक पदी दयानंद गावडे यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली असून पालघर पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप यांची मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पालघर पोलीस उपअधीक्षक असताना त्यांनी 2021 ते जून 2023 या कालावधीत ग्रामपंचायत सदस्य,सरपंच, महिला पोलीस हवालदार,पोलीस निरीक्षक,वनरक्षक, वनपाल लिपिक,तलाठी, कार्यकारी अभियंता,मुख्याध्यापक,राज्य कर अधिकारी, खाजगी ईसम, बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका,भूसंपादन सहाय्यक जिल्हाधिकारी, कारकून, पोलीस उपनिरीक्षक,पोलीस शिपाई, सेवानिवृत्त ग्रंथपाल वैद्यकीय अधिकारी,मंडळ अधिकारी, शिक्षण अधिकारी अशा 36 भ्रष्ट अधिकाऱ्यांवर सापळा रचून दंडात्मक कारवाया केल्या आहेत*.

*👉🅾️🅾️👉तर पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे याआधी रायगड येथे स्थानिक गुन्हे शाखा या विभागात कार्यरत होते. 1996 रोजी महाराष्ट्र पोलीस खात्यात पोलीस उपनिरीक्षक पदापासून त्यांनी पोलीस खात्यात पदार्पण केले आहे. 1997 ते 2009 या कालावधीत त्यांनी मुंबई येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यभार सांभाळला होता. त्यानंतर रायगड,सोलापूर, पुणे ग्रामीण आणि 21 जून 2023 पर्यंत रायगड स्थानिक गुन्हे शाखेमध्ये ते कार्यरत असताना त्यांनी पोलीस खात्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र पोलीस खात्याने त्यांची लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ( अँटी करप्शन ब्युरो ) पालघर पोलीस उपअधीक्षक पदी नियुक्ती केली आहे.पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांनी गुरुवार दिनांक 22 जून 2023 पासून पालघर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस उपअधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.*

राज्यातील युवतींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे गुरुपौर्णिमेपासून राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण कार्यक्रम सुरू होणार – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा

img 20230622 wa0017
मुंबई, दि. २२ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यात 3 लाख 50 हजार शाळकरी, महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला व बालविकास विभाग आणि राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून 3 ते 15 जुलै दरम्यान तीन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती, महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयातील दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे, उपसचिव श्री. ठाकूर, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी, मुंबई विद्यापीठ, एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, भारतीय स्त्री शक्ती संस्‍था आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले, अलीकडील काळात महिला व मुलींवर होणारे अत्याचार व त्यातून केली जाणारी त्यांची हत्या हे शासनासमोरील व समाजासमोरील आव्हान ठरत आहे. याला आळा बसण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे खुपच आवश्यक आहे. शाळकरी व महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी राज्यात राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. आयुक्त, महिला व बाल विकास या कार्यालयामार्फत राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने महाविद्यालयीन युवतींसाठी तालुकास्तरावर विद्यापिठांच्या मदतीने स्वसंरक्षण शिबीरांचे आयोजन करण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे. स्थानिक महिला बचतगट, अंगणवाडी सेविका, स्थानिक सामाजिक संस्था, महाविद्यालयीन एनएसएस, स्थानिक पोलीस यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडावा.
युवतींचे मनोबल उंचविण्यासाठी तीन दिवस समुपदेशन सत्र आयोजित करण्यात येणार आहेत
*पहिला दिवस*
महिला व मुलींवरील हिंसाचार-संकल्पना व सद्यस्थिती या विषयावर भारतीय स्त्री शक्ती संस्था मार्गदर्शन करेल. सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत होणाऱ्या प्रशिक्षणात 1 हजार युवती सहभागी होतील.
तंत्रज्ञान व महिला व मुलींना असलेले धोके या विषयावर सायबर सेल तज्ज्ञ अधिकारी मार्गदर्शन करतील. दुपारी 12.30 ते 1.30 या वेळेत होणाऱ्या प्रशिक्षणात 1 हजार युवती सहभागी
होतील
*दुसरा दिवस*
*स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणाचे वेळापत्रक*
स्वसंरक्षणाचे प्राथमिक प्रशिक्षण सकाळी 9.00 ते 9.45 या वेळेत होणार असून 1 हजार युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 प्रशिक्षक असतील.
आधुनिक प्रशिक्षण या विषयावर सकाळी 10.05 ते 10.50 या वेळेत प्रशिक्षण होणार असून 1 हजार युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 प्रशिक्षक असतील.
*तिसरा दिवस*
प्रात्यक्षिक आणि सराव सकाळी 9.00 ते 9.45 या वेळेत प्रशिक्षण होणार असून 1 हजार युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 प्रशिक्षक असतील.
प्रात्यक्षिक आणि सराव सकाळी 10.05 ते 10.50 या वेळेत होणार असून 1 हजार युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 प्रशिक्षक असतील.
या तीन दिवसाच्या शिबीरानंतर ज्या युवतींना अधिक स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणात रुची असेल, अशा युवतींची संख्या लक्षात घेऊन त्यादृष्टीने पुढील दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन विभागामार्फत करण्यात येईल.
मुंबई विद्यापीठ, एस. एन. डी. टी., भारतीय स्त्री शक्ती संस्‍था आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांच्यात सामंजस्य करार
महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण संस्था या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयुक्त, महिला व बाल विकास यांच्या स्तरावर अव्यावसायिक तत्वावर आज मुंबई विद्यापीठ, एस. एन.डी. टी., भारतीय स्त्री शक्ती संस्‍था आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला. वेळोवेळी या प्रशिक्षण कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी सर्व विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी निधी ट्रस्ट, भारतीय स्त्री शक्ती संस्‍था यांचेसोबत आवश्यकतेनुसार सामजंस्य करार करण्यात येतील. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व विद्यापीठ, स्वयंसेवी संस्थांना देखील या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले.राज्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये ४० लाख बालक, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी उस्फूर्तपणे योग दिवस साजरा केला असेही मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.
****

