Home शैक्षणिक चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे विद्यार्थ्यांची आयुर्वेदीय अर्कशाळा लि.सातारा औद्योगिक भेट

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे विद्यार्थ्यांची आयुर्वेदीय अर्कशाळा लि.सातारा औद्योगिक भेट

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे विद्यार्थ्यांची आयुर्वेदीय अर्कशाळा लि.सातारा औद्योगिक भेट

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे विद्यार्थ्यांची आयुर्वेदीय अर्कशाळा लि.सातारा औद्योगिक भेट

संपादकीय

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मधील प्रथम वर्ष डी.फार्मसी आणि द्वितीय वर्ष बी.फार्मसीचे विद्यार्थ्यांनी एका प्रसिद्ध आयुर्वेदीय अर्कशाळा लि.सातारा मध्ये औद्योगिक भेटीचा अनुभव घेतला, जिथे तंत्रज्ञान, संशोधन आणि औषध उद्योगातील आधुनिक उपकरणांचा परिचय मिळाला. वास्तविक औद्योगिक वातावरण पाहण्याची संधी , शैक्षणिक सिद्धांतांना प्रत्यक्ष प्रॅक्टिकलसह उदाहरण, आणि पुढील करिअर / उद्योगातील संधी याबद्दल अधिक स्पष्टता देतात. ज्यात विद्यार्थ्यांनी कच्चा माल प्रक्रिया आणि सूत्रीकरण विकास अनुभवले. औषधांची गुणवत्ता कशी तपासली जाते(गुणवत्ता नियंत्रण ,गुणवत्ता हमी,रसायन प्रयोगशाळा, परीक्षण उपकरणे इ. हे प्रत्यक्ष पाहता येते. उत्पादन पद्धती) चे महत्त्व समजते. आधुनिक मशीन, स्वयंचलित प्रक्रिया, हेरार्की सिस्टम ही सर्व प्रत्यक्ष पाहून तांत्रिक ज्ञान विकसित होते. उदाहरणार्थ: अर्क काढण्याची यंत्रे, पॅकिंग लाईन, बॉटलिंग मशीन, इ पाठ्यपुस्तकातील सिद्धांत आणि औद्योगिक व्यावहारिक अनुभव यांचा समन्वय होतो. औषध रचना, सूत्रीकरण घटकांची निवड, निकष पद्धती इ. प्रत्यक्ष अनुभवल्यामुळे लक्षात राहते.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के म्हणाले की, औद्योगिक भेटीत उद्योगातील तज्ज्ञांशी संवाद साधता येतो. मानसशास्त्रीय, तांत्रिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून ते उपयुक्त ठरते. औद्योगिक भेटीत उद्योगातील तज्ज्ञांशी संवाद साधता येतो. मानसशास्त्रीय, तांत्रिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून ते उपयुक्त ठरते. विद्यार्थ्यांना आयुर्वेदिक उद्योगातील विविध नोकरी/क्षेत्रे समजतात उत्पादन नियंत्रक ,गुणवत्ता विशेषज्ञ नियमन व अनुपालन अधिकारी, संशोधन व विकास यामुळे भविष्यातील करिअर निर्णय सोपे होतात. प्राचीन काळात आयुर्वेदिक औषधे नैसर्गिक घटकांपासून तयार केली जात. औषधी वनस्पती, मुळे, पाने, फुले, फळे, खनिजे आणि प्राणीजन्य घटक वापरून चूर्ण, काढे, आसव, अरिष्ट, लेह्य, तेल आणि घृत यांसारखी उत्पादने बनवली जात होती. मध्ययुगीन काळात आयुर्वेदाचा प्रसार भारतभर झाला. राजाश्रयामुळे वैद्य आणि गुरुकुल पद्धतीद्वारे ज्ञानाचे संवर्धन झाले. अनेक आयुर्वेदिक औषधनिर्मिती केंद्रे (औषधालये) स्थापन झाली आणि स्थानिक पातळीवर औषधे तयार होऊ लागली. आधुनिक काळ स्वातंत्र्यानंतर आयुर्वेदाला पुन्हा महत्त्व प्राप्त झाले. आयुर्वेदिक उत्पादनांचे औद्योगिक स्तरावर उत्पादन सुरू झाले. च्यवनप्राश, त्रिफळा, अश्वगंधा, ब्राह्मी, नीम, आयुर्वेदिक तेल, सौंदर्यप्रसाधने आणि आरोग्यपूरक उत्पादने मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली. आजचा काळ आयुर्वेदिक उत्पादने केवळ भारतातच नव्हे तर जगभर लोकप्रिय झाली आहेत. नैसर्गिक, दुष्परिणाम कमी असलेली आणि जीवनशैलीशी सुसंगत अशी ही उत्पादने आरोग्य, सौंदर्य आणि तंदुरुस्तीच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

चेतना फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळासाहेब बोराटे आदींनी शुभेच्छा देऊन कौतुक केले. या औद्योगिक भेटीचे नियोजन प्रा. अनिकेथ सुर्वे, प्रा. दाजी हुलगे, प्रा. रूतुजा धायगुडे, प्रा. गीतांजली कांबळे यानी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!