Home Blog Page 298

स्तु ती चा झ ट का* डॉ. ल.म.आसबे (कामधेनु परीवार)

📍📍📍📍📍📍📍
*स्तु ती चा झ ट का*
📍📍📍📍📍📍📍
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
माणूस स्वभावतः स्तुतीप्रिय आहे.
आपली केलेली किंवा झालेली स्तुती आवडत नाही, असा माणूस फार विरळ आहे.
*स्तुती ऐकायला गोड वाटत असली,*
*तरी धोकादायक असते.*
त्यामुळे ज्या ठिकाणी आपली स्तुती होते,
त्या ठिकाणी आपण
सतर्क आणि सावधान व्हायला हवे.
🏛️🏛️🏛️🏛️🏛️
👤स्तुती ऐकणारा माणूस पूर्णपणे मानसिकदृष्ट्या, स्तुती करणाऱ्याच्या आहारी जातो.
👤स्तुती करणाऱ्याला एकदा याची खात्री पटली, की स्तुती ऐकणाऱ्याला तो बळीचा बकरा करतो.
*या जगात निर्हेतुक आणि निःस्वार्थी स्तुती फक्त _आई_ आपल्या लेकराची करत असते,*
_ते तिचे *मातृप्रेम* असते, *मातृत्व* असते आणि *तेच देवत्व असते*._
⛳उपनिषदांनी मातृत्वाला
देवत्व संबोधून नमस्कार केला आहे.
*मा तृ दे वो भ व !*
याचा अर्थ निःस्वार्थी आणि निर्हेतुक स्तुती
एखाद्या व्यक्तीची करण्यासाठी
*आपल्या अंगी देवत्व यावे लागते*.
त्याशिवाय हे शक्य नाही.
💎💎💎💎💎
🎭 स्तुती आवडणारा
सामान्य मानव आहे .
🎭स्तुती न आवडणारा
विरक्त आणि वैरागी आहे.
🎯निर्हेतुक आणि निःस्वार्थी स्तुती करणारा
देव आहे.
🎭आपले स्वतःचे आत्मपरीक्षण केले असता,
आपल्याला हेच दिसून येते, की
*आपण स्वार्थाशिवाय आजपर्यंत*
*कोणाचीही स्तुती केलेली नाही.*
😇प्रसंगानुसार स्तुती करणे,
📍एक तर आपला नाईलाज असतो
📍किंवा ते अपरिहार्य असते
📍किंवा आपला निव्वळ तो स्वार्थ असतो.
⛳ _पारमार्थिक जीवनामध्ये त्यामुळेच स्वतःची स्तुती स्वतः आपल्या कानाने ऐकणे निषिद्ध समजलेले आहे_.
स्वतःची स्तुती स्वतः करणे
मूर्ख लक्षण समजले आहे.
*आपण आज पर्यंत असा मूर्खपणा बऱ्याच वेळेस केलेला आहे.*
💦💦💦💦💦💦
⁉️ स्तुती किती घातक असते⁉️
याचे ऐतिहासिक उदाहरण म्हणजे अफजलखान.
⛓️शिवरायांचे वकील अफजलखानाला भेटायला गेलेल्या पहिल्या भेटीपासून ते शिवरायांच्या भेटीपर्यंत त्याची स्तुतीच करत होते.
⛓️ स्तुती ऐकून ऐकून अफजलखान बेभान झाला, त्याचा विवेक संपला आणि शिवरायांच्या वकिलाच्या तो मानसिकदृष्ट्या पूर्ण कब्जात गेला.
⛓️प्रतापगडावर एकट्याने शिवाजीराजांना भेटायला यायला तो कबूल झाला आणि
⛓️शिवरायांनी चातुर्याने या स्तुतिसुमनांचा धूर्तपणे वापर करून, त्याला आपल्याला ज्या प्रमाणे, ज्या स्थळी पाहिजे, तसा फिरविला आणि आपला कार्यभाग पार पाडला.
_स्तुती न दिसणारे शस्त्र आहे, परंतु ते तलवारीपेक्षा जास्त परिणामकारक आणि घातक आहे._
आपला शत्रू आपल्यापेक्षा वरचढ असेल, तर त्याला _गनिमी कावा_ म्हणून हे वापरता येते आणि _स्वतःसाठी आत्मघातकी शस्त्र_ समजून कायमचे दूरही ठेवता येते.
आपल्या धूर्तपणावर आणि वापरावर
याचा परिणाम अवलंबून आहे.
⛳ *अनेकांची स्तुती आम्हा ब्रम्हहत्या l*
*एका वाचुनी त्या पांडुरंगा ll*
*आम्हा विष्णुदासा एकविध भाव l*
*न म्हणो त्या देव आणिकासी ll*

