Home Blog Page 96

छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन

छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन

 

पुणे, दि. १४ : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरतीसाठी होणाऱ्या सर्व्हीस सिलेक्शन बोर्ड परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिकरोड, नाशिक येथे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी ८ ते १७ जानेवारी २०२४ या कालावधीत एसएसबी कोर्स क्रमांक ५६ चे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांनी २ जानेवारी २०२४ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात येणार आहे. केंद्रामध्ये प्रवेश मिळण्यासाठी उमेदवार हा कंम्बाइंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (सीडीएसइ-युपीएससी) अथवा नॅशनल डिफेन्स अॅकेडमी एक्झामिनेशन (एनडीए-युपीएससी) उतीर्णं झालेली असावी. त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावेत.

उमेदवार एनसीसी सी सर्टिफिकेट ए किंवा बी ग्रेड मध्ये उत्तीर्ण झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. युनिर्व्हरसीटी इंट्री स्कीम साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे २ जानेवारी २०२४ पर्यंत मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेल्फेअर, पुणे (डीएसडब्लू) यांच्या संकेतस्थळावर सर्च करुन त्यामधील एसएसबी ५६ कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) किंवा ९१५६०७३३०६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर एसएसबी ५६ हा संदेश केल्यास कोर्ससाठी संबंधित परिशिष्ट उपलब्ध करुन देण्यात येईल. उमेदवारांनी परिशिष्ठांची प्रिंट पूर्ण भरून तीन प्रतीत सोबत घेऊन यावी.

अधिक माहीतीसाठी उमेदवारांनी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र , नाशिक रोड, नाशिक ई-मेल आयडी training.pctcnashik@gmail.com, दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ तसेच भ्रमणध्वनी क्रमांक ९१५६०७३३०६ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, लेफ्टनंट कर्नल हंगे स.दै. (नि.) यांनी केले आहे.

संसदेत गोंधळ घालणारे १४ खासदार निलंबित लोकसभेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न

  • img 20231215 wa0042

    नवी दिल्ली:-संसदेतील सुरक्षा विषयक त्रुटींचे संतप्त पडसाद गुरुवारी लोकसभेत उमटले. या मुद्यावरून लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांच्या १४ सदस्यांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीपर्यंत निलंबित करण्यात आले. यात काँग्रेसच्या ९, माकप आणि द्रमुकच्या प्रत्येकी दोन तर भाकपच्या एका सदस्याचा समावेश आहे. राज्यसभेतूनही तृणमूल काँगे्रसचे सदस्य डेरेक ओ ब्रायन यांना निलंबित करण्यात आले.*

*👉🅾️🅾️👉बुधवारी लोकसभेत शून्य तासाचे कामकाज सुरू असताना दोन युवकांनी प्रेक्षक दीर्घेतून लोकसभेत उड्या मारल्या तसेच घोषणा देत स्मोकगनमधून पिवळ्या रंगाचा धूर काढला. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली होती. आज लोकसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी या मुद्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. बुधवारी लोकसभेत घडलेली घटना गंभीर स्वरूपाची सुरक्षा विषयक त्रुटी आहे, असा आरोप करीत, गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी काँग्रेस आणि अन्य विरोधी सदस्यांची मागणी होती.*

*👉🔴🔴👉विरोधी सदस्यांच्या हातात घोषणांचे फलक होते. वेलमध्ये येत त्यांची घोषणाबाजी सुरू होती. सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न सभापती ओम बिर्ला करीत होते. मात्र, विरोधी सदस्य विशेषत: काँग्रेसचे सदस्य अतिशय आक्रमक भूमिकेत होते. गोंधळ शांत होत नसल्यामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. कामकाज पुन्हा सुरू होताच गोंधळ सुरू झाला. हातात घोषणांचे फलक घेत सदस्य वेलमध्ये उतरले. अमित शाह यांच्या निवेदनाची तसेच राजीनाम्याची मागणी सदस्य करीत होते. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनाचा अपमान केला, असा आरोप केला. प्रेक्षक दीर्घेतून सभागृहात उडी मारण्याच्या, घोषणा देण्याच्या, कागद भिरकावण्याच्या घटना याआधीही अनेक वेळा घडल्या. बुधवारच्या घटनेची मी जुन्या घटनेशी तुलना करीत नाही, संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेत झालेली चूक ही गंभीर स्वरूपाची आहे. यातून आपल्याला एकत्र येत मार्ग काढायचा आहे. या घटनेचे राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी केले.*

*👉🅾️🅾️👉टी. एन. प्रतापन, हिबी हिडेन, रम्या हरिदास, डीन कुरियाकोस आणि ज्योतिमणी या काँग्रेसच्या पाच सदस्यांच्या निलंबनाचा प्रस्तावही त्यांनी मांडला, तो आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. सुरू असलेल्या गोंधळातच पीठासीन सभापती मेहताब यांनी संसदीय कामकाज मंत्री जोशी यांना बोलण्याची परवानगी दिली. विरोधकांच्या घोषणाबाजीत जोशी यांनी व्ही. श्रीकांतन, पी. आर. नटराजन, मणिक्कम टगौर, कनिमोझी, मोहम्मद जावेद, बेनी बेहानन, एस.आर. प्रतिबान, के. सुब्रमण्यम आणि एस. व्यंकटेशन अशा एकूण नऊ सदस्यांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीपर्यंत निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला, तो आवाजी मतदानाने पारित करण्यात आला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.*

