Home Blog Page 125

चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी येथे स्वातंत्र्य दिनाचा अनोखा जल्लोष

img 20230815 wa0037(1)
चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी येथे 15 ऑगस्ट 2023 भारताचा 77 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मा.अध्यक्ष उदय देशपांडे सर , मा.सचिव विलास भोसले सर, मा.खजिनदार सोमनाथ माने सर विशेष उपस्थित होते. स्कूलच्या प्रिन्सिपल मा. निकिता माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात आठ वाजता झाली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.तुकाराम चोपडे, सौ.रुक्मिणी चोपडे ,

, श्री.भाग्येश जावळे (कक्ष अधिकारी मुंबई मंत्रालय) व माजी सैनिक श्री.देविदास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाल्यानंतर प्रांजली मॅडम यांनी आपल्या भाषणातून प्रमुख पाहुण्यांचे व उपस्थित पालक वर्गाचे स्वागत केले. यानंतर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना खूप छान मार्गदर्शन केले. स्कूलच्या प्रिन्सिपल निकिता माने मॅडम यांनी स्वातंत्र्य दिना विषयी माहिती सांगितली. नंतर सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात झाली ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य नृत्य व भाषणाच्या माध्यमातून सादर केले. विद्यार्थ्यांचे सादरीकरण पाहून प्रमुख पाहुणे व पालक मंडळी मंत्रमुग्ध झाले. स्कूलच्या प्रिन्सिपल मा. निकिता माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी एक सुंदर असे स्किट सादर केले. ज्यातून विद्यार्थ्यांनी सर्वांना सर्वधर्म समभाव याचा संदेश दिला . ते पाहून सर्व प्रेक्षक वर्ग भारावून गेला. एकंदरीत सर्वांनी उत्कृष्टरित्या सादरीकरण केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फौजिया मॅडम व प्रांजली मॅडम यांनी केले. तसेच पुनम मॅडम , प्रियंका मॅडम ,अश्विनी मॅडम ,हर्षदा मॅडम,खबाले सर ,भुजबळ सर ,देवकर सर ,शिरतोडे सर ,यांनी आपापल्या कार्यक्रमातील जबाबदाऱ्या व्यवस्थितरित्या पूर्ण केल्या .संपूर्ण कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडावा यासाठी सर्व शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी मनापासून योगदान दिले. संजय कूलकर्णि,
रवि हलजगीकर उपस्थित होते, हलजगीकर यांनी मार्गदर्शन केले,
सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा शेवट फौजिया मॅडमच्या आभार प्रदर्शनाने करण्यात आला.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी येथे स्वातंत्र्य दिनाचा अनोखा जल्लोष

img 20230815 wa0037(1)
चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी येथे 15 ऑगस्ट 2023 भारताचा 77 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मा.अध्यक्ष उदय देशपांडे सर , मा.सचिव विलास भोसले सर, मा.खजिनदार सोमनाथ माने सर विशेष उपस्थित होते. स्कूलच्या प्रिन्सिपल मा. निकिता माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात आठ वाजता झाली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.तुकाराम चोपडे, सौ.रुक्मिणी चोपडे ,

, श्री.भाग्येश जावळे (कक्ष अधिकारी मुंबई मंत्रालय) व माजी सैनिक श्री.देविदास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाल्यानंतर प्रांजली मॅडम यांनी आपल्या भाषणातून प्रमुख पाहुण्यांचे व उपस्थित पालक वर्गाचे स्वागत केले. यानंतर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना खूप छान मार्गदर्शन केले. स्कूलच्या प्रिन्सिपल निकिता माने मॅडम यांनी स्वातंत्र्य दिना विषयी माहिती सांगितली. नंतर सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात झाली ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य नृत्य व भाषणाच्या माध्यमातून सादर केले. विद्यार्थ्यांचे सादरीकरण पाहून प्रमुख पाहुणे व पालक मंडळी मंत्रमुग्ध झाले. स्कूलच्या प्रिन्सिपल मा. निकिता माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी एक सुंदर असे स्किट सादर केले. ज्यातून विद्यार्थ्यांनी सर्वांना सर्वधर्म समभाव याचा संदेश दिला . ते पाहून सर्व प्रेक्षक वर्ग भारावून गेला. एकंदरीत सर्वांनी उत्कृष्टरित्या सादरीकरण केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फौजिया मॅडम व प्रांजली मॅडम यांनी केले. तसेच पुनम मॅडम , प्रियंका मॅडम ,अश्विनी मॅडम ,हर्षदा मॅडम,खबाले सर ,भुजबळ सर ,देवकर सर ,शिरतोडे सर ,यांनी आपापल्या कार्यक्रमातील जबाबदाऱ्या व्यवस्थितरित्या पूर्ण केल्या .संपूर्ण कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडावा यासाठी सर्व शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी मनापासून योगदान दिले. संजय कूलकर्णि,
रवि हलजगीकर उपस्थित होते, हलजगीकर यांनी मार्गदर्शन केले,
सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा शेवट फौजिया मॅडमच्या आभार प्रदर्शनाने करण्यात आला.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