शासन आपल्या दारी’ मेळाव्यात वैयक्तिक योजनांचा लाभ देण्याची पूर्वतयारी करावी-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे, दि.२२ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुरंदर येथे 3 जुलै रोजी ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून लाभार्थ्यांना वैयक्तिक योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व यंत्रणांनी पूर्वतयारी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले.

मेळाव्याच्या आयोजनाच्या पूर्वतयारीसाठी दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आणि जिल्ह्यातील विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक गावनिहाय लाभार्थी निवड करावी व त्यांना वैयक्तिक अर्थसहाय्याच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. मेळाव्याच्या आयोजनासाठी आवश्यक सुविधांचीदेखील पूर्वतयारी करावी. सूक्ष्म नियोजन करून मेळाव्याच्या ठिकाणी लाभार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी. मेळाव्याच्या तयारीबाबत दररोज आढावा घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनांचे लाभार्थी शोधून त्यांना लाभ देण्यासाठी आवश्यक प्रक्रीया पूर्ण करावी. कृषि विभाग आणि पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक नियोजन करावे. मेळाव्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

श्री. आयुष प्रसाद म्हणाले, जिल्हा परिषदेतर्फे २२ हजार दिव्यांगाना लाभ देण्याचे नियोजन आहे. कृषि विभागाच्या माध्यमातून १ हजार ७०० आणि ७ हजार घरकूलाच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. महाडीबीटीच्या माध्यमातून कृषि, महिला व बालविकास आणि समाज कल्याण विभागाच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून १३ प्रकारचे दाखले देण्यासाठी पुढील १५ दिवसात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. गावपातळीवर पशुसंवर्धन व आरोग्याचे मेळावे घेण्यात येणार आहेत. सरपंच आणि ग्रामसेवकांची बैठक घेवून आवश्यक नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

श्रीमती कदम म्हणाल्या, मेळाव्याच्या ठिकाणी मतदार नोंदणी आणि आधार कार्डच्या सुविधेबाबत व्यवस्था करावी. विविध योजनांअंतर्गत घरकूलाचे वाटप, आरोग्य योजनांचा लाभ देण्यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घेवून कार्यवाही करावी. जिल्हा अग्रणी बँकेमार्फत मुद्रा बँक कर्ज, क्रेडीट कार्ड वाटप आदी योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करावा. मेळाव्यात लाभार्थ्यांना लाभ देण्याच्यादृष्टीने आवश्यक सर्व कार्यवाही संबंधितांनी करावी. योजनेच्या नावाप्रमाणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लाभाच्या योजनेचा नागरिकांना लाभ देण्याबाबत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी योजना आणि तालुकानिहाय लाभार्थ्यांची माहिती सादर करावी, असेही श्रीमती कदम यांनी सांगितले.

