बावडा दि.1. अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या विचारांचे पाईक होण्याचे गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. लहु वावरे यांनी केले.बावडा (ता. इंदापूर) येथील श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयामध्ये शुक्रवार (दि. 1) रोजी इतिहास आणि सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. बोलत होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आजीवन अध्ययन विस्तार विभागाचे प्रमुख प्रा. सिद्धार्थ चितारे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. तायाजी लोंढे हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या कार्याचा ऊहापोह केला. याप्रसंगी केदार पवार, राधिका वाघमारे, अमृता जाधव, सिमरन मुलाणी या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्राध्यापिका सौ. पुजा पाटील, अंकिता भगत, रोहिणी सावंत. प्रा. प्रविण घोगरे उपस्थित होते. सूत्रसंचालन इम्रान काझी आणि प्रियंका खंडागळे यांनी केले, तर प्राध्यापिका अर्चना हरिहर यांनी आभार मानले.