Home शैक्षणिक चेतना फाउंडेशन सरडेवाडी येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

चेतना फाउंडेशन सरडेवाडी येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

चेतना फाउंडेशन सरडेवाडी येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

इंदापूर – सरडेवाडी (ता.इंदापूर) येथील चेतना फाउंडेशन संचलित, चेतना कॉलेज ऑफ फार्मसी तसेच चेतना इंटरनॅशनल स्कूल आणि चेतना ज्युनिअर कॉलेज येथे गुरुपौर्णिमा अतिशय उत्तम साजरी करण्यात आली. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ तसेच माजी मंत्री महाराष्ट्र राज्य श्री. हर्षवर्धन पाटील साहेब यांनी भूषविले. यावेळी चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष श्री. उदय देशपांडे, सचिव श्री. विलास भोसले, खजिनदार श्री. सोमनाथ माने, चेतना कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.गणेश म्हस्के व चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या निकिता माने आधी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना श्री. हर्षवर्धन पाटील साहेब यांनी गुरूंचे महत्त्व सांगितले व ग्रामीण भागातील मुलांचे कौतुक केले व जीवनात शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. आयुष्यात गुरू चे महत्व त्यांनी सांगितले. शिक्षण आणि समाजसेवा यातील दुवा समजून सांगितला.