चेतना फाउंडेशन संचलित, चेतना इंटरनॅशनल स्कूल , सरडेवाडी येथे ‘🇮🇳हर घर तिरंगा 🇮🇳 राबवली’ मोहीम.

img 20230815 wa0030(1)
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी येथे 14 ऑगस्ट 2023 रोजी ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेचे उद्घाटन मा.अध्यक्ष उदय देशपांडे सर , मा.सचिव विलास भोसले सर, मा.खजिनदार सोमनाथ माने सर व मा. प्रिन्सिपल निकिता माने मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.
सरडेवाडी येथील सर्व घरी जाऊन विद्यार्थ्यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे वाटप करून ‘ 🇮🇳हर घर तिरंगा 🇮🇳’ मोहीम राबवण्यात आली. सरडेवाडी मधील लोकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन आपल्या राष्ट्रीय ध्वजाचे महत्त्व सांगण्यात आले .यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेतला. या मोहिमेमध्ये खबाले सर, भुजबळ सर, प्रांजली मॅडम, फौजिया मॅडम ,पुनम मॅडम, प्रियंका मॅडम, देशमाने मॅडम, हर्षदा मॅडम उपस्थित होते. सर्वांच्या सहभागातून ‘🇮🇳हर घर तिरंगा🇮🇳’मोहीम अतिशय उत्कृष्टरित्या पार पडली.

आपला महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात ध्वजारोहण

img 20230815 wa0037
मुंबई, दि 15 : महाराष्ट्र आज विदेशी थेट गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आहे. यामुळे रोजगार देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. राज्य कृषि, शिक्षण, ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि पर्यटन अशा सर्व क्षेत्रात देशात क्रमांक एकवर राहील हा आमचा विश्वास आहे. त्यासाठी आपण सर्वजण शपथबध्द होऊया आणि प्रयत्नशील राहूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालय प्रांगणात ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय, मुख्य सचिव मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर,माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज, भारतीय सेनेच्या तिन्ही दलाचे मुंबई येथील प्रमुख अधिकारी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी,मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

मुख्यमंत्र्यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीर,शहीद यांना वंदन केले.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की, राज्याचा प्रमुख म्हणून सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी काम करता आलं याचं समाधानही आज माझ्या मनात आहे.या स्वातंत्र्याला खरा अर्थ प्राप्त करून द्यायचा असेल तर या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात आपल्याला आनंद निर्माण करता आला पाहिजे असेही ते म्हणाले.

समाजातील शेवटच्या घटकाला स्वातंत्र्य आणि विकास अनुभवता यावा यासाठी गरजूंच्या वेदनेवर फुंकर घालता आली पाहिजे. तळागाळातील लोकांपर्यंत शासकीय योजना पोहोचल्या पाहिजेत असा शासनाचा मानस असून स्वराज्याचं रूपांतर सुराज्यात झालं पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेरी माटी मेरा देश अशी घोषणा करून आपल्याला या जबाबदारीचं स्मरण करून दिलं आहे.आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने या आवाहनाचं जबाबदारीनं पालन करून या अभियानात आपण मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.