कौशल्य विकास विभागातर्फे रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. आभा कार्ड, प्रधानमंत्री मातृवंदना योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. नगरपालिकांच्या माध्यमातूनही विविध योजनांचा लाभ देण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याची माहितीही यावेळी देण्यात येईल.

पंतप्रधान कार्यालय जी-20 शिक्षण कार्य गटाच्या मंत्रिस्तरीय बैठकीत पंतप्रधानांचे मार्गदर्शन

पंतप्रधान कार्यालय

जी-20 शिक्षण कार्य गटाच्या मंत्रिस्तरीय बैठकीत पंतप्रधानांचे मार्गदर्शन

“आपल्या संस्कृतीचा पाया तर शिक्षणावर उभा राहिला आहेच, मात्र, त्या पलीकडेही शिक्षण आपल्या मानवतेच्या भविष्याला आकारही देत आहे.”

“खरे ज्ञान आपल्याला विनम्रता शिकवते आणि विनम्रतेतून आपले मूल्य वाढते आणि त्यातून आपल्याकडे संपत्ती निर्माण होते, संपत्तीतून आपण सत्कर्म करु शकतो आणि हेच आपल्या आयुष्यात आनंद आणणारे आहे”

“आपले उद्दिष्ट उत्तम प्रशासनासह दर्जेदार शिक्षण देणे हेच असले पाहिजे”

“आपल्या युवाशक्तीला भविष्यासाठी सज्ज करत असतांना, आपल्याला सातत्याने, कौशल्ये शिकणे, पुनर्कौशल्ये आणि कौशल्ये अद्ययावत करत राहावी लागतील”

“डिजिटल तंत्रज्ञान ही शिक्षणात प्रवेश सुलभ करणारी आणि भविष्यातील गरजांचा स्वीकार करणारी कित्येक पट मोठी शक्ती आहे.”
Posted On: 22 JUN 2023 10:56AM by PIB Mumbai
पुण्यात सुरु असलेल्या जी-20 शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीला आज पंतप्रधान मोदी यांनी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून संबोधित केले.

शिक्षणावर केवळ आपल्या संस्कृतीचा, सभ्यतेचा पायाच उभा नाही, तर आपल्या मानवतेच्या भविष्याला आकार देणारे संरचनाकारही आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. शिक्षणमंत्री याचे नेतृत्व करणारे शेर्पा आहेत, असा उल्लेख करत, हे शेर्पा, मानवसमूहाला सर्वांसाठी विकास, शांतता आणि समृद्धीच्या प्रवासाची दिशा दाखवत आहेत, असे त्यांनी सांगितले. भारतीय शास्त्रानुसार, शिक्षणाची भूमिका जीवनात आनंदाची दारे करणारी गुरुकिल्ली अशी केली जाते, असे त्यांनी अधोरेखित केले. एका संस्कृत श्लोकाचा दाखला देत, त्यांनी सांगितले की, “ खरे ज्ञान आपल्याला विनम्र बनवते, आणि विनम्रतेतून आपले मूल्य ठरते, आपली पात्रता ठरते आणि त्या पात्रतेतून आपल्याला अर्थार्जन करता येते, आणि संपत्तीचा वापर करत आपण सत्कर्म केले तर आपल्या आयुष्यात त्यामुळे आनंद निर्माण होतो.” भारताने आता सर्वसमावेशक आणि सर्वांगीण शिक्षणाच्या प्रवासाकडे वाटचाल सुरु केली आहे, असे त्यांनी सांगितले. पायाभूत साक्षरता किंवा अक्षरओळख, युवकांचा पाया मजबूत करणारी असते आणि भारत त्याला आता तंत्रज्ञानाचीही जोड देत आहे, असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या ‘अर्थ समजून वाचन करणे तसेच संख्याशास्त्र या दोन्हीमधील निपुणता वाढवण्यासाठीचा राष्ट्रीय उपक्रम’ किंवा ‘निपुण भारत’ अभियानाचा त्यांनी उल्लेख केला आणि जी-20 देशांनी देखील, ‘पायाभूत साक्षरता आणि अंकओळख’ हीच प्राथमिकता असल्यावर शिक्कामोर्तब केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ह्या विषयावर कालबद्धरित्या, म्हणजेच 2030 पर्यंत काम केले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.