तसेच चेतना फाउंडेशन चे खजिनदार श्री.सोमनाथ माने सर यांनी आदर्श विद्यार्थी आणि गुणवंत विद्यार्थी कसा घडवायचा हे सांगितले. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील पवित्र नाते याबद्दल माहिती दिली.
चेतना कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.गणेश म्हस्के सर यांनी गुरुपौर्णिमा आणि गुरूचा आपल्या जीवनात असलेला मोलाचा वाटा याबद्दल उत्तम विचार मांडले.
जीवनाला योग्य दिशा देण्याचे काम गुरू करतात तसेच प्रत्येक व्यक्ती च्या आयुष्यामध्ये गुरूंचे अनन्य साधारण महत्त्व असते हे सांगितले.
आदर्श जीवन आपल्या डोळ्यासमोर असतात, संकटावर मात करण्यासाठी म्हणून आपल्यामध्ये क्षमता निर्माण होते . दुःख आले तरी सावरण्याची शक्ती निर्माण करते. कितीही आनंद झाला आणि कितीही मोठे झाले तरी आपण जमिनीवर उभे राहिले पाहिजे याची शिकवण दिली. अशा गुरूंच्या आशीर्वाद घेण्याचा आजचा दिवस आहे आणि म्हणून मी स्वतःला धन्य समजतो की आज इथे चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, चेतना फाउंडेशन आणि आमचे व्यासपीठावर बसलेले अध्यक्ष उदय देशपांडे त्याचबरोबर विलास भोसले उपस्थित असलेल्या आपल्या कॉलेजचे प्राचार्य आमच्याबरोबर आलेले दत्ता पांढरे आणि उपस्थित सर्व आमचे गुरुवर्य सर्व शिक्षक वर्ग , विद्यार्थी विद्यार्थिनींना आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो खरं म्हणजे मी आल्यानंतर आश्चर्यचकित वाटलं मी ऐकून होतो जाता येता या गोष्टींची माझ्या कानावर माहिती येत होती पण प्रत्यक्षपणे आज आल्यानंतर मला खरंच इतकं समाधान वाटतं इथे व्यासपीठावर बसलेल्या आमच्या सर्व सहकाऱ्यांनी आयुष्यात सगळ्यात चांगलं काम कोणतं केलं असेल तर नवीन पिढी घडवण्याचं काम आपण केले. तरी याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो व अभिनंदन करतो. ही संस्था आपण सुरू केली आणि मला वाटते बघता बघता ज्युनिअर केजी पासून ते अकरावी बारावी पर्यंत दीडशे पेक्षा अधिक मुले आपल्याकडे आहेत. डी फार्मसी व बी फार्मसी आपण सुरू केली त्यांना पण तेवढीच दीडशे 160 मुले आहेत. बघता बघता आपण ३५० मुलांचा शैक्षणिक संकुल आपण उभा केलेला आहे. माझ्या समोरच्या डाव्या बाजूला बॉईज होस्टेल आहे व उजव्या बाजूला गर्ल्स हॉस्टेल आहे मध्ये कॅन्टीन आहे. सगळ्यात चांगलं काम अजून कोणते केलं असेल आपण तर नव्या पिढीला खेळण्यासाठी ग्राउंड उपलब्ध करून दिले. कारण ग्राउंड फार महत्त्वाचे आहे आणि म्हणून एक सुंदर कॅम्पस आपण तयार केलं.
याबद्दल मी संस्थाचालक आणि सर्वांचे अभिनंदन करतो. मित्रांनो आता इथे काही मुला मुलींचा सत्कार माझ्या हस्ते केला आणि मला खूप समाधान वाटत आहे. आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये बुद्धिमत्ता आहे. ग्रामीण भागातल्या मुलांच्या मध्ये क्षमता आहे .त्यांच्यामध्ये चांगले संस्कार आहेत ,त्यांना फक्त गती देण्याचे काम आपल्या चेतना संस्थेच्याद्वारे करणे हे आपले काम आहे. त्यामुळे कुठल्या गोष्टीची फार अपेक्षा करू नये.आज गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने वडील कीच्या नात्याने मला असे वाटतं मला नव्या पिढीला एक गोष्ट सांगायची की आयुष्यामध्ये समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. आई-वडिलांची सेवा करा, ज्या समाजामध्ये आपण वाढलो तर समाजाला विसरू नका. भविष्यामध्ये पुढे जाताना ही पुढे बसलेले लहान लहान मुले आहेत त्यांच्यातील कोणी आयएस ऑफिसर होईल कोणी डॉक्टर होईल कोणी एखाद्या राजकारणी होईल कोणी एखादा उत्तम शिक्षक तज्ञ होईल काय सांगता येत नाही. शिवाजी महाराजांच्या आयुष्य 51 वर्षाचे होते. वयाच्या बाराव्या वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करण्याची शपथ घेतली. आणि आज फक्त बघता जगामध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेले पण आज जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यावर जर आपण गेलो तर एकच नाव आधाराने घेतलं जाते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे. आणि म्हणून आदर्श कोणाचा बाळगावा त्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श बाळगावा. समय सुचकता ,गनिमी कावा शूर पना निर्णय घेण्याची क्षमता अन्यायावर मात करण्याचे धाडस आणि समाजाकरता म्हणून रायते व राज्य करणारा असा एक राजा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आपल्याला मिळाला त्याचीच ही पावन भूमी आहे मालोजीराजांची घडी आपल्या परिसरामध्ये आहे. सांगण्याचा उद्देश या सर्व युवा पुरुषांनी आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग दाखवला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, आपली प्रगती झाली ,आपण चंद्रावर गेलो हे सगळं जरी असलं तरी सामाजिक अवस्था ही फार चांगली आहे असे मला वाटत नाही घराघरामधले प्रश्न नवरा-बायकोतील प्रश्न ,मुला मुलातील सुसंवाद कमी होत चाललेला आहे. नवीन टेक्नॉलॉजी मुळे घरातील घरपण गेले आहे एकत्र कुटुंबाची संकल्पना संपत चालली विभक्त कुटुंबाची संकल्पना आली, विभक्त कुटुंबामध्ये पण पुन्हा विभक्त कुटुंबाची संकल्पना पुढे आली. मला वाटते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चॅलेंजर्स ला सामोरे जावे लागणार आहे म्हणून जीवन जगण्यासाठी माणसाला काय लागतं ती आवश्यकता आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विचार करण्याचे आहे. मला वाटते जीवन जगण्यासाठी नीतिमत्ता महत्त्वाची आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली. फार्मसी महाविद्यालयाच्या प्रा. प्राजक्ता झगडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!