गेल्या पाच वर्षात देशातील साडे तेरा कोटी जनतेला दारिद्रय रेषेबाहेर काढून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील गरिबांना जगण्याचे नवे बळ दिले. जनधन खात्यांच्या माध्यमातून महिलांना आत्मसन्मान मिळवून दिला. आता डीबीटीमुळे बंदा रुपया बँक खात्यात जमा होतोय.त्यामुळे योजनाच्या अंमलबजावणीत पारदर्शकता वाढली आहे असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्याचा खरा अर्थ असतो जबाबदारी. ही जबाबदारी आहे देशाचा विकास करण्याची, एक चांगला समाज घडवण्याची आणि सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची.केंद्राप्रमाणेच राज्यातही विकासाची, प्रगतीची गंगा वाहावी यासाठी गेले वर्षभर काम करता आले.याचा विशेष आनंद आजच्या स्वातंत्र्यदिनी आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील समन्वयाचा नवा अध्याय आम्ही लिहितोय, असे ते म्हणाले.

शासनाने वर्षभरात घेतलेले महत्त्वाचे निर्णय

‘शासन आपल्या दारी सारख्या क्रांतिकारी योजनेत सव्वा कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्याना करोडो रुपयांचे लाभ आपण दिले. या योजनेचा लाभार्थी माझ्यासमोर येतो, तेंव्हा त्याच्या डोळ्यात मला जो आनंद दिसतो.त्यात मला स्वातंत्र्याचा खरा अर्थ सापडतो असेही त्यांनी यावेळी सांगितले

शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर

शेतकऱ्यांसाठी आम्ही केवळ एक रुपयात पीक विमा योजना जाहीर करून देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात पीक विमा भरला. यामुळे दीड कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ झाला.आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना प्रसंगी निकषाबाहेर जाऊन मदत केली आहे.आजवर साडे बारा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत आपल्या सरकारने बळीराजाला दिली आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत केंद्राच्या 6 हजार रुपयांमध्ये राज्यातर्फे 6 हजार रुपये भर टाकली असून दरवर्षी 12 हजार रुपये शेतकऱ्यांना देत आहोत. 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना यांचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. रखडलेल्या 35 जलसंपदा प्रकल्पांच्या कामांना वेग दिला.जवळपास आठ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.जलयुक्त शिवार योजनाही आपण पुन्हा सुरू केली. समुद्रात वाहून जाणाऱ्या कोकणातील नद्यांचे पाणी वळविण्यासाठी नदीजोड प्रकल्प घेण्यात येत आहे.

मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून नद्यांचे पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू

असल्याचे सांगितले .

शासनाने ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत केला असून महिलांना प्रवासात 50 टक्के सवलत दिली. याचा करोडो नागरिकांना याचा लाभ झाला.

18 वर्ष पूर्ण होईपर्यंत मुलीस एक लाख रुपये अर्थसहाय देणारी ‘लेक लाडकी’ सारखी योजना सुरू केली.

दिव्यांग बांधव आणि भगिनींसाठी स्वतंत्र विभाग सुरू केला. गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून 12 हजारांहून अधिक रुग्णांना आम्ही 100 कोटी रुपये मदत केली.

महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत विमा संरक्षण दीड लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवलं. राज्यातील प्रत्येक नागरिकांसाठी ही योजना लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाला सर्व शासकीय रुग्णालयांत मोफत तपासणी आणि उपचार देण्याचा व राज्यात गोरगरीब लोकांसाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू केली.

वस्त्रोद्योग, माहिती तंत्रज्ञान, ग्रीन हायड्रोजन, बंदरे, यांची नवीन धोरणे आम्ही आणली आहेत. राज्यात रिक्त शासकीय पदांची भरती वेगाने सुरू आहे.

सर्वच शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बूट, मोजे देण्याच्या निर्णय घेतला. करोडो असंघटित कामगारांसाठी महामंडळ स्थापन केलं आहे.