ई-लर्निंगच्या पद्धतींचा अभिनव वापर करण्यावर त्यांनी भर दिला, आणि त्याचे उद्दिष्ट उत्तम प्रशासनासह, दर्जेदार शिक्षण देणे, हेच असले पाहिजे, असेही स्पष्ट केले. ह्या दिशेने केंद्र सरकारने हाती घेतलेल्या अनेक उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. त्यात, “स्टडी वेब्स ऑफ अॅक्टिव लर्निंग फॉर यंग अॅसपायरिंग माइंडस” किंवा स्वयं ह्या ऑनलाईन शिक्षणमंचाचा त्यांनी उल्लेख केला. ह्या मंचावर इयत्ता नववी ते पदव्युत्तर स्तरापर्यंत विविध अभ्यासक्रम उपलब्ध असून विद्यार्थ्यांना दूरस्थ शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे, त्यामुळे शिक्षणाची सहज उपलब्धता, समानता आणि उत्तम दर्जाचे सर्वांना शिक्षण यावर भर देण्यात यश आले आहे, असे ते म्हणाले. या पोर्टलवर आतापर्यंत 9000 पेक्षा अधिक अभ्यासक्रम उपलब्ध असून, त्यासाठी 34 दशलक्ष मुलांनी नोंदणी केली आहे, आज हे शिक्षणाचे एक प्रभावी साधन बनले आहे,” असे त्यांनी सांगितले. ज्ञानाच्या देवघेवीसाठी डिजिटल पायाभूत सुविधा’ किंवा दीक्षा पोर्टलचाही त्यांनी उल्लेख केला. ह्या पोर्टलचे उद्दिष्ट, दूरस्थ पद्धतीने शालेय शिक्षण देणे हे आहे. ह्या पोर्टलवरुन 29 भारतीय आणि सात परदेशी भाषांमधून शिक्षण दिले जाते, असे सांगत, आजवर त्यावरून 137 दशलक्ष लोकांनी अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. इतर देशांना, विशेषतः ग्लोबल साऊथ देशांना, आपले अनुभव, ज्ञान आणि संसाधने यांची मदत देण्यास भारत आनंदाने तयार आहे, असेही मोदी यांनी सांगितले.

आपल्या युवकांना सतत कौशल्य, नव्याने कौशल्य प्रशिक्षण आणि कौशल्य अद्यायावत करून भविष्यासाठी सज्ज बनवण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली. तरुण ज्या क्षेत्रात काम करतात, तिथल्या पद्धतींबाबत त्यांच्या क्षमता संरेखित करण्यावरही पंतप्रधानांनी भर दिला. सरकार कौशल्य मॅपिंग कार्यक्रम हाती घेत आहे. शिक्षण, कौशल्य आणि कामगार मंत्रालये या उपक्रमावर एकत्रितपणे काम करत आहेत. जी-20 देश जागतिक स्तरावर कौशल्य मॅपिंग करू शकतात आणि त्या कमतरता शोधू शकता ज्या दूर करण्याची गरज आहे असेही मोदी यांनी सुचवले.

डिजिटल तंत्रज्ञान तोल सांभाळण्याचे काम करते आणि सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देते असे मत पंतप्रधानांनी मांडले. शिक्षणात प्रवेश वाढवणे आणि भविष्यातील गरजांशी जुळवून घेणे यासाठी हे एक शक्तीवर्धक आहे असे ते म्हणाले. शिकणे, कौशल्य आणि शिक्षण क्षेत्रात मोठी क्षमता प्रदान करणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमतेचाही त्यांनी उल्लेख केला. तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या संधी आणि आव्हाने यांच्यात योग्य संतुलन राखण्यासाठी त्यांनी जी-20 च्या भूमिकेवर भर दिला.

