पैसा मिळवण्याबरोबरच पैशाचे नियोजन करणे ही काळाची गरज- संदीप चव्हाण
बावडा दि.7. विद्यार्थ्यांनी उत्तुंग स्वप्न पाहिले पाहिजे आणि ते पूर्ण करण्यासाठी स्वतः प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या आतमध्ये लपलेल्या निखार्यावर फुंकर घालण्याची गरज आहे. असे प्रतिपादन संदीप चव्हाण यांनी केले. बावडा (ता. इंदापूर) येथील श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयामध्ये बुधवार (दि. 7) रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आजीवन अध्ययन विभाग आणि वाणिज्य विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रोजगार आणि उद्योजकता कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून जनता सहकारी बँक इंदापूरचे शाखा व्यवस्थापक संदीप चव्हाण बोलत होते. श्रीमंत होण्यासाठी पैसा कमवू नका तर पैसा कमावताना योग्य नियोजन आपल्याला करता यायला पाहिजे कमाई करणे,बचत करणे , खर्च करणे पैशाचे संरक्षण करणे आणि मिळवलेल्या पैशाला कामाला लावणे म्हणजे आर्थिक साक्षरता होय असेही ते म्हणाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सौ. पुजा पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ लहू वावरे हे उपस्थित होते. शिक्षण रोजगार आणि उद्योजकता हे अर्थव्यवस्थेचे दोन स्तंभ आहेत. विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करावेच लागेल. आर्थिक साक्षरतेबरोबरच सायबर सुरक्षाही महत्वाची आहे. असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणात केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिका उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. प्रविण घोगरे यांनी केले, तर प्रा. सिद्धार्थ चितारे यांनी आभार मानले.