दुर्लक्षित हजारो सफाई कामगारांसाठी लाड समितीच्या शिफारशी लागू केल्या. त्यांना नोकरी आणि घराची शाश्वती दिली. निराधारांचं निवृत्ती वेतन, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामसेवकांचं मानधन, विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप, अनुसूचित विद्यार्थ्याचा निर्वाह भत्यात भरीव वाढ केली आहे. सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अशा संस्थांमार्फत आम्ही मागास, दुर्बल, गरीब युवकांना उज्ज्वल भविष्य देत आहोत. उमेद अभियानातील महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांच्या खेळत्या भांडवलात दुपटीने वाढ केली असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी 9 वर्षापूर्वी शपथ घेताना म्हटले होते की, आम्ही दिलेली आश्वासने म्हणजेआमच्या कामाची दिशा आहे. आमचे ते लक्ष्य आणि आमची ती कटिबद्धता आहे. देशाला आत्मनिर्भर आणि सामर्थ्यशाली करण्याचे स्वप्न आपल्याला साकार करायचे आहे. याच भावनेने महाराष्ट्राचीही वाटचाल सुरू आहे असेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.

आपला महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात ध्वजारोहण

img 20230815 wa0037
मुंबई, दि 15 : महाराष्ट्र आज विदेशी थेट गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आहे. यामुळे रोजगार देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. राज्य कृषि, शिक्षण, ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि पर्यटन अशा सर्व क्षेत्रात देशात क्रमांक एकवर राहील हा आमचा विश्वास आहे. त्यासाठी आपण सर्वजण शपथबध्द होऊया आणि प्रयत्नशील राहूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालय प्रांगणात ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय, मुख्य सचिव मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर,माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज, भारतीय सेनेच्या तिन्ही दलाचे मुंबई येथील प्रमुख अधिकारी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी,मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

मुख्यमंत्र्यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीर,शहीद यांना वंदन केले.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की, राज्याचा प्रमुख म्हणून सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी काम करता आलं याचं समाधानही आज माझ्या मनात आहे.या स्वातंत्र्याला खरा अर्थ प्राप्त करून द्यायचा असेल तर या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात आपल्याला आनंद निर्माण करता आला पाहिजे असेही ते म्हणाले.

समाजातील शेवटच्या घटकाला स्वातंत्र्य आणि विकास अनुभवता यावा यासाठी गरजूंच्या वेदनेवर फुंकर घालता आली पाहिजे. तळागाळातील लोकांपर्यंत शासकीय योजना पोहोचल्या पाहिजेत असा शासनाचा मानस असून स्वराज्याचं रूपांतर सुराज्यात झालं पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेरी माटी मेरा देश अशी घोषणा करून आपल्याला या जबाबदारीचं स्मरण करून दिलं आहे.आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने या आवाहनाचं जबाबदारीनं पालन करून या अभियानात आपण मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.

गेल्या पाच वर्षात देशातील साडे तेरा कोटी जनतेला दारिद्रय रेषेबाहेर काढून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील गरिबांना जगण्याचे नवे बळ दिले. जनधन खात्यांच्या माध्यमातून महिलांना आत्मसन्मान मिळवून दिला. आता डीबीटीमुळे बंदा रुपया बँक खात्यात जमा होतोय.त्यामुळे योजनाच्या अंमलबजावणीत पारदर्शकता वाढली आहे असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्याचा खरा अर्थ असतो जबाबदारी. ही जबाबदारी आहे देशाचा विकास करण्याची, एक चांगला समाज घडवण्याची आणि सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची.केंद्राप्रमाणेच राज्यातही विकासाची, प्रगतीची गंगा वाहावी यासाठी गेले वर्षभर काम करता आले.याचा विशेष आनंद आजच्या स्वातंत्र्यदिनी आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील समन्वयाचा नवा अध्याय आम्ही लिहितोय, असे ते म्हणाले.