*👉🅾️🅾️👉सुरक्षेची जबाबदारी लोकसभा सचिवालयाची :-बिर्ला*

*संसद भवनाची सुरक्षा ही लोकसभा सचिवालयाची जबाबदारी आहे, असे नमूद करत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. बुधवारी जी घटना घडली, त्यामुळे आम्ही सगळेच चिंतीत आहो. सुरक्षेची जबाबदारी लोकसभा सचिवालयाची आहे, सरकारचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे तुम्ही चुकीचा पायंडा पाडू नका. आधीही अशा घटना घडल्या आहेत. भविष्यात अशा घटना घडू नये, म्हणून आपण पुन्हा चर्चा करू, असे ओम बिर्ला म्हणाले.*

*👉🟥🟥👉अराजकता निर्माण करणाऱ्यांना पास देऊ नका :-*

*राजनाथसिंह लोकसभेत बुधवारी घडलेल्या घटनेमुळे आपण सावध झालो पाहिजे, अराजकता निर्माण करणाऱ्या व्यक्तींना आणि शक्तींना संसद भवनात प्रवेशाचे पास मिळणार नाही, याची काळजी सत्ता पक्ष आणि विरोधी सदस्यांनी घेतली पाहिजे,असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी केले.*

*👉🛑🛑👉खासदार हनुमान बेनिवाल यांनी स्पीकरच्या व्यासपीठावर चढण्याचा प्रयत्न केला*

*गुरुवारी लोकसभेत संसदेच्या सुरक्षेतील कुचराईच्या मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, राजस्थानमधील आरएलपी पक्षाचे खासदार हनुमान बेनिवाल यांनी लोकसभेच्या कामकाजादरम्यान स्पीकरच्या व्यासपीठावर चढण्याचा प्रयत्न केला.*

*👉🅾️🅾️👉विरोधी पक्षाचे खासदार घोषणाबाजी करत वेलमध्ये आले. अमित शहा यांनी सभागृहात येऊन या विषयावर विधान करावे, अशी मागणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केली.*

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेशासाठी गावपातळीवर विशेष मोहीम

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेशासाठी गावपातळीवर विशेष मोहीम

पुणे, दि.१२ : राज्याच्या भूमी अभिलेख नोंदीनुसार जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या, बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी समावेश करण्यासाठी १५ जानेवारी २०२४ पर्यंत गावपातळीवर विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत.

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) रुपये २ हजार प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रूपये ६ हजार लाभ अदा करण्यात येत आहे. लागवडीलायक क्षेत्रधारक, बँक खाती आधार संलग्न व योजनेचे ईकेवायसी केलेले शेतकरी कुटुंब पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.

या मोहिमेमध्ये लाभार्थींची स्वयं नोंदणी व ई-केवायसी साठी राज्यातील सर्व सामाईक सुविधा केंद्र तर आधार संलग्न बँक खाती उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनाही सहभागी करण्यात आले आहे. विशेष मोहिमेमध्ये ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचारी लाभार्थींची योजनेतील सद्यस्थिती तपासणे व ईकेवायसी करणे, पोर्टलवर नोंदणी करतांना जमीनीचा तपशिल भरणे, फेस ऑथेंटिकेशन ॲपचा वापर करून ई-केवायसी करणे यासाठी शेतकऱ्यांना मदत करतील. तसेच लाभार्थींची बँक खाती आधार संलग्न केली असल्याची खातरजमा करतील.

गावातील योजनेच्या लाभासाठी पात्र लाभार्थीचा शोध घेऊन योजनेच्या निकषांनुसार तपासणी अंती पात्र असलेल्या लाभार्थींना पी एम किसान योजनेच्या लाभासाठी समाविष्ट करण्यात येईल. विशेष मोहिमे अंतर्गत योजनेच्या लाभासाठी समाविष्ट करावयाच्या पात्र लाभार्थींसाठी विशेष ग्रामसभेचे आयोजनही करण्यात येणार आहे.

पी. एम. किसान योजनेचा १६ व्या हप्त्याचा लाभ येत्या जानेवारी महिन्याच्या शेवटी वितरीत करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे. योजनेसाठी नोंदणी करणे, ई-केवायसी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता शेतकऱ्यांनी स्वत: करावयाची आहे. यासाठी पी. एम. किसान योजनेच्या या ४५ दिवसांच्या मोहिमेमध्ये योजनेच्या निकषांच्या अधिन राहून पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यावी.

अधिक माहितीसाठी नजिकचे कृषी सहाय्यक,कृषी पर्यवेक्षक,मंडळ कृषी अधिकारी,तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. महसूल, ग्रामविकास व कृषी या विभागांनी सर्व समन्वयाने राज्यातील पात्र शेतकऱ्यांना पी. एम. किसान योजनेत समाविष्ट करण्यासाठी या विशेष मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करावी, असे आवाहन कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) दिलीप झेंडे यांनी केले आहे.

