Home महाराष्ट्र राज्य आमदार निलेश लंके यांचा महाराष्ट्रातील सर्व आमदार खासदार यांनी बोध घ्यावा. दिपक अण्णा काटे

आमदार निलेश लंके यांचा महाराष्ट्रातील सर्व आमदार खासदार यांनी बोध घ्यावा. दिपक अण्णा काटे

आमदार निलेश लंके यांचा महाराष्ट्रातील सर्व आमदार खासदार यांनी बोध घ्यावा.
मा.दिपक अण्णा काटे

पारनेर तालुक्याचे विद्यमान आमदार निलेश भाऊ लंके यांनी उभा केलेल्या कोव्हिड सेंटरला शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष पै. दिपक अण्णा काटे व उद्योजक पप्पु भाऊ जासुद यांनी भेट दिली.यावेळी संघटनेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

ना मास्क, ना फेसकव्हर, सॅनेटायजरचा विषयच नाही. अशा स्थितीतही दिवसातील जवळपास २० तास कोव्हिड सेंटरमध्ये थांबून बाधित रूग्णांची ऑक्सिजन लेव्हल,टेंमपरेचर तपासण्यापासून आस्थेवाईकपणे चौकशी करीत अहोरात्र रुग्णसेवाचा वसा घेतलेले पारनेर – नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके हे राज्यभर चर्चेत आले आहेत. मंगळवारी तर त्यांनी चक्क भाळवणीच्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरातच मुक्काम केला.

कोरोनाच्या या संकट काळात अनेक राजकिय पुढारी घरात बसून असतानाच ,बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आ. लंके यांनी आपल्या घरादाराकडे पुर्णपणे दुर्लक्ष करत पुर्ण वेळ हजारो रुग्णांना बेड,व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणे, इंजेक्शन उपलब्ध करून गरजू रुग्णांपर्यंत पोहचविणे, वृद्ध माता पिता, तरुण बंधु भगिनींच्या प्रत्येक बेडवर जात त्यांची तपासणी करणे, त्यांना मायेचा आधार देणे , कोण जेवले नाही ? कुणाला काही त्रास होतो का? कुणा वृद्ध आजी -आजोबांच्या सोबत नातेवाईक नसल्यास त्यांच्या मुलाचे कर्तव्य पार पाडणे, तरुण बंधु भगिनींचा भाऊ होणे, चिमुकल्यांचा मामा होणे, मायेच्या आधारा बरोबरच रुग्णांना मानसीक आधार देत त्यांच्यात नवीन उर्जा निर्माण करणे या सर्व भूमिका एकाच वेळी पार पाडणारा अष्टपैलु अामदार आयुष्याच्या रंगमंचावर वेगवेगळ्या भूमिका पार पाडतोय.

यावेळी बोलताना दिपक काटे म्हणाले पारनेर चे विद्यमान आमदार लोकनेते निलेश भाऊ लंके यांनी समाजसेवेचा वारसा जपत तब्बल ११०० चे बेडचे कोव्हिड सेंटर उभारुन महाराष्ट्रातील सर्व मंत्री आमदार खासदार यांना लाजवेल असे काम करुन दाखवले आहे. एव्हडेच नाही तर स्वतः लंके साहेब दिवसातून तब्बल २० तास तेथे उपस्थित राहून लोकांना धीर देण्याच काम करत आहेत.त्यांच्या कार्याचे करावे तेव्हढे कौतुक थोडेच आहे.अश्याच प्रकारे जर महाराष्ट्रातील सर्व अजी-माजी मंञी व अाजी-माजी अामदारांनी जर काम केल्यास एका वेळेस जरी महाराष्ट्रावर १० जरी रोगांनी आक्रमण केले तरी आपण त्या रोगांशी लढू शकतो.
परंतु गरज आहे ती फक्त इच्छा शक्ती ची . महाराष्ट्रात असा एकही आमदार नाही की ज्याची आर्थिक स्थिती मजबूत नाही.म्हणजे बाकीकडे फक्त झगा मगा आन मला बघा असेच उपक्रम चालू दिसतोय.आता जनतेने विचार केला पाहिजे की आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी त्यांची कामे करत आहेत का .फक्त इलेक्शन च्या वेळेस आम्हाला तुमच्या सेवेची एक संधी द्या म्हणायचं आणि आता खरी गरज असताना फक्त काळजी घ्या म्हणायचं.इंदापूर तालुक्यात ही एक माजी मंत्री व एक विद्यमान राज्यमंत्री आहेत . जनतेला त्यांच्या कडून खुप अपेक्षा आहेत.त्यांनी श्रेय वाद आणि नुसते उद्घाटने करण्याची घाई करण्यापेक्षा लोकांना सुविधा कश्या उपलब्ध होतील यावर लक्ष द्यावे हीच गोर-गरीब निराधार जनतेची अपेक्षा अाहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!