भारताने देशभरात दहा हजार ‘अटल टिंकरिंग लॅब’ स्थापन केल्या आहेत. आमच्या शाळकरी मुलांसाठी संशोधन आणि नवोन्मेषाच्या संगोपनशाळा म्हणून काम त्या करतात असे सांगत संशोधन आणि नवोन्मेषावर दिलेल्या भरावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.

या प्रयोगशाळांमध्ये 7.5 दशलक्षाहून अधिक विद्यार्थी 1.2 दशलक्षाहून अधिक नाविन्यपूर्ण प्रकल्पांवर काम करत आहेत अशी माहिती त्यांनी दिली. जी 20 देश त्यांच्या सामर्थ्याने संशोधन आणि नवोन्मेषासाठी, विशेषत: ग्लोबल साउथमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात यावर पंतप्रधानांनी भर दिला. मान्यवरांनी संशोधन सहकार्य वाढवण्यासाठी मार्ग तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले.

आपल्या मुलांच्या आणि तरुणांच्या भविष्यासाठी जी20 शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला की या गटाने शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हरित संक्रमण, डिजिटल परिवर्तन आणि महिला सक्षमीकरण यांना चालना दिली आहे. “शिक्षण हे या सर्व प्रयत्नांचे मुळ आहे”, सर्वसमावेशक, कृती-केंद्रित आणि भविष्यासाठी सज्ज शिक्षणाचा अजेंडा ही बैठकीची फलनिष्पत्ती असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “वसुधैव कुटुंबकम् – एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य” या खर्‍या भावनेतून संपूर्ण जगाला याचा फायदा होईल”, असे सांगत पंतप्रधानांनी समारोप केला.

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 22 जून 2023 दिन – गुरुवार

*🌞~ आज का हिन्दू पंचांग ~🌞*
*⛅दिनांक – 22 जून 2023*
*⛅दिन – गुरुवार*
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – दक्षिणायन*
*⛅ऋतु – वर्षा*
*⛅मास – आषाढ़*
*⛅पक्ष – शुक्ल*
*⛅तिथि – चतुर्थी शाम 05:27 तक तत्पश्चात पंचमी*
*⛅नक्षत्र – अश्लेषा 23 जून प्रातः 04:18 तक तत्पश्चात मघा*
*⛅योग – हर्षण 23 जून प्रातः 03:32 तक तत्पश्चात वज्र*
*⛅राहु काल – दोपहर 02:23 से 04:05 तक*
*⛅सूर्योदय – 05:55*
*⛅सूर्यास्त – 07:28*
*⛅दिशा शूल – दक्षिण दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:31 से 05:13 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:21 से 01:03 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – श्री द्वारकाधीश पाटोत्सव, श्री बल्लभाचार्य वैकुंठ-गमन, संत टेऊँरामजी जयंती*
*⛅विशेष – चतुर्थी को मूली खाने से धन का नाश होता है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

*🔹औषधीय गुणों से युक्त : जामुन🔹*

*🔹औषधीय गुणों से युक्त जामुन का फल शीतल, रुक्ष तथा कफ-पित्तशामक होता है । इसमें लौह तत्त्व,औषधीय गुणों से युक्त जामुन का फल शीतल, रुक्ष तथा कफ-पित्तशामक होता है । इसमें लौह तत्त्व, फॉलिक एसिड, विटामिन ‘बी’ व ‘सी’  पर्याप्त मात्रा में पाये जाते हैं ।*

*🔹जामुन ह्रदय के लिए एवं रक्ताल्पता, पेशाब की जलन, अपच, दस्त, पेचिश, संग्रहणी, पथरी, रक्तपित्त, रक्तदोष आदि में लाभदायी है । मधुमेह (diabetes) के लिए यह वरदानस्वरुप माना जाता है ।*

