Home National कृषी क्षेत्राच्या प्रगतीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प- हर्षवर्धन पाटील

कृषी क्षेत्राच्या प्रगतीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प- हर्षवर्धन पाटील

*कृषी क्षेत्राच्या प्रगतीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प- हर्षवर्धन पाटील*
*—————————-*
*केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. तसेच उत्पादीत शेतीमालास दीडपट हमीभाव देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. देशातील कृषी क्षेत्राच्या प्रगतीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.*
*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अतिशय कल्पक व देशाच्या प्रगतीला चालना देणारा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात कृषी कर्ज वितरणाचे 16.5 लाख कोटीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. तसेच कृषी उत्पादन निर्यातीमध्ये आणखी 22 कृषी उत्पादनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राला चालना देणारा अर्थसंकल्प असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले, गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी रू.75 हजार 60 कोटी, डाळींब उत्पादक शेतकऱ्यांसाठी रू.10,503 कोटी, भातासाठी रू. 1 लाख 72 हजार 752 कोटीची भरीव तरतुद तसेच 1 हजार कृषी बाजारपेठा ऑनलाइन यंत्रणेशी जोडण्याचे उद्दिष्ट हे कृषी क्षेत्रासाठी स्वागतार्ह आहे.
अर्थसंकल्पामध्ये ग्रामीण सुधारण्यासाठी तब्बल रू. 40 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नावाजलेल्या उज्वला गॅस योजनेत आणखी 1 कोटी नागरिकांचा समावेश करणे, पंतप्रधान आत्मनिर्भर आरोग्य योजना सुरु करणे, आरोग्य क्षेत्रासाठी मोठी तरतूद,सर्वांना शिक्षण देण्याचा संकल्प आदी वैशिष्ट्यांमुळे आजचा अर्थसंकल्प लोकाभिमुख, देशाच्या विकासाला चालना देणारा असा स्वागतार्ह आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!