चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये वर्ल्ड फार्मसिस्ट दिना निमित्त वृक्षरोपण
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा तुकाराम महाराजांचा पणती तून दिसून येते की, वृक्ष हा आपले सोयरे आहेत. 25 सप्टेंबर हा जागतिक फार्मासिस्ट डे व राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत वृक्षा रोपण करण्यात आले. यावेळी इंदापूर तालुका केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सत्वशील पाटील यांच्या हस्ते वृक्ष रोपण केले. चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के म्हणाले की विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयी विचार रुजवण्यात यावेत व त्याची गरज काय असते हे पटवून सांगितले. महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये वृक्षारोपण आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये ३० हून अधिक राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी भाग घेतला होता. कॅम्पसमध्ये अनेक औषधी वनस्पती लावण्यात आल्या होत्या. झाडे वाचवणे; पर्यावरण वाचवणे या उद्देशाने हे आयोजन करण्यात आले होते. वृक्षारोपणाबाबत जागरूकता,प्रदूषणाचा परिणाम कमी करा, औषधी वापरासाठी वनस्पतींचा वापर करा, वाढत्या प्रदूषणामुळे आणि विकासामुळे वृक्षारोपण, वनौषधी झाडे औषधी उद्देशाने उपयुक्त आहेत.त्यानंतर प्रा. अनिकेत सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना अनेक औषधी वनस्पती, त्यातील फायटोकेमिकल घटक आणि त्यांचे उपयोग याबद्दल समजावून सांगितले. त्यांनी कृत्रिम औषध आणि हर्बल औषधां बद्दल मार्गदर्शन केले आणि सर्व कृत्रिम औषधां पेक्षा हर्बल औषधाचे महत्त्व सांगितले.
संपूर्ण जगाने कोरोना सारख्या महामारीत ऑक्सिजनची कमतरता पाहिलेली आहे. त्याचा एक भाग म्हणून आपण वृक्ष रोपण केले पाहिजे. पर्यावरणाच्या संतुलन बिघडल्यामुळे वातावरणात बदल होत आहे, तो बदल कमी करण्यासाठी आपण वृक्ष रोपण केले पाहिजे. 
या नावीन्यपूर्ण व स्तुत्य उपक्रमासाठी चेतना फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळू बोराटे आदींनी शुभेच्छा देऊन कौतुक केले. या आयोजन करण्याकरता राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण सातपुते, प्रा. अनिकेत सुर्वे यांनी विशेष परिश्रम घेतले.