◼️◼️◼️◼️◼️◼️◼️
✒️ *डॉ. आसबे ल.म.*✒️
◼️◼️◼️◼️◼️◼️◼️
_अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार._
📞मो.नं.9822292713.📞

महाराष्ट्रा चे मा.उपमुख्यमंत्री स्व.गोपीनाथ जि मुंडे यांना अभिवादन

महाराष्ट्रा चे मा.उपमुख्यमंत्री स्व.गोपीनाथ जि मुंडे यांना अभिवादन

रामवर्मा आसबे

नमोन्युजनेशन परिवार

 

महाराष्ट्रा चे मा.उपमुख्यमंत्री स्व.गोपीनाथ जि मुंडे यांना अभिवादन

महाराष्ट्रा चे मा.उपमुख्यमंत्री स्व.गोपीनाथ जि मुंडे यांना अभिवादन

रामवर्मा आसबे

नमोन्युजनेशन परिवार

 

आषाढी एकादशीला पंढरपूरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा*

आषाढी एकादशीला पंढरपूरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा*

*🙏🌹श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय,👉लवकरच निमंत्रण देणार*

*पंढरपूर :-जुलै महिन्यात येणारी आषाढी एकादशीची परंपरेप्रमाणे शासकीय महापूजा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्याचा निर्णय तसेच परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल-रूक्मिणीचे विधी व पूजा करण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी. यासाठी प्रस्ताव तयार करून उपविभागीय अधिकार्‍यांच्या मार्फत जिल्हाधिकार्‍यांना व शासनाला पाठविण्यात येणार आहे.आषाढी एकादशीबाबत चर्चा करण्यासाठी श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीची गुरूवारी बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्ष स्थानी समितीचे सहाध्यक्ष ह. भ. प. गहीनीनाथ महाराज औसेकर होते. या बैठकीस चार स्थानिक सदस्य उपस्थित होते. इतर सदस्य व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले.*

*👉या बैठकीत आषाढी एकादशी परंपरेप्रमाणे होण्यावर एकमत झाला. त्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते शासकीय महापूजा होईल.त्यासाठी त्यांना अधिकृत निमंत्रण देण्याचा ठराव करण्यात आला. तसेच मंदिर समितीची होणारी पाद्यापूजा, शासकीय महापूजा, शासनाने दिलेल्या मुख्य पालख्यांना परवानगी व त्यांची पांडुरंगाबरोबर देव आणि पादुका यांची भेट होणेबाबत, श्री विठ्ठलास 18 संस्थांचे नैवेद्य दाखविण्यात येतात. त्यांना परवानगी देणे, आषाढी एकादशी दिवशी खाजगीवाल्यांचा रथोत्सव परंपरेप्रमाणे निघतो. त्यास परवानगी देणे, मानाच्या 195 फडकर्‍यांना दर्शनासाठी परवानगी देणे, पांडुरंगाच्या पादुकांची परंपरेप्रमाणे मिरवणूक निघते, त्या मिरवणूकीस परवानगी देणे त्यांना महाद्वार काला होता या महाद्वार काल्यास परवानगी देणे व प्रक्षापूजेला परवानगी मागणे या व इतर प्रथा व परंपरेचे जतन करून शासनाने परवानगी द्यावी. तसेच महापूजेच्या मानाच्या वारकरी ठरविणे याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आले. याबाबतचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय अधिकार्‍यांच्या मार्फत जिल्हाधिकार्‍यांना पाठविण्याबाबत चर्चा झाली.*