*🔸जामुन की छाल, गुठलियों और पत्तों का भी औषधीय रूप में उपयोग किया उपयोग किया जाता है । इसके कोमल पत्तों का २० मि.ली. रस निकालकर उसमें थोड़ी मिश्री मिला के पीने से खूनी बवासीर में खून गिरना बंद होता है । प्रयोग के दौरान लाल मिर्च व खटाई का सेवन न करें ।*

*🔹जामुन का गुणकारी औषधीय पेय🔹*

*🔸अच्छे पके जामुनों के १ लीटर रस में १ कि.ग्रा. मिश्री मिलाकर उबालें । एक तार की चाशनी बन जाय तो छान के बोतल में भर लें । १० से २५ मि.ली. पेय को दस्त, संग्रहणी, उलटी, जी मिचलाना, गले की सूजन आदि तकलीफों में पानी के साथ तथा अत्यधिक मासिक स्त्राव, प्रमेह, सूजाक, खूनी बवासीर आदि में मक्खन के साथ लेने से उत्तम लाभ होता है ।*

*🔹गुठलियों के भी बेहतरीन लाभ🔹*

*🔸जामुन की गुठलियों के चूर्ण में ऐसे-ऐसे औषधीय गुण हैं जो उसके फल में भी नहीं हैं । जामुन की गुठलियों को सूखा के उनका चूर्ण बना लें अथवा यह तैयार चूर्ण आयुर्वेदिक औषधियों की दूकान पर भी मिलता है । यह विभिन्न रोगों में लाभदायी है :*

*👉 १] स्वप्नदोष : २-३ ग्राम चूर्ण सुबह-शाम पानी के साथ लेने से स्वप्नदोष ठीक होता हैं ।*

*👉 २] श्वेतप्रदर :  २ ग्राम चूर्ण चावल की धोवन या चावल के पानी के साथ दिन में २ बार लेने से श्वेतप्रदर में लाभ होता है ।*

*👉 ३] मधुमेह व बार-बार लगनेवाली प्यास : २-३ ग्राम चूर्ण पानी के साथ दिन में २-३ बार लेने से इन रोगों में लाभ होता है ।*

*👉 ४] नींद में बिस्तर गीला करना (nocturnal enuresis): रात्रि को सोते समय १ ग्राम चूर्ण पानी के साथ देने से लाभ होता है ।*

*👉 ५] दस्त:  ५-७ ग्राम चूर्ण को छाछ के साथ दिन में २ बार लेने से लाभ होता है ।*

*🔹सावधानियाँ : १] अधिक मात्रा में जामुन न खायें अन्यथा शरीर में जकड़ाहट तथा बुखार हो सकता है ।*

*🔹२] भोजन के पूर्व या खाली पेट जामुन खाने से वात की वृद्धि तथा अफरा होता है । अत:भोजन के पश्चात अन्न का पाचन हो जाने पर (भोजन के तुरंत बाद फल नहीं खाने चाहिए) नमक (यथासम्भव सेंधा नमक ) और काली मिर्च के चूर्ण के साथ इन्हें थोड़ी मात्रा में खाना चाहिए । इससे इनका वातवर्धक दोष कम हो जाता है ।*

*🔹गुरुवार विशेष 🔹*

*🔸हर गुरुवार को तुलसी के पौधे में शुद्ध कच्चा दूध गाय का थोड़ा-सा ही डाले तो, उस घर में लक्ष्मी स्थायी होती है और गुरूवार को व्रत उपवास करके गुरु की पूजा करने वाले के दिल में गुरु की भक्ति स्थायी हो जाती है ।*

*🔸गुरुवार के दिन देवगुरु बृहस्पति के प्रतीक आम के पेड़ की निम्न प्रकार से पूजा करें :*

*🔸एक लोटा जल लेकर उसमें चने की दाल, गुड़, कुमकुम, हल्दी व चावल डालकर निम्नलिखित मंत्र बोलते हुए आम के पेड़ की जड़ में चढ़ाएं ।*