शासनाने वर्षभरात घेतलेले महत्त्वाचे निर्णय

‘शासन आपल्या दारी सारख्या क्रांतिकारी योजनेत सव्वा कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्याना करोडो रुपयांचे लाभ आपण दिले. या योजनेचा लाभार्थी माझ्यासमोर येतो, तेंव्हा त्याच्या डोळ्यात मला जो आनंद दिसतो.त्यात मला स्वातंत्र्याचा खरा अर्थ सापडतो असेही त्यांनी यावेळी सांगितले

शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर

शेतकऱ्यांसाठी आम्ही केवळ एक रुपयात पीक विमा योजना जाहीर करून देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात पीक विमा भरला. यामुळे दीड कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ झाला.आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना प्रसंगी निकषाबाहेर जाऊन मदत केली आहे.आजवर साडे बारा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत आपल्या सरकारने बळीराजाला दिली आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत केंद्राच्या 6 हजार रुपयांमध्ये राज्यातर्फे 6 हजार रुपये भर टाकली असून दरवर्षी 12 हजार रुपये शेतकऱ्यांना देत आहोत. 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना यांचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. रखडलेल्या 35 जलसंपदा प्रकल्पांच्या कामांना वेग दिला.जवळपास आठ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.जलयुक्त शिवार योजनाही आपण पुन्हा सुरू केली. समुद्रात वाहून जाणाऱ्या कोकणातील नद्यांचे पाणी वळविण्यासाठी नदीजोड प्रकल्प घेण्यात येत आहे.

मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून नद्यांचे पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू

असल्याचे सांगितले .

शासनाने ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत केला असून महिलांना प्रवासात 50 टक्के सवलत दिली. याचा करोडो नागरिकांना याचा लाभ झाला.

18 वर्ष पूर्ण होईपर्यंत मुलीस एक लाख रुपये अर्थसहाय देणारी ‘लेक लाडकी’ सारखी योजना सुरू केली.

दिव्यांग बांधव आणि भगिनींसाठी स्वतंत्र विभाग सुरू केला. गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून 12 हजारांहून अधिक रुग्णांना आम्ही 100 कोटी रुपये मदत केली.

महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत विमा संरक्षण दीड लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवलं. राज्यातील प्रत्येक नागरिकांसाठी ही योजना लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाला सर्व शासकीय रुग्णालयांत मोफत तपासणी आणि उपचार देण्याचा व राज्यात गोरगरीब लोकांसाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू केली.

वस्त्रोद्योग, माहिती तंत्रज्ञान, ग्रीन हायड्रोजन, बंदरे, यांची नवीन धोरणे आम्ही आणली आहेत. राज्यात रिक्त शासकीय पदांची भरती वेगाने सुरू आहे.

सर्वच शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बूट, मोजे देण्याच्या निर्णय घेतला. करोडो असंघटित कामगारांसाठी महामंडळ स्थापन केलं आहे.

दुर्लक्षित हजारो सफाई कामगारांसाठी लाड समितीच्या शिफारशी लागू केल्या. त्यांना नोकरी आणि घराची शाश्वती दिली. निराधारांचं निवृत्ती वेतन, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामसेवकांचं मानधन, विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप, अनुसूचित विद्यार्थ्याचा निर्वाह भत्यात भरीव वाढ केली आहे. सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अशा संस्थांमार्फत आम्ही मागास, दुर्बल, गरीब युवकांना उज्ज्वल भविष्य देत आहोत. उमेद अभियानातील महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांच्या खेळत्या भांडवलात दुपटीने वाढ केली असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी 9 वर्षापूर्वी शपथ घेताना म्हटले होते की, आम्ही दिलेली आश्वासने म्हणजेआमच्या कामाची दिशा आहे. आमचे ते लक्ष्य आणि आमची ती कटिबद्धता आहे. देशाला आत्मनिर्भर आणि सामर्थ्यशाली करण्याचे स्वप्न आपल्याला साकार करायचे आहे. याच भावनेने महाराष्ट्राचीही वाटचाल सुरू आहे असेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

img 20230815 wa0031
पुणे दि.१५: भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

शनिवारवाडा येथेही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हाधिकारी श्री. देशमुख यांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

स्वातंत्र्यदिनी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण

img 20230815 wa0030
पुणे, दि. १५: भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विधान भवन येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर राज्यपाल रमेश बैस यांनी स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त रितेश कुमार, विनयकुमार चौबे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

*दिव्यांग सैनिकांशी संवाद*
ध्वजारोहणानंतर कार्यक्रमाला उपस्थित दिव्यांग सैनिकांशी राज्यपालांनी संवाद साधला. यावेळी माहेर महिला मंडळाच्यावतीने दिव्यांग सैनिकांसाठी करण्यात येत असलेल्या कार्याची माहिती राज्यपालांनी घेतली.