0000

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 11 दिसम्बर 2023 दिन – सोमवार

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 11 दिसम्बर 2023
दिन – सोमवार
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅अयन – दक्षिणायन*
*⛅ऋतु – हेमंत*
*⛅मास – मार्गशीर्ष*
*⛅पक्ष – कृष्ण*
*⛅तिथि – त्रयोदशी सुबह 07:10 तक तत्पश्चात चतुर्दशी (12 दिसम्बर प्रातः 06:24 तक)*
*⛅नक्षत्र – विशाखा दोपहर 12:14 तक तत्पश्चात अनुराधा*
*⛅योग – सुकर्मा रात्रि 08:59 तक तत्पश्चात धृति*
*⛅राहु काल – सुबह 08:31 से 09:51 तक*
*⛅सूर्योदय – 07:10*
*⛅सूर्यास्त – 05:55*
*⛅दिशा शूल – पूर्व*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 05:24 से 06:17 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:07 से 01:00 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – मासिक शिवरात्रि*
*⛅विशेष – चतुर्दशी के दिन स्त्री-सहवास तथा तिल का तेल खाना और लगाना निषिद्ध है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-38)*

*🌹मासिक शिवरात्रि : 11 दिसम्बर 2023*🌹

*🌹जिस तिथि का जो स्वामी हो उस तिथि में उसकी आराधना-उपासना करना अतिशय उत्तम होता है । चतुर्दशी के स्वामी भगवान शिव है । अतः उनकी रात्रि में किया जानेवाला यह व्रत ‘शिवरात्रि’ कहलाता है । प्रत्येक मास की कृष्ण पक्ष की चतुर्दशी को रात्रि में गुरु से प्राप्त हुए मंत्र का जप करें । गुरुप्रदत्त मंत्र न हो तो पंचाक्षर (नमः शिवाय) मंत्र के जप से भगवान शिव को संतुष्ट करें ।*

*🌹कर्ज मुक्ति हेतु -*

*🌹हर मासिक शिवरात्रि को सूर्यास्त के समय घर में बैठकर अपने गुरुदेव का स्मरण करके शिवजी का स्मरण करते-करते ये 17 मंत्र बोलें ! जिनके सिर पर कर्जा ज्यादा हो वो शिवजी के मंदिर में जाकर दिया जलाकर ये 17 मंत्र बोलें ! इससे कर्जे से मुक्ति मिलेगी…*

🌹1) *ॐ शिवाय नमः*
🌹2) *ॐ सर्वात्मने नमः*
🌹3) *ॐ त्रिनेत्राय नमः*
🌹4) *ॐ हराय नमः*
🌹5) *ॐ इन्द्रमुखाय नमः*
🌹6) *ॐ श्रीकंठाय नमः*
🌹7) *ॐ सद्योजाताय नमः*
🌹8) *ॐ वामदेवाय नमः*
🌹9) *ॐ अघोरहृदयाय नम:*
🌹10) *ॐ तत्पुरुषाय नमः*
🌹11) *ॐ ईशानाय नमः*
🌹12) *ॐ अनंतधर्माय नमः*
🌹13) *ॐ ज्ञानभूताय नमः*
🌹14) *ॐ अनंतवैराग्यसिंघाय नमः*
🌹15) *ॐ प्रधानाय नमः*
🌹16) *ॐ व्योमात्मने नमः*
🌹17) *ॐ व्यूक्तकेशात्मरूपाय नम:*

*🔹धन-सम्पदा प्रदायक व मनोकामना पूर्ण करनेवाले पूजनीय वृक्ष*

*🔸यदि आर्थिक सम्पन्नता चाहते हैं तो नित्य पीपल के वृक्ष में ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ मंत्र का उच्चारण करते हुए जल अवश्य दें और कम-से-कम ७ बार परिक्रमा करें । (रविवार को पीपल के स्पर्श से बचें ।)*

*🔸पद्म पुराण में वेदव्यासजी ने कहा है : ‘पीपल का वृक्ष अत्यंत पूजनीय माना गया है । पीपल को रोपने, रक्षा करने, छूने तथा पूजन से वह क्रमशः धन, पुत्र, स्वर्ग और मोक्ष प्रदान करता है ।’*

*🔸 स्कंद पुराण में आता है : ‘आँवला भगवान को परम प्रिय एवं सब पापों का नाश करनेवाला है अतः समस्त कामनाओं की सिद्धि के लिए आँवले के वृक्ष का पूजन करना उचित है । लक्ष्मीप्राप्ति की इच्छा रखनेवाला मनुष्य नवमी, अमावस्या, सप्तमी, संक्रांति के दिन, रविवार, चन्द्रग्रहण तथा सूर्यग्रहण को छोड़कर सदा आँवलों से स्नान करे, विशेषतः एकादशी को आँवले से स्नान करने पर भगवान संतुष्ट होते हैं ।’*