*👉आषाढी यात्रेनिमित्त 12 जुलैपासून श्री विठ्ठलाचा पलंग काढण्यात येणार आहे. त्यानंतर श्री विठ्ठलाचे 24 तास ऑनलाईन पध्दतीने दर्शन सुरू ठेवण्यात येणार आहे.शासनाच्या नियमानुसार मानाच्या पालख्या येतील त्या-त्या पध्दतीने त्यांची सर्व व्यवस्था करण्याची जबाबदारी मंदिर समितीची आहे. त्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत त्यात कोणत्याही कमरतेत कमी पडणार नाही असे समितीचे सहाध्यक्ष ह. भ. प. गहीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.*

*👉या बैठकीस श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्‍वर महाराज जळगांवकर, संभाजीराजे शिंदे, शकुंतला नडगिरे, नगराध्यक्षा साधनाताई भोसले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाडत तसेच इतर सदस्य ऑनलाईनपध्दतीने उपस्थित होते.*

*👉शासन नियमांनुसार सर्व विधी व परंपरा अबाधित ठेवून आषाढी यात्रा पार पाडली जाणार आहे. यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आषाढी वारीसाठी श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचे सज्ज आहे.कोरोनाची लाट कशाप्रकारे राहिल त्याप्रमाणे व्यवस्थापन केले जाईल.वारकर्‍यांच्या सेवेसाठी आम्ही कठीबध्द आहोत.ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर सहाध्यक्ष, श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरे समिती*

*👉20 जुलै रोजी आषाढी एकादशी*

*👉12 जुलैपासून श्री विठ्ठलाचे 24 तास ऑनलाईन दर्शन*

*👉महापूजेसाठी लवकरच मुख्यमंत्र्यांना निमंत्रण*

*👉देव-संताची भेट परंपरेप्रमाणे होणार*

*👉शासनाच्या नियमांप्रमाणे चंद्रभागा स्नान व नगरप्रदक्षणा होणार*

*👉प्रथा व परंपरा अबाधित ठेवून आषाढी यात्रा साजरी होणार*

आषाढी एकादशीला पंढरपूरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा*

आषाढी एकादशीला पंढरपूरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा*

*🙏🌹श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय,👉लवकरच निमंत्रण देणार*

*पंढरपूर :-जुलै महिन्यात येणारी आषाढी एकादशीची परंपरेप्रमाणे शासकीय महापूजा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्याचा निर्णय तसेच परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल-रूक्मिणीचे विधी व पूजा करण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी. यासाठी प्रस्ताव तयार करून उपविभागीय अधिकार्‍यांच्या मार्फत जिल्हाधिकार्‍यांना व शासनाला पाठविण्यात येणार आहे.आषाढी एकादशीबाबत चर्चा करण्यासाठी श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीची गुरूवारी बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्ष स्थानी समितीचे सहाध्यक्ष ह. भ. प. गहीनीनाथ महाराज औसेकर होते. या बैठकीस चार स्थानिक सदस्य उपस्थित होते. इतर सदस्य व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले.*