स्वातंत्र्यदिनी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण

img 20230815 wa0030
पुणे, दि. १५: भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विधान भवन येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर राज्यपाल रमेश बैस यांनी स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त रितेश कुमार, विनयकुमार चौबे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

*दिव्यांग सैनिकांशी संवाद*
ध्वजारोहणानंतर कार्यक्रमाला उपस्थित दिव्यांग सैनिकांशी राज्यपालांनी संवाद साधला. यावेळी माहेर महिला मंडळाच्यावतीने दिव्यांग सैनिकांसाठी करण्यात येत असलेल्या कार्याची माहिती राज्यपालांनी घेतली.

महाराष्ट्रातील आठ अग्निशमन जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’

महाराष्ट्रातील आठ अग्निशमन जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’

पाच कर्मचाऱ्यांना ‘गृहरक्षक’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ जाहीर

 

नवी दिल्ली, 14 : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने केंद्रीय गृह मंत्रालयाने अग्निशमन क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्यांना आणि गृहरक्षक (होम गार्ड ) तसेच नागरी संरक्षण सेवेत उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रपती पदक आज जाहीर केले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

‘राष्ट्रपती शौर्य पदक’ उल्लेखनीय सेवांसाठी ‘राष्ट्रपती पदक’ तसेच ‘शौर्य पदक’ आणि ‘उत्कृष्ट सेवा पदक’ दरवर्षी अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दलाच्या जवानांना जाहीर केली जातात. वर्ष 2023 साठी 53 जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील आठ अग्निशमन जवानांचा समावेश आहे.

शौर्य आणि पराक्रम गाजवल्याबद्दल 03 जवानांना ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा शौर्य पदक’ आणि एका जवानाला ‘अग्निशमन सेवा शौर्यपदक’ जाहीर झाले आहे.

उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’, 8 कर्मचाऱ्यांना, उल्लेखनीय सेवेसाठी ‘अग्निशमन सेवा पदक’ आणि 41 कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवा कामगिरीसाठी पदक जाहीर करण्यात आले आहे. यापैकी महाराष्ट्रातील आठ अग्निशमन जवानांचा समावेश आहे.

देशातील 48 कर्मचाऱ्यांना, स्वयंसेवकांना गृहरक्षक आणि नागरी संरक्षण पदकांची घोषणा करण्यात आली आहे. उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती गृहरक्षक’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ तसेच उल्लेखनीय सेवेसाठी ‘गृहरक्षक’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ अनुक्रमे 05 कर्मचारी / स्वयंसेवक आणि 43 कर्मचारी/ स्वयंसेवकांना जाहीर झाले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाच कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी ‘गृहरक्षक’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ जाहीर करण्यात आली आहेत.

राज्यातील ‘अग्निशमन सेवा पदके’ आणि ‘गृहरक्षक’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ जाहीर झालेल्यांची यादी सोबत जोडली आहे.

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी अग्निसेवा पदक

1. श्री. करीमखान फजलखान पठाण, फायर इंजिन चालक

2. श्री. कसाप्पा लक्ष्मण माने, फायरमन

3. श्री. नरसिंह बसप्पा पटेल, रुग्णवाहिका परिचर (आग)

4. श्री. रवींद्र नारायणराव अंबुलगेकर, उपमुख्य अग्निशमन अधिकारी

5. श्री. दीपक कालीपाद घोष,उपमुख्य अग्निशमन अधिकारी

6. श्री. सुनील आनंदराव गायकवाड, उपअधिकारी

7. श्री. पराग शिवराम दळवी, लीडिंग फायरमन

8. श्री. तातू पांडुरंग परब, फायरमन

 

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी होम गार्ड आणि नागरी संरक्षण पदक

1. श्री. तुषार चंद्रकांत वरंडे, सेंटर कमांडर (एचजी)

2. श्री. अय्युबखान अहमदखान पठाण,ऑफिसर कमांडिंग (HG)