*🔸शास्त्रों के अनुसार वटवृक्ष के दर्शन, स्पर्श, परिक्रमा तथा सेवा से पाप दूर होते हैं । संत श्री आशारामजी आश्रम की विभिन्न शाखाओं में पूज्य बापूजी द्वारा शक्तिपात किये हुए मनोकामना पूर्ण करनेवाले वटवृक्ष (बड़ बादशाह) हैं, जिनकी परिक्रमा करने तथा थोडी देर वहाँ शांत बैठने से असंख्य लोगों की मनोकामनाएँ पूर्ण हुई हैं । अपने नजदीकी आश्रम में जा के बड़ बादशाह की परिक्रमा प्रार्थना से आप लौकिक व आध्यात्मिक लाभ प्राप्त कर सकते हैं ।*

*🔸तुलसी उपनिषद् में आता है कि ‘तुलसी परिक्रमा करने से दरिद्रता का नाश करनेवाली तथा जड़ की मिट्टी लगाने से बड़े भारी पापों का विनाश कर देनेवाली है । तुलसी की जड़ में भगवान विष्णु तथा छाया में लक्ष्मीजी का निवास है ।’*

*🔸’जहाँ तुलसी की सुगंध लेकर हवा चलती है वहाँ की दसों दिशाएँ और चारों प्रकार के जीव पवित्र हो जाते हैं ।’ (पद्म पुराण, उत्तर खंड : २३.३३)*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 11 दिसम्बर 2023 दिन – सोमवार

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 11 दिसम्बर 2023
दिन – सोमवार
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅अयन – दक्षिणायन*
*⛅ऋतु – हेमंत*
*⛅मास – मार्गशीर्ष*
*⛅पक्ष – कृष्ण*
*⛅तिथि – त्रयोदशी सुबह 07:10 तक तत्पश्चात चतुर्दशी (12 दिसम्बर प्रातः 06:24 तक)*
*⛅नक्षत्र – विशाखा दोपहर 12:14 तक तत्पश्चात अनुराधा*
*⛅योग – सुकर्मा रात्रि 08:59 तक तत्पश्चात धृति*
*⛅राहु काल – सुबह 08:31 से 09:51 तक*
*⛅सूर्योदय – 07:10*
*⛅सूर्यास्त – 05:55*
*⛅दिशा शूल – पूर्व*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 05:24 से 06:17 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:07 से 01:00 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – मासिक शिवरात्रि*
*⛅विशेष – चतुर्दशी के दिन स्त्री-सहवास तथा तिल का तेल खाना और लगाना निषिद्ध है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-38)*

*🌹मासिक शिवरात्रि : 11 दिसम्बर 2023*🌹

*🌹जिस तिथि का जो स्वामी हो उस तिथि में उसकी आराधना-उपासना करना अतिशय उत्तम होता है । चतुर्दशी के स्वामी भगवान शिव है । अतः उनकी रात्रि में किया जानेवाला यह व्रत ‘शिवरात्रि’ कहलाता है । प्रत्येक मास की कृष्ण पक्ष की चतुर्दशी को रात्रि में गुरु से प्राप्त हुए मंत्र का जप करें । गुरुप्रदत्त मंत्र न हो तो पंचाक्षर (नमः शिवाय) मंत्र के जप से भगवान शिव को संतुष्ट करें ।*

*🌹कर्ज मुक्ति हेतु -*

*🌹हर मासिक शिवरात्रि को सूर्यास्त के समय घर में बैठकर अपने गुरुदेव का स्मरण करके शिवजी का स्मरण करते-करते ये 17 मंत्र बोलें ! जिनके सिर पर कर्जा ज्यादा हो वो शिवजी के मंदिर में जाकर दिया जलाकर ये 17 मंत्र बोलें ! इससे कर्जे से मुक्ति मिलेगी…*

🌹1) *ॐ शिवाय नमः*
🌹2) *ॐ सर्वात्मने नमः*
🌹3) *ॐ त्रिनेत्राय नमः*
🌹4) *ॐ हराय नमः*
🌹5) *ॐ इन्द्रमुखाय नमः*
🌹6) *ॐ श्रीकंठाय नमः*
🌹7) *ॐ सद्योजाताय नमः*
🌹8) *ॐ वामदेवाय नमः*
🌹9) *ॐ अघोरहृदयाय नम:*
🌹10) *ॐ तत्पुरुषाय नमः*
🌹11) *ॐ ईशानाय नमः*
🌹12) *ॐ अनंतधर्माय नमः*
🌹13) *ॐ ज्ञानभूताय नमः*
🌹14) *ॐ अनंतवैराग्यसिंघाय नमः*
🌹15) *ॐ प्रधानाय नमः*
🌹16) *ॐ व्योमात्मने नमः*
🌹17) *ॐ व्यूक्तकेशात्मरूपाय नम:*

*🔹धन-सम्पदा प्रदायक व मनोकामना पूर्ण करनेवाले पूजनीय वृक्ष*

*🔸यदि आर्थिक सम्पन्नता चाहते हैं तो नित्य पीपल के वृक्ष में ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ मंत्र का उच्चारण करते हुए जल अवश्य दें और कम-से-कम ७ बार परिक्रमा करें । (रविवार को पीपल के स्पर्श से बचें ।)*