*👉या बैठकीत आषाढी एकादशी परंपरेप्रमाणे होण्यावर एकमत झाला. त्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते शासकीय महापूजा होईल.त्यासाठी त्यांना अधिकृत निमंत्रण देण्याचा ठराव करण्यात आला. तसेच मंदिर समितीची होणारी पाद्यापूजा, शासकीय महापूजा, शासनाने दिलेल्या मुख्य पालख्यांना परवानगी व त्यांची पांडुरंगाबरोबर देव आणि पादुका यांची भेट होणेबाबत, श्री विठ्ठलास 18 संस्थांचे नैवेद्य दाखविण्यात येतात. त्यांना परवानगी देणे, आषाढी एकादशी दिवशी खाजगीवाल्यांचा रथोत्सव परंपरेप्रमाणे निघतो. त्यास परवानगी देणे, मानाच्या 195 फडकर्‍यांना दर्शनासाठी परवानगी देणे, पांडुरंगाच्या पादुकांची परंपरेप्रमाणे मिरवणूक निघते, त्या मिरवणूकीस परवानगी देणे त्यांना महाद्वार काला होता या महाद्वार काल्यास परवानगी देणे व प्रक्षापूजेला परवानगी मागणे या व इतर प्रथा व परंपरेचे जतन करून शासनाने परवानगी द्यावी. तसेच महापूजेच्या मानाच्या वारकरी ठरविणे याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आले. याबाबतचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय अधिकार्‍यांच्या मार्फत जिल्हाधिकार्‍यांना पाठविण्याबाबत चर्चा झाली.*

*👉आषाढी यात्रेनिमित्त 12 जुलैपासून श्री विठ्ठलाचा पलंग काढण्यात येणार आहे. त्यानंतर श्री विठ्ठलाचे 24 तास ऑनलाईन पध्दतीने दर्शन सुरू ठेवण्यात येणार आहे.शासनाच्या नियमानुसार मानाच्या पालख्या येतील त्या-त्या पध्दतीने त्यांची सर्व व्यवस्था करण्याची जबाबदारी मंदिर समितीची आहे. त्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत त्यात कोणत्याही कमरतेत कमी पडणार नाही असे समितीचे सहाध्यक्ष ह. भ. प. गहीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.*

*👉या बैठकीस श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्‍वर महाराज जळगांवकर, संभाजीराजे शिंदे, शकुंतला नडगिरे, नगराध्यक्षा साधनाताई भोसले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाडत तसेच इतर सदस्य ऑनलाईनपध्दतीने उपस्थित होते.*

*👉शासन नियमांनुसार सर्व विधी व परंपरा अबाधित ठेवून आषाढी यात्रा पार पाडली जाणार आहे. यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आषाढी वारीसाठी श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचे सज्ज आहे.कोरोनाची लाट कशाप्रकारे राहिल त्याप्रमाणे व्यवस्थापन केले जाईल.वारकर्‍यांच्या सेवेसाठी आम्ही कठीबध्द आहोत.ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर सहाध्यक्ष, श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरे समिती*

*👉20 जुलै रोजी आषाढी एकादशी*

*👉12 जुलैपासून श्री विठ्ठलाचे 24 तास ऑनलाईन दर्शन*

*👉महापूजेसाठी लवकरच मुख्यमंत्र्यांना निमंत्रण*

*👉देव-संताची भेट परंपरेप्रमाणे होणार*

*👉शासनाच्या नियमांप्रमाणे चंद्रभागा स्नान व नगरप्रदक्षणा होणार*

*👉प्रथा व परंपरा अबाधित ठेवून आषाढी यात्रा साजरी होणार*

केंद्राने पेन्शनच्या नियमात केले बदल,👉आता रिटायरमेंटनंतर ‘ही’ खबरदारी घ्या नाहीतर तुमची पेन्शन होईल बंद*

केंद्राने पेन्शनच्या नियमात केले बदल,👉आता रिटायरमेंटनंतर ‘ही’ खबरदारी घ्या नाहीतर तुमची पेन्शन होईल बंद*