3. श्री. राजेंद्र पांडुरंग शहाकर,होमगार्ड

4. श्री. सुधाकर पांडुरंग सूर्यवंशी, नागरी संरक्षणाचे वरिष्ठ सहायक उपनियंत्रक (सीडी)

5. श्री. विजय जनार्दन झावरे, फायर रेस्क्यू लीडर (नागरी संरक्षण)

००००

महाराष्ट्रातील आठ अग्निशमन जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’

महाराष्ट्रातील आठ अग्निशमन जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’

पाच कर्मचाऱ्यांना ‘गृहरक्षक’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ जाहीर

 

नवी दिल्ली, 14 : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने केंद्रीय गृह मंत्रालयाने अग्निशमन क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्यांना आणि गृहरक्षक (होम गार्ड ) तसेच नागरी संरक्षण सेवेत उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रपती पदक आज जाहीर केले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

‘राष्ट्रपती शौर्य पदक’ उल्लेखनीय सेवांसाठी ‘राष्ट्रपती पदक’ तसेच ‘शौर्य पदक’ आणि ‘उत्कृष्ट सेवा पदक’ दरवर्षी अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दलाच्या जवानांना जाहीर केली जातात. वर्ष 2023 साठी 53 जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील आठ अग्निशमन जवानांचा समावेश आहे.

शौर्य आणि पराक्रम गाजवल्याबद्दल 03 जवानांना ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा शौर्य पदक’ आणि एका जवानाला ‘अग्निशमन सेवा शौर्यपदक’ जाहीर झाले आहे.

उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’, 8 कर्मचाऱ्यांना, उल्लेखनीय सेवेसाठी ‘अग्निशमन सेवा पदक’ आणि 41 कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवा कामगिरीसाठी पदक जाहीर करण्यात आले आहे. यापैकी महाराष्ट्रातील आठ अग्निशमन जवानांचा समावेश आहे.

देशातील 48 कर्मचाऱ्यांना, स्वयंसेवकांना गृहरक्षक आणि नागरी संरक्षण पदकांची घोषणा करण्यात आली आहे. उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती गृहरक्षक’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ तसेच उल्लेखनीय सेवेसाठी ‘गृहरक्षक’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ अनुक्रमे 05 कर्मचारी / स्वयंसेवक आणि 43 कर्मचारी/ स्वयंसेवकांना जाहीर झाले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाच कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी ‘गृहरक्षक’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ जाहीर करण्यात आली आहेत.

राज्यातील ‘अग्निशमन सेवा पदके’ आणि ‘गृहरक्षक’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ जाहीर झालेल्यांची यादी सोबत जोडली आहे.

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी अग्निसेवा पदक

1. श्री. करीमखान फजलखान पठाण, फायर इंजिन चालक

2. श्री. कसाप्पा लक्ष्मण माने, फायरमन

3. श्री. नरसिंह बसप्पा पटेल, रुग्णवाहिका परिचर (आग)

4. श्री. रवींद्र नारायणराव अंबुलगेकर, उपमुख्य अग्निशमन अधिकारी

5. श्री. दीपक कालीपाद घोष,उपमुख्य अग्निशमन अधिकारी

6. श्री. सुनील आनंदराव गायकवाड, उपअधिकारी

7. श्री. पराग शिवराम दळवी, लीडिंग फायरमन

8. श्री. तातू पांडुरंग परब, फायरमन

 

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी होम गार्ड आणि नागरी संरक्षण पदक

1. श्री. तुषार चंद्रकांत वरंडे, सेंटर कमांडर (एचजी)

2. श्री. अय्युबखान अहमदखान पठाण,ऑफिसर कमांडिंग (HG)

3. श्री. राजेंद्र पांडुरंग शहाकर,होमगार्ड

4. श्री. सुधाकर पांडुरंग सूर्यवंशी, नागरी संरक्षणाचे वरिष्ठ सहायक उपनियंत्रक (सीडी)

5. श्री. विजय जनार्दन झावरे, फायर रेस्क्यू लीडर (नागरी संरक्षण)

००००

error: Content is protected !!