*🔸पद्म पुराण में वेदव्यासजी ने कहा है : ‘पीपल का वृक्ष अत्यंत पूजनीय माना गया है । पीपल को रोपने, रक्षा करने, छूने तथा पूजन से वह क्रमशः धन, पुत्र, स्वर्ग और मोक्ष प्रदान करता है ।’*

*🔸 स्कंद पुराण में आता है : ‘आँवला भगवान को परम प्रिय एवं सब पापों का नाश करनेवाला है अतः समस्त कामनाओं की सिद्धि के लिए आँवले के वृक्ष का पूजन करना उचित है । लक्ष्मीप्राप्ति की इच्छा रखनेवाला मनुष्य नवमी, अमावस्या, सप्तमी, संक्रांति के दिन, रविवार, चन्द्रग्रहण तथा सूर्यग्रहण को छोड़कर सदा आँवलों से स्नान करे, विशेषतः एकादशी को आँवले से स्नान करने पर भगवान संतुष्ट होते हैं ।’*

*🔸शास्त्रों के अनुसार वटवृक्ष के दर्शन, स्पर्श, परिक्रमा तथा सेवा से पाप दूर होते हैं । संत श्री आशारामजी आश्रम की विभिन्न शाखाओं में पूज्य बापूजी द्वारा शक्तिपात किये हुए मनोकामना पूर्ण करनेवाले वटवृक्ष (बड़ बादशाह) हैं, जिनकी परिक्रमा करने तथा थोडी देर वहाँ शांत बैठने से असंख्य लोगों की मनोकामनाएँ पूर्ण हुई हैं । अपने नजदीकी आश्रम में जा के बड़ बादशाह की परिक्रमा प्रार्थना से आप लौकिक व आध्यात्मिक लाभ प्राप्त कर सकते हैं ।*

*🔸तुलसी उपनिषद् में आता है कि ‘तुलसी परिक्रमा करने से दरिद्रता का नाश करनेवाली तथा जड़ की मिट्टी लगाने से बड़े भारी पापों का विनाश कर देनेवाली है । तुलसी की जड़ में भगवान विष्णु तथा छाया में लक्ष्मीजी का निवास है ।’*

*🔸’जहाँ तुलसी की सुगंध लेकर हवा चलती है वहाँ की दसों दिशाएँ और चारों प्रकार के जीव पवित्र हो जाते हैं ।’ (पद्म पुराण, उत्तर खंड : २३.३३)*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

शिवसृष्टीचे संपादक धनंजय लक्ष्मणराव कळमकर- पाटील यांची भारतीय पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

img 20231210 wa0023
शिवसृष्टीचे संपादक धनंजय लक्ष्मणराव कळमकर- पाटील यांची भारतीय पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथील शिवसृष्टीचे संपादक धनंजय लक्ष्मणराव कळमकर- पाटील यांची भारतीय पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.सदरची नियुक्ती पुणे जिल्हा अध्यक्ष तैनुर शेख यांनी केली असुन, नियुक्ती पत्र प्रदान करताना भारतीय पत्रकार संघाचे लिगल विंगचे प्रदेशाध्यक्ष अॅड. कैलास पठारे, उपाध्यक्ष,अॅड. पांडूरंग ढोरे पाटील, भारतीय पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष सिकंदर नदाफ, लिगल विंगचे पुणे जिल्हा अध्यक्ष अॅड. समीर बेलदरे पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष तैनुर शेख, सचिव काशिनाथ पिंगळे इ. मान्यवर उपस्थित होते.

इंदापूर तालुक्यात १९९८ साली पत्रकारीतेला धनंजय कळमकर-पाटील यांची सुरुवात पत्रकार क्षेत्रातील दमदार लेखणी,व कवि रामदास देवकर दैनिक सामना, पुढारी चे प्रतिनिधी यांच्याबरोबर झाली‌. त्यानंतर सलग पाच ते सात वर्षे वेगवेगळे पेपरला काम करून अनुभव मिळवला, इंदापूर तालुक्याचे सुपुत्र शिरूर तालुक्यातील म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रा. नागनाथ शिंगाडे यांचे सा.नागरिक समता अनेक दिवस चालवला. त्यामध्ये इंदापूर तालुका दर्शन हे पुस्तक ही काढले, त्यावर अनेक जणांनी तालुक्याची माहिती घेऊन पीएचडी मिळवली आहे. अनेक पेपरला इंदापूर प्रतिनिधी म्हणून काम केले नंतर , स्वतःचे शिवसृष्टी नावाची साप्ताहिक सुरू केले नंतर स्वराज्य निर्माता म्हणून एक मासिक चालू केले.