*ॐ ऐं क्लीं बृहस्पतये नमः ।*

*🌹 फिर उपरोक्त मंत्र बोलते हुए आम के वृक्ष की पांच परिक्रमा करें और गुरुभक्ति, गुरुप्रीति बढ़े ऐसी प्रार्थना करें । थोड़ा सा गुड़ या बेसन की मिठाई चींटियों को डाल दें ।*

*🔸गुरुवार को बाल कटवाने से लक्ष्मी और मान की हानि होती है ।*

*🔸गुरुवार के दिन तेल मालिश हानि करती है । यदि निषिद्ध दिनों में मालिश करनी ही है तो ऋषियों ने उसकी भी व्यवस्था दी है । तेल में दूर्वा डाल के मालिश करें तो वह दोष चला जायेगा ।*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी येथे योग दिन उत्साहात साजरा

चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी येथे योग दिन उत्साहात साजरा
—————————————-
चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी येथे योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून संपूर्ण देशभर साजरा केला. या दिवसाचे महत्त्व जाणून चेतना इंटरनॅशनल स्कूल मधील सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या सम समावेत योगाचे विविध प्रकारचे योगासने व प्राणायामे केली. योग शिक्षक म्हणून पुनम सरडे , हर्षदा चौधरी, सुतार मॅडम, देशमाने मॅडम यांनी सर्वांना उत्तम प्रकारचे मार्गदर्शन केले.
निरोगी शरीर हीच खरी संपत्ती आहे प्रत्येकाने दररोज व्यायाम प्रकार योगासने प्राणायामे केली पाहिजेत तरच आपण शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम राहू शकतो असे मत प्राचार्य निकिता सोमनाथ माने यांनी व्यक्त केली कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षकांनी केले .

2हजार ७० कृषि सेवकांची पदभरती लवकरच- कृषि आयुक्त सुनील चव्हाण

पुणे, दि.२१ (वि.मा.का.): कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त कृषि सेवक पदाच्या सरळसेवेच्या कोट्यातील २ हजार ५८८ रिक्त पदे विचारात घेता याच्या ८० टक्के म्हणजे २ हजार ७० पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव शासनाकडे देण्यात आला असून शासनाची मान्यता प्राप्त होताच जाहिरात व पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे.

श्री. चव्हाण यांनी पुढे माहिती दिली, कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त गट-क मधील विविध संवर्गातील सरळसेवा पदभरती बाबत प्रक्रिया सुरु झाली असून त्याची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच पेसा क्षेत्रातील पदे निश्चित करण्याची कार्यवाही देखील अंतिम टप्प्यात आहे.

कृषि विभागाचा सुधारित आकृतीबंध अद्याप अंतिम झाला नसल्यामूळे शासन निर्णयातील तरतूदीनुसार वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून इतर सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांच्या ८० टक्के मर्यादीत पदभरती करण्यात येणार आहे. गट- क संवर्गातील सरळसेवा पदभरती आय. बी. पी. एस. या कंपनीमार्फत राबविण्यास शासन मान्यता मिळाली आहे. या संस्थेसोबत सामंजस्य करार देखील करण्यात आला आहे. त्यानुसार वरिष्ठ लिपिक, सहायक अधिक्षक, लघुलेखक ( निम्नश्रेणी) व लघुलेखक (उच्चश्रेणी) या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

*पेसा क्षेत्रातील पदे भरणार*
राज्यपाल महोदयांच्या २९ ऑगस्ट २०१९ च्या अधिसूचनेनुसार अनूसुचित / आदिवासी क्षेत्रातील (पेसा) १७ संवर्गातील सरळसेवेची पदे भरणेबाबत कळविण्यात आले आहे. त्यामध्ये कृषि सहायक संवर्गाचा समावेश आहे. शासन निर्णयानुसार विभागीय कृषि सहसंचालक ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व लातूर या विभागातील पेसा क्षेत्रातील मुख्यालय निश्चिती व पदसंख्या निश्चित करण्याबाबतच्या प्रस्तावास प्रशासकीय विभागाची मान्यता प्राप्त करुन घेणेबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे कृषी सेवक पदांसाठी जाहिरात देणे शक्य झालेले नाही, मात्र मान्यता मिळताच भरती संदर्भातील पुढील कार्यवाही केली जाईल, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले.

error: Content is protected !!