*नवी दिल्ली:-केंद्रातील मोदी सरकारने पेन्शनच्या नियमात सुधारणा केली आहे. देशातील अंतर्गत सुरक्षा लक्षात घेता शासकीय सेवकांसाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सिक्योरिटी आणि इंटेलीजेंस ऑर्गेनाइजेशनचे रिटायर्ड अधिकारी त्यांच्या संघटनेच्या प्रमुखांच्या परवानगीशिवाय संस्थेशी संबंधित काहीही प्रकाशित करू शकत नाहीत. म्हणजेच पेन्शन नियमात (Pension Rules) सुधारणा झाल्यानंतर गुप्तहेर किंवा सुरक्षिततेशी संबंधित संस्थांचे रिटायर्ड अधिकारी परवानगीशिवाय कोणतीही कन्टेन्ट प्रकाशित करू शकत नाहीत. जर त्यांनी परवानगीशिवाय हे केले तर त्यांची पेन्शन बंद होईल.*

*👉कन्टेन्ट संवेदनशील आहे की नाही यावर अधिकारी निर्णय घेतील*

*या सुधारित नियमांनुसार, जबाबदार अधिकाऱ्यास प्रकाशनासाठी दिलेला कन्टेन्ट संवेदनशील आहे की असंवेदनशील आहे याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे.तसेच हा कन्टेन्ट संस्थेच्या अखत्यारीत येतो की नाही हेदेखील पाहिले जाईल. म्हणजेच संबंधित संस्थेचे प्रमुख हे प्रकरण प्रकाशनासाठी संवेदनशील आहे की नाही हे संघटनेच्या क्षेत्रात पडते की नाही हे ठरवेल.*

*👉डीओपीटीने केंद्रीय नागरी सेवा (Pension) नियम, 1972 मध्ये सुधारित कलम जोडला आहे. त्यात नमूद केले आहे की, सेवानिवृत्तीनंतर आरटीआय कायद्याच्या दुसर्‍या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या संस्थांमध्ये काम करणा्यांना संस्थेच्या प्रमुखांकडे पूर्वसूचना घेतल्याखेरीज संस्थेच्या डोमेनशी संबंधित काहीही प्रकाशित करण्यास परवानगी दिली जाणार नाही.*

*👉हे नियम ‘या’ संस्थांना लागू असतील*

*सुधारित नियम इंटेलिजेंस ब्यूरो, रिसर्च अँड एनालिसिस विंग, सेंट्रल इकोनॉमिक इंटेलीजेंस ब्यूरो, अंमलबजावणी संचालनालय, नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो, सीबीआय, एविएशन रिसर्च सेंटर, स्पेशल फ्रंटियर फोर्स, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलिस दल, भारत-तिबेट सीमा पोलिस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, नॅशनल सिक्योरिटी गार्ड, आसाम रायफल्स, सशस्त्र सीमा दल, स्पेशल ब्रांच (सीआयडी), अंदमान आणि निकोबार, क्राइम ब्रांच-सीआयडी-सीबी, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, बॉर्डर रोड़ डेवलपमेंट बोर्ड आणि फाइनेंशियल इंटेलिजेंस यूनिटच्या कर्मचार्‍यांना लागू केले.*

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना अर्थसहाय्य, ऊस तोडणी कामगारांच्या मुलांना वसतिगृह,👉 ठाकरे सरकारचा मोठा निर्णय*

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना अर्थसहाय्य, ऊस तोडणी कामगारांच्या मुलांना वसतिगृह,👉 ठाकरे सरकारचा मोठा निर्णय*

*मुंबई:- महाविकास आघाडी सरकारच्या आज झालेल्या मंत्रिंमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय झाला. उद्योग निरीक्षक (गट- क) संवर्गाची नामनिर्देशाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थलांतरीत ऊस तोड कामगारांच्या मुला मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना राबवण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे.*

*👉कोरोनानं पालक गमावलेल्या बालकांना दिलासा*

*महाराष्ट्राला कोरोना विषाणू संसर्गामुळे मोठा फटका बसला आहे.तर महाराष्ट्रातील कोरोना काळात अनाथ झालेल्या बालकांना 5 लाख रुपयांची मदत करणार आहे. राज्यातील अनेक बालकांनी त्यांचे दोन्ही पालक गमावले आहेत. राज्यात 5172 मुलं कोरोनामुळं अनाथ झाली आहेत. या बालकांना महाराष्ट्र सरकार 5 लाख रुपयांची मदत करणार आहे. ज्या बालकांचे नातेवाईक त्यांचा सांभाळ करतील त्यांच्याकडे बालकं ठेवली जातील. तर ज्यांचे नातेवाईक त्या बालकांना सांभाळणार नाहीत त्यांची जबाबदारी राज्य सरकार घेईल, अशी माहिती महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.*