लक्ष्मी वैभव चे संपादक कै. विलासराव गाढवे,व शिवसृष्टी चे संपादक धनंजय कळमकर जय वीरूची जोडी यांनी आपल्या धारदार लेखणीतून इंदापूर तालुक्यातील तळागाळातील गरजू व्यक्तींच्या बातम्या छापून अनेकांना सुता सारखे सरळ ही केले. तळमळीने पत्रकारिता सुरू आहे म्हणून अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाने इंदापूर तालुका सचिव म्हणून धनंजय कळमकर यांची निवड केली यामध्ये हाजी एम.डी. शेख राष्ट्रीय अध्यक्ष, पुणे जिल्हाध्यक्ष संदेश शहा, तालुकाध्यक्ष राजेंद्र कवडे देशमुख, शौकत भाई तांबोळी व मार्गदर्शक म्हणून कै. विलासराव गाढवे तर खंबीर साथ कैलास पवार सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आतार महादेव चव्हाण सर यांची मोलाची साथ मिळाली.

त्यानंतर तालुक्यातच इतरांनाही संधी मिळावी म्हणून भारतीय पत्रकार संघ या संघटनेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी धनंजय कळमकर-पाटील यांची निवड झाली या निवडीनंतर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचा येतोच असं सन्मान कार्याचा सन्मान केला या वेळी बोलताना धनंजय कळमकर पाटील म्हणाले की, मला, सामाजिक कार्यकर्ते व घटनात आंदोलनाचे प्रणेते लक्ष्मणराव तात्या गुणवरे यांनी सुरुवातीचा पुरस्कार देऊन माझ्या बातमीचा गौरव केला. त्यानंतर तेच पृथ्वी ग्रुपच्या वतीने सन्मानपत्र देण्यात आले. नानासाहेब खरात व अनिताताई खरात यांच्या हस्ते चेतन फाउंडेशन च्या वतीने काकासाहेब मांढरे यांनी निर्भीड पत्रकार पुरस्कार दिला. बालाजी प्रतिष्ठानच्या वतीने उत्कृष्ट लेखन केल्याबद्दल कै.विलासराव गाढवे यांनी निर्भीड संपादक म्हणून पुरस्काराने गौरविले.

महात्मा फुले प्रतिष्ठानच्या वतीने पांडुरंग शिंदे यांनी उत्कृष्ट पत्रकार म्हणून पुरस्कार दिला. शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात आला तो पुरस्कार श्रीमती पद्माताई भोसले यांच्या हस्ते देण्यात आला,या वेळी बोलताना धनंजय कळमकर पाटील म्हणाले की,

खींचो न कमानों को
न तलवार निकालो !
जब तोप मुक़ाबिल हो
तो अख़बार निकालो!!
पत्रकारांची लेखणी ही तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, अन्याय, अत्याचार, गुंडगिरी, भ्रष्ट्राचार याविरुद्ध लढताना फक्त लेखणी चालवा, समोरचा बरोबर घायाळ होईल …जे पत्रकार खऱ्या बातम्या देण्यास घाबरतात, त्यांनी पत्रकारिता न करता वडापावचा गाडा टाकावा,असे माझे स्पष्ट मत आहे.
पत्रकारिता जीवनाची सेवा आहे.ढोंग, विषमता आणि अन्याय ह्यांच्याविरुद्ध उपसलेली ती तलवार आहे. सत्य, समता, आणि स्वातंत्र्य यांच्या आराधनेची ती पूजा आहे.,या वेळी माझे जिवलग मित्र कैलास भाऊ पवार हमीदभाई आतार महादेव चव्हाण सर , उपस्थित होते.
पत्रकारांची लेखणी ही सत्यासाठी आणि न्यायासाठी लढणाऱ्या शिपायाची तलवार आहे. पत्रकाराच्या लेखणीला तलवारीची धार नसेल, तर सत्य सांगण्याचा आणि न्याय देण्याचा धंदा त्याला यशस्वीपणे करता येणार नाही. त्याने ‘पत्रकार’ होण्याऐवजी ‘पात्रकार’ व्हावे! असं आचार्य अत्रे यांनी म्हटलंय .पण आजकाल अर्ध्या हळकुंडात न्हालेल्या ‘पत्रक’कारांनी पत्रकारितेचा धंदा मांडलाय.पत्रकारितेच्या नावावर दुकानदारी सुरू आहे.

जो पत्रकार सत्य वागतो, सत्य लिहितो त्याविरुद्ध षडयंत्र केलं जातं. दुकानदारी करणारे एकत्र येतात आणि सत्यवादी पत्रकारविरुद्ध मोहीम राबवली जाते, दोन नंबर धंदेवाल्यास हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल केले जातात.अश्या लोकांचे जागोजागी पिक वाढले आहे.त्यात बिनकामाचे तण वाढले आहे, ज्यास चार ओळीची बातमी नीट लिहिता येत नाही, ते पत्रकार म्हणून मिरवत आहेत.
समाजाने अश्या लोकांना खड्याप्रमाणे बाजूला ठेवले पाहिजे. जे सत्य लिहितात, अन्याय आणि अत्याचाराला वाचा फोडतात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे .असे मत धनंजय कळमकर- पाटील यांनी व्यक्त केले, आम्ही ख-या पत्रकारांच्या पाठीशी खंबीर उभे राहू असे हे बोलताना सांगितले.

भारतीय पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती पत्र प्रदान करताना भारतीय पत्रकार संघाचे पदाधिकारी दुसऱ्या छायाचित्रात इंदापूर येथील प्रसिद्ध उद्योजक कापड व्यापारी मुकुंदशेठ शहा, भरतशेठ शहा सत्कार करताना व इतर

शिवसृष्टीचे संपादक धनंजय लक्ष्मणराव कळमकर- पाटील यांची भारतीय पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

img 20231210 wa0023
शिवसृष्टीचे संपादक धनंजय लक्ष्मणराव कळमकर- पाटील यांची भारतीय पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथील शिवसृष्टीचे संपादक धनंजय लक्ष्मणराव कळमकर- पाटील यांची भारतीय पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.सदरची नियुक्ती पुणे जिल्हा अध्यक्ष तैनुर शेख यांनी केली असुन, नियुक्ती पत्र प्रदान करताना भारतीय पत्रकार संघाचे लिगल विंगचे प्रदेशाध्यक्ष अॅड. कैलास पठारे, उपाध्यक्ष,अॅड. पांडूरंग ढोरे पाटील, भारतीय पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष सिकंदर नदाफ, लिगल विंगचे पुणे जिल्हा अध्यक्ष अॅड. समीर बेलदरे पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष तैनुर शेख, सचिव काशिनाथ पिंगळे इ. मान्यवर उपस्थित होते.

इंदापूर तालुक्यात १९९८ साली पत्रकारीतेला धनंजय कळमकर-पाटील यांची सुरुवात पत्रकार क्षेत्रातील दमदार लेखणी,व कवि रामदास देवकर दैनिक सामना, पुढारी चे प्रतिनिधी यांच्याबरोबर झाली‌. त्यानंतर सलग पाच ते सात वर्षे वेगवेगळे पेपरला काम करून अनुभव मिळवला, इंदापूर तालुक्याचे सुपुत्र शिरूर तालुक्यातील म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रा. नागनाथ शिंगाडे यांचे सा.नागरिक समता अनेक दिवस चालवला. त्यामध्ये इंदापूर तालुका दर्शन हे पुस्तक ही काढले, त्यावर अनेक जणांनी तालुक्याची माहिती घेऊन पीएचडी मिळवली आहे. अनेक पेपरला इंदापूर प्रतिनिधी म्हणून काम केले नंतर , स्वतःचे शिवसृष्टी नावाची साप्ताहिक सुरू केले नंतर स्वराज्य निर्माता म्हणून एक मासिक चालू केले.

लक्ष्मी वैभव चे संपादक कै. विलासराव गाढवे,व शिवसृष्टी चे संपादक धनंजय कळमकर जय वीरूची जोडी यांनी आपल्या धारदार लेखणीतून इंदापूर तालुक्यातील तळागाळातील गरजू व्यक्तींच्या बातम्या छापून अनेकांना सुता सारखे सरळ ही केले. तळमळीने पत्रकारिता सुरू आहे म्हणून अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाने इंदापूर तालुका सचिव म्हणून धनंजय कळमकर यांची निवड केली यामध्ये हाजी एम.डी. शेख राष्ट्रीय अध्यक्ष, पुणे जिल्हाध्यक्ष संदेश शहा, तालुकाध्यक्ष राजेंद्र कवडे देशमुख, शौकत भाई तांबोळी व मार्गदर्शक म्हणून कै. विलासराव गाढवे तर खंबीर साथ कैलास पवार सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आतार महादेव चव्हाण सर यांची मोलाची साथ मिळाली.

त्यानंतर तालुक्यातच इतरांनाही संधी मिळावी म्हणून भारतीय पत्रकार संघ या संघटनेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी धनंजय कळमकर-पाटील यांची निवड झाली या निवडीनंतर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचा येतोच असं सन्मान कार्याचा सन्मान केला या वेळी बोलताना धनंजय कळमकर पाटील म्हणाले की, मला, सामाजिक कार्यकर्ते व घटनात आंदोलनाचे प्रणेते लक्ष्मणराव तात्या गुणवरे यांनी सुरुवातीचा पुरस्कार देऊन माझ्या बातमीचा गौरव केला. त्यानंतर तेच पृथ्वी ग्रुपच्या वतीने सन्मानपत्र देण्यात आले. नानासाहेब खरात व अनिताताई खरात यांच्या हस्ते चेतन फाउंडेशन च्या वतीने काकासाहेब मांढरे यांनी निर्भीड पत्रकार पुरस्कार दिला. बालाजी प्रतिष्ठानच्या वतीने उत्कृष्ट लेखन केल्याबद्दल कै.विलासराव गाढवे यांनी निर्भीड संपादक म्हणून पुरस्काराने गौरविले.