*👉ऊस तोड कामगारांच्या मुलांसाठी वसतीगृह*

*स्थलांतरीत ऊस तोड कामगारांच्या मुला मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना राबवण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. महाविकास आघाडी सरकार 20 वसतिगृह सुरु करणार आहे. यामध्ये 10 मुलांची आणि 10 मुलींची वसतिगृह तयार केली जातील. अहमदनगर, बीड या जिल्ह्यात वसतिगृह उभारली जातील. यासाठी लागणारे 15 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात पाटोदा, बीड, माजलगाव, अहमदनगरमधील पाथर्डी आणि जालना जिल्ह्यात वसतिगृह उभारली जातील. गोपिनाथ मुंडे ऊसतोड कामगार मंडळाला एका टनामागं कारखाने 10 रुपये आणि सरकार 10 रुपये देणार आहे. खर्चाती तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. संत भगवानबाबा यांच्या नावानं ही योजना राबवण्यात येत आहे. गोपिनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला हा निर्णय घेतो, हे भाग्य आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.*

*गोपी रसोई द्वारा दैनिक गो सेवा वानर सेवा एवं सन्त सेवा चलाई जा रही है *संस्थापक अध्यक्ष-साध्वी वृंदा मयूरी वृंदावन* *राष्ट्रीय प्रभारी-आचार्य लक्ष्मीनारायण वृंदावन*

गोपी रसोई द्वारा दैनिक गो सेवा वानर सेवा एवं सन्त सेवा चलाई जा रही है
*संस्थापक अध्यक्ष-साध्वी वृंदा मयूरी वृंदावन*
*राष्ट्रीय प्रभारी-आचार्य लक्ष्मीनारायण वृंदावन*
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

आजकल कोरोना कोविड की वजह से वृन्दावन में तीर्थ यात्री आना बंद हो गए हैं जी*

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*जय श्री कृष्ण जी,जय गो माता*
~~~~~~~~~~~~~~~~
🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜
*आजकल कोरोना कोविड की वजह से वृन्दावन में तीर्थ यात्री आना बंद हो गए हैं जी*

*इस वजह से गो माता को चारे एवं वानरों को भोजन की समस्या हो गई है जी*
~~~~~~~~~~~~~~~~~
*गोपी रसोई द्वारा दैनिक गो सेवा वानर सेवा एवं सन्त सेवा चलाई जा रही है जी*
*संस्थापक अध्यक्ष-साध्वी वृंदा मयूरी वृंदावन*
*राष्ट्रीय प्रभारी-आचार्य लक्ष्मीनारायण वृंदावन*
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

आजकल कोरोना कोविड की वजह से वृन्दावन में तीर्थ यात्री आना बंद हो गए हैं जी*

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*जय श्री कृष्ण जी,जय गो माता*
~~~~~~~~~~~~~~~~
🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜
*आजकल कोरोना कोविड की वजह से वृन्दावन में तीर्थ यात्री आना बंद हो गए हैं जी*

*इस वजह से गो माता को चारे एवं वानरों को भोजन की समस्या हो गई है जी*
~~~~~~~~~~~~~~~~~
*गोपी रसोई द्वारा दैनिक गो सेवा वानर सेवा एवं सन्त सेवा चलाई जा रही है जी*
*संस्थापक अध्यक्ष-साध्वी वृंदा मयूरी वृंदावन*
*राष्ट्रीय प्रभारी-आचार्य लक्ष्मीनारायण वृंदावन*
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

error: Content is protected !!