महात्मा फुले प्रतिष्ठानच्या वतीने पांडुरंग शिंदे यांनी उत्कृष्ट पत्रकार म्हणून पुरस्कार दिला. शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात आला तो पुरस्कार श्रीमती पद्माताई भोसले यांच्या हस्ते देण्यात आला,या वेळी बोलताना धनंजय कळमकर पाटील म्हणाले की,

खींचो न कमानों को
न तलवार निकालो !
जब तोप मुक़ाबिल हो
तो अख़बार निकालो!!
पत्रकारांची लेखणी ही तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, अन्याय, अत्याचार, गुंडगिरी, भ्रष्ट्राचार याविरुद्ध लढताना फक्त लेखणी चालवा, समोरचा बरोबर घायाळ होईल …जे पत्रकार खऱ्या बातम्या देण्यास घाबरतात, त्यांनी पत्रकारिता न करता वडापावचा गाडा टाकावा,असे माझे स्पष्ट मत आहे.
पत्रकारिता जीवनाची सेवा आहे.ढोंग, विषमता आणि अन्याय ह्यांच्याविरुद्ध उपसलेली ती तलवार आहे. सत्य, समता, आणि स्वातंत्र्य यांच्या आराधनेची ती पूजा आहे.,या वेळी माझे जिवलग मित्र कैलास भाऊ पवार हमीदभाई आतार महादेव चव्हाण सर , उपस्थित होते.
पत्रकारांची लेखणी ही सत्यासाठी आणि न्यायासाठी लढणाऱ्या शिपायाची तलवार आहे. पत्रकाराच्या लेखणीला तलवारीची धार नसेल, तर सत्य सांगण्याचा आणि न्याय देण्याचा धंदा त्याला यशस्वीपणे करता येणार नाही. त्याने ‘पत्रकार’ होण्याऐवजी ‘पात्रकार’ व्हावे! असं आचार्य अत्रे यांनी म्हटलंय .पण आजकाल अर्ध्या हळकुंडात न्हालेल्या ‘पत्रक’कारांनी पत्रकारितेचा धंदा मांडलाय.पत्रकारितेच्या नावावर दुकानदारी सुरू आहे.

जो पत्रकार सत्य वागतो, सत्य लिहितो त्याविरुद्ध षडयंत्र केलं जातं. दुकानदारी करणारे एकत्र येतात आणि सत्यवादी पत्रकारविरुद्ध मोहीम राबवली जाते, दोन नंबर धंदेवाल्यास हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल केले जातात.अश्या लोकांचे जागोजागी पिक वाढले आहे.त्यात बिनकामाचे तण वाढले आहे, ज्यास चार ओळीची बातमी नीट लिहिता येत नाही, ते पत्रकार म्हणून मिरवत आहेत.
समाजाने अश्या लोकांना खड्याप्रमाणे बाजूला ठेवले पाहिजे. जे सत्य लिहितात, अन्याय आणि अत्याचाराला वाचा फोडतात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे .असे मत धनंजय कळमकर- पाटील यांनी व्यक्त केले, आम्ही ख-या पत्रकारांच्या पाठीशी खंबीर उभे राहू असे हे बोलताना सांगितले.

भारतीय पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती पत्र प्रदान करताना भारतीय पत्रकार संघाचे पदाधिकारी दुसऱ्या छायाचित्रात इंदापूर येथील प्रसिद्ध उद्योजक कापड व्यापारी मुकुंदशेठ शहा, भरतशेठ शहा सत्कार करताना व इतर

न्या.संदीप शिंदे समिती ९ डिसेंबर रोजी पुणे विभाग दौऱ्यावर

न्या.संदीप शिंदे समिती ९ डिसेंबर रोजी पुणे विभाग दौऱ्यावर

पुणे,दि.८: मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत पुणे विभागाचा जिल्हानिहाय आढावा घेणार आहेत.

सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून समितीच्या दौऱ्याचे वेळापत्रक कळविले आहे. या दौऱ्यादरम्यान, समितीचे अध्यक्ष व सदस्य कामकाजाच्या अनुषंगाने पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

इंदापूर शहरातील वाहतुकीत बदल

इंदापूर शहरातील वाहतुकीत बदल

पुणे, दि. ८: अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या ९ डिसेंबर रोजी इंदापूर येथे होणाऱ्या जाहीर सभेच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.

वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून इंदापूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीत शहरातील संविधान चौक ते स्मशानभुमी चौक १०० फुटी रस्त्यावरील वाहतूक ९ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तात्पुरती बंद करुन बाबा चौक ते खुळे चौक ते राजेवलीनगर या मार्गे वळविण्यात येत आहे. नागरिकांनी वाहतूकीत केलेल्या बदलाची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले आहे.

इंदापूर शहरातील वाहतुकीत बदल

इंदापूर शहरातील वाहतुकीत बदल

पुणे, दि. ८: अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या ९ डिसेंबर रोजी इंदापूर येथे होणाऱ्या जाहीर सभेच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.

वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून इंदापूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीत शहरातील संविधान चौक ते स्मशानभुमी चौक १०० फुटी रस्त्यावरील वाहतूक ९ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तात्पुरती बंद करुन बाबा चौक ते खुळे चौक ते राजेवलीनगर या मार्गे वळविण्यात येत आहे. नागरिकांनी वाहतूकीत केलेल्या बदलाची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले आहे.

error: